शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत शेतक-यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 23:51 IST

कपाशीवरील बोंडअळीग्रस्त शेतक-यांच्या खात्यात मदत जमा करण्याच्या हिवाळी अधिवेशनातील घोषणेला दोन महिने झाले. मदत शेतक-यांंच्या खात्यात त्वरित जमा करावी, या मागणीसाठी कृषी विभाग कार्यालयासमोर शेतकºयांनी बुधवारी दुपारी आत्मदहनाचा प्रयत्न केला. क्रांतीचौक पोलिसांनी तत्परता दाखवून अंगावर रॉकेल ओतून घेतलेल्या शेतकºयांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.

ठळक मुद्देक्रांतीचौकात उडाला थरार : ३७ शेतक-यांवर दंगलीचे गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कपाशीवरील बोंडअळीग्रस्त शेतक-यांच्या खात्यात मदत जमा करण्याच्या हिवाळी अधिवेशनातील घोषणेला दोन महिने झाले. मदत शेतक-यांंच्या खात्यात त्वरित जमा करावी, या मागणीसाठी कृषी विभाग कार्यालयासमोर शेतकºयांनी बुधवारी दुपारी आत्मदहनाचा प्रयत्न केला. क्रांतीचौक पोलिसांनी तत्परता दाखवून अंगावर रॉकेल ओतून घेतलेल्या शेतकºयांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी याप्रकरणी ३७ शेतक-यांवर दंगलीसह अन्य गुन्हे दाखल केले आहेत.क्रांतीचौकातील विभागीय सहसंचालक कार्यालयासमोर गंगापूर तालुक्यातून माजी सभापती संतोष जाधव (वजनापूरकर) यांच्यासह अनेक कार्यकर्ते आले. त्यांनी गळ्यात कपाशीच्या कैºयांच्या माळा घातल्या होत्या. बोंडअळीचे पंचनामे, क्रॉसपंचनामे होऊनही कृषी खाते जबाबदारी विमा कंपन्यांवर ढकलत आहे.दुसरीकडे शासन कागदोपत्रीच घोडे नाचवीत आहे, याचा निषेध करून संतोष पाटील जाधव यांनी लपवून आणलेली रॉकेलची बॉटली अंगावर ओतण्यास सुरुवात केली. पोलीस पथकाने त्वरित त्यांच्या हातातून बाटली हिसकावली. शेतकºयांनी ‘बोंडअळीग्रस्त शेतकºयांंच्या बँक खात्यात अनुदान त्वरित जमा करा’ अशी घोषणाबाजी सुरू केली. या वेळेत चार ते पाच शेतकºयांंनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. सर्व शेतकºयांना ताब्यात घेत १० ते १५ मिनिटे चाललेल्या नाट्यावर पोलिसांनी पडदा टाकला. आंदोलनातील ३७ शेतकºयांना पोलिसांनी ताब्यात घेऊन गाडीत कोंबले. यावेळी आंदोलनात बबन डुबे (संभाजी सेना), महेश गुजर (शेकाप), युवराज ताठे, भावराव लोहकरे, सुभाष जगताप, काकासाहेब डुबे, अण्णासाहेब जाधव (मनसे तालुकाध्यक्ष), ज्ञानेश्वर तिवाडे, राजू तिखे, संजय चव्हाण, पंडित खेडकर, अप्पासाहेब जगदाळे आदी शेतकºयांची उपस्थिती होती. क्रांतीचौक ठाण्यात दंगलीचे गुन्हे दाखल केले आहेत.आंदोलनाचे पत्र दिले ७ रोजीतक-यांनी आंदोलनाचे पत्र ७ फेब्रुवारीला कृषी विभागाला दिले होते. आठवडा होऊनही कारवाई न झाल्याने शेतकºयांंनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी तो हाणून पाडत त्यांना ताब्यात घेतले. राज्यात ३४ लाख ५५ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशी पिकांवर गुलाबी बोंडअळीने आक्रमण केले. परिणामी, १ लाख ८१ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड केलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकºयांचे कंबरडेच मोडले आहे.आंदोलनास पाठिंबाआत्मदहन आंदोलनाला मराठा मावळा संघटनेने पाठिंबा दिला आहे. दरम्यान मदत तात्काळ न मिळाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकºयांंनी दिला.