शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी पूरक जोडधंदे करावेत

By admin | Updated: January 7, 2015 01:05 IST

औरंगाबाद : शेतकऱ्यांनी खोटी प्रतिष्ठा व अनावश्यक गरजांचा हव्यास बाळगणे सोडावे. शेतीसोबत पूरक जोडधंद्याची कास धरल्यास शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल व आत्महत्या टाळता येतील,

औरंगाबाद : शेतकऱ्यांनी खोटी प्रतिष्ठा व अनावश्यक गरजांचा हव्यास बाळगणे सोडावे. शेतीसोबत पूरक जोडधंद्याची कास धरल्यास शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल व आत्महत्या टाळता येतील, असा सूर दर्पण दिनानिमित्त आयोजित परिसंवादात निघाला. दर्पण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वृत्तपत्रविद्या विभाग आणि एमजीएम वृत्तपत्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रसार माध्यमे आणि ग्रामीण वास्तव’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. रेखा शेळके यांनी केले. प्रमुख वक्ते म्हणून ‘आयबीएन लोकमत’चे वृत्तसंपादक राजेंद्र हुंजे, ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब, अशोक तुपे यांची उपस्थिती होती. यावेळी अमर हबीब म्हणाले की, ग्रामीण भागात फक्त प्राथमिक शिक्षणापर्यंत मुलींचे प्रमाण बऱ्यापैकी आहे. उच्च शिक्षणात मात्र ९० टक्के गळतीचे प्रमाण आहे. ग्रामीण भागातील लोकांमध्ये स्थलांतराचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहे, ही मोठी शोकांतिका आहे. स्वत:ची क्षमता सिद्ध करण्याची ताकद आज शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये जास्त आहे. डॉ. वि. ल. धारूरकर म्हणाले की, भारत हा खेड्यांचा देश आहे. प्रसारमाध्यमांनी खेड्यात जाऊन तेथील प्रश्न समजून घेण्याची गरज आहे. खेड्यातील बातम्यांचे प्रतिबिंब वर्तमानपत्रांमध्ये उमटत नाही, तशी चर्चा माध्यमे करीत नाहीत.‘आयबीएन लोकमत’चे वृत्तसंपादक राजेंद्र हुंजे म्हणाले की, माध्यमांनी ग्रामीण वास्तव समोर आणले आहे. माध्यम म्हणजे कायदेमंडळ नसून त्यांनासुद्धा मर्यादा आहेत. आपण जेव्हा शहरात जातो, तेव्हा तेव्हा आपण गावाला विसरतो. गावातील वास्तवाचे भान आपण ठेवले पाहिजे. अशोक तुपे म्हणाले की, आजची पत्रकारिता ही फक्त चित्रपटातील गप्पा गोष्टी आणि राजकारण यावरच भाष्य करण्यावर भर देत आहे. ग्रामीण भागातील प्रश्न मांडणारी पत्रकारिता ही बोटावर मोजण्याएवढीच शिल्लक आहे. या कार्यक्रमास प्राध्यापक डॉ. आशा देशपांडे, प्रा. सत्यजित जाधव, प्रा. बाळासाहेब गायके आदींसह विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. प्रा. जयदेव डोळे यांच्या मनोगताने कार्यक्रमाचा समारोप झाला.