शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
3
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
4
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
5
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
6
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
7
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
8
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
9
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
10
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
11
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
12
बापमाणूस! पत्नीच्या मृत्यूनंतर चिमुकल्या लेकीला सोबत घेऊन बाबा करतोय काम, पाणावले डोळे
13
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
14
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
15
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
16
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
17
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
18
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
19
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
20
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय

औरंगाबादेत शेतक-यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 23:51 IST

कपाशीवरील बोंडअळीग्रस्त शेतक-यांच्या खात्यात मदत जमा करण्याच्या हिवाळी अधिवेशनातील घोषणेला दोन महिने झाले. मदत शेतक-यांंच्या खात्यात त्वरित जमा करावी, या मागणीसाठी कृषी विभाग कार्यालयासमोर शेतकºयांनी बुधवारी दुपारी आत्मदहनाचा प्रयत्न केला. क्रांतीचौक पोलिसांनी तत्परता दाखवून अंगावर रॉकेल ओतून घेतलेल्या शेतकºयांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.

ठळक मुद्देक्रांतीचौकात उडाला थरार : ३७ शेतक-यांवर दंगलीचे गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कपाशीवरील बोंडअळीग्रस्त शेतक-यांच्या खात्यात मदत जमा करण्याच्या हिवाळी अधिवेशनातील घोषणेला दोन महिने झाले. मदत शेतक-यांंच्या खात्यात त्वरित जमा करावी, या मागणीसाठी कृषी विभाग कार्यालयासमोर शेतकºयांनी बुधवारी दुपारी आत्मदहनाचा प्रयत्न केला. क्रांतीचौक पोलिसांनी तत्परता दाखवून अंगावर रॉकेल ओतून घेतलेल्या शेतकºयांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी याप्रकरणी ३७ शेतक-यांवर दंगलीसह अन्य गुन्हे दाखल केले आहेत.क्रांतीचौकातील विभागीय सहसंचालक कार्यालयासमोर गंगापूर तालुक्यातून माजी सभापती संतोष जाधव (वजनापूरकर) यांच्यासह अनेक कार्यकर्ते आले. त्यांनी गळ्यात कपाशीच्या कैºयांच्या माळा घातल्या होत्या. बोंडअळीचे पंचनामे, क्रॉसपंचनामे होऊनही कृषी खाते जबाबदारी विमा कंपन्यांवर ढकलत आहे.दुसरीकडे शासन कागदोपत्रीच घोडे नाचवीत आहे, याचा निषेध करून संतोष पाटील जाधव यांनी लपवून आणलेली रॉकेलची बॉटली अंगावर ओतण्यास सुरुवात केली. पोलीस पथकाने त्वरित त्यांच्या हातातून बाटली हिसकावली. शेतकºयांनी ‘बोंडअळीग्रस्त शेतकºयांंच्या बँक खात्यात अनुदान त्वरित जमा करा’ अशी घोषणाबाजी सुरू केली. या वेळेत चार ते पाच शेतकºयांंनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. सर्व शेतकºयांना ताब्यात घेत १० ते १५ मिनिटे चाललेल्या नाट्यावर पोलिसांनी पडदा टाकला. आंदोलनातील ३७ शेतकºयांना पोलिसांनी ताब्यात घेऊन गाडीत कोंबले. यावेळी आंदोलनात बबन डुबे (संभाजी सेना), महेश गुजर (शेकाप), युवराज ताठे, भावराव लोहकरे, सुभाष जगताप, काकासाहेब डुबे, अण्णासाहेब जाधव (मनसे तालुकाध्यक्ष), ज्ञानेश्वर तिवाडे, राजू तिखे, संजय चव्हाण, पंडित खेडकर, अप्पासाहेब जगदाळे आदी शेतकºयांची उपस्थिती होती. क्रांतीचौक ठाण्यात दंगलीचे गुन्हे दाखल केले आहेत.आंदोलनाचे पत्र दिले ७ रोजीतक-यांनी आंदोलनाचे पत्र ७ फेब्रुवारीला कृषी विभागाला दिले होते. आठवडा होऊनही कारवाई न झाल्याने शेतकºयांंनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी तो हाणून पाडत त्यांना ताब्यात घेतले. राज्यात ३४ लाख ५५ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशी पिकांवर गुलाबी बोंडअळीने आक्रमण केले. परिणामी, १ लाख ८१ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड केलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकºयांचे कंबरडेच मोडले आहे.आंदोलनास पाठिंबाआत्मदहन आंदोलनाला मराठा मावळा संघटनेने पाठिंबा दिला आहे. दरम्यान मदत तात्काळ न मिळाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकºयांंनी दिला.