शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

औरंगाबादेत शेतक-यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 23:51 IST

कपाशीवरील बोंडअळीग्रस्त शेतक-यांच्या खात्यात मदत जमा करण्याच्या हिवाळी अधिवेशनातील घोषणेला दोन महिने झाले. मदत शेतक-यांंच्या खात्यात त्वरित जमा करावी, या मागणीसाठी कृषी विभाग कार्यालयासमोर शेतकºयांनी बुधवारी दुपारी आत्मदहनाचा प्रयत्न केला. क्रांतीचौक पोलिसांनी तत्परता दाखवून अंगावर रॉकेल ओतून घेतलेल्या शेतकºयांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.

ठळक मुद्देक्रांतीचौकात उडाला थरार : ३७ शेतक-यांवर दंगलीचे गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कपाशीवरील बोंडअळीग्रस्त शेतक-यांच्या खात्यात मदत जमा करण्याच्या हिवाळी अधिवेशनातील घोषणेला दोन महिने झाले. मदत शेतक-यांंच्या खात्यात त्वरित जमा करावी, या मागणीसाठी कृषी विभाग कार्यालयासमोर शेतकºयांनी बुधवारी दुपारी आत्मदहनाचा प्रयत्न केला. क्रांतीचौक पोलिसांनी तत्परता दाखवून अंगावर रॉकेल ओतून घेतलेल्या शेतकºयांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी याप्रकरणी ३७ शेतक-यांवर दंगलीसह अन्य गुन्हे दाखल केले आहेत.क्रांतीचौकातील विभागीय सहसंचालक कार्यालयासमोर गंगापूर तालुक्यातून माजी सभापती संतोष जाधव (वजनापूरकर) यांच्यासह अनेक कार्यकर्ते आले. त्यांनी गळ्यात कपाशीच्या कैºयांच्या माळा घातल्या होत्या. बोंडअळीचे पंचनामे, क्रॉसपंचनामे होऊनही कृषी खाते जबाबदारी विमा कंपन्यांवर ढकलत आहे.दुसरीकडे शासन कागदोपत्रीच घोडे नाचवीत आहे, याचा निषेध करून संतोष पाटील जाधव यांनी लपवून आणलेली रॉकेलची बॉटली अंगावर ओतण्यास सुरुवात केली. पोलीस पथकाने त्वरित त्यांच्या हातातून बाटली हिसकावली. शेतकºयांनी ‘बोंडअळीग्रस्त शेतकºयांंच्या बँक खात्यात अनुदान त्वरित जमा करा’ अशी घोषणाबाजी सुरू केली. या वेळेत चार ते पाच शेतकºयांंनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. सर्व शेतकºयांना ताब्यात घेत १० ते १५ मिनिटे चाललेल्या नाट्यावर पोलिसांनी पडदा टाकला. आंदोलनातील ३७ शेतकºयांना पोलिसांनी ताब्यात घेऊन गाडीत कोंबले. यावेळी आंदोलनात बबन डुबे (संभाजी सेना), महेश गुजर (शेकाप), युवराज ताठे, भावराव लोहकरे, सुभाष जगताप, काकासाहेब डुबे, अण्णासाहेब जाधव (मनसे तालुकाध्यक्ष), ज्ञानेश्वर तिवाडे, राजू तिखे, संजय चव्हाण, पंडित खेडकर, अप्पासाहेब जगदाळे आदी शेतकºयांची उपस्थिती होती. क्रांतीचौक ठाण्यात दंगलीचे गुन्हे दाखल केले आहेत.आंदोलनाचे पत्र दिले ७ रोजीतक-यांनी आंदोलनाचे पत्र ७ फेब्रुवारीला कृषी विभागाला दिले होते. आठवडा होऊनही कारवाई न झाल्याने शेतकºयांंनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी तो हाणून पाडत त्यांना ताब्यात घेतले. राज्यात ३४ लाख ५५ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशी पिकांवर गुलाबी बोंडअळीने आक्रमण केले. परिणामी, १ लाख ८१ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड केलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकºयांचे कंबरडेच मोडले आहे.आंदोलनास पाठिंबाआत्मदहन आंदोलनाला मराठा मावळा संघटनेने पाठिंबा दिला आहे. दरम्यान मदत तात्काळ न मिळाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकºयांंनी दिला.