शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
3
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
4
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
5
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
6
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
7
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
8
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
9
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
10
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
11
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
12
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
13
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
14
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
15
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
16
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
17
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
18
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
19
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
20
Shefali Jariwala : "हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य

औरंगाबादेत शेतक-यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 23:51 IST

कपाशीवरील बोंडअळीग्रस्त शेतक-यांच्या खात्यात मदत जमा करण्याच्या हिवाळी अधिवेशनातील घोषणेला दोन महिने झाले. मदत शेतक-यांंच्या खात्यात त्वरित जमा करावी, या मागणीसाठी कृषी विभाग कार्यालयासमोर शेतकºयांनी बुधवारी दुपारी आत्मदहनाचा प्रयत्न केला. क्रांतीचौक पोलिसांनी तत्परता दाखवून अंगावर रॉकेल ओतून घेतलेल्या शेतकºयांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.

ठळक मुद्देक्रांतीचौकात उडाला थरार : ३७ शेतक-यांवर दंगलीचे गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कपाशीवरील बोंडअळीग्रस्त शेतक-यांच्या खात्यात मदत जमा करण्याच्या हिवाळी अधिवेशनातील घोषणेला दोन महिने झाले. मदत शेतक-यांंच्या खात्यात त्वरित जमा करावी, या मागणीसाठी कृषी विभाग कार्यालयासमोर शेतकºयांनी बुधवारी दुपारी आत्मदहनाचा प्रयत्न केला. क्रांतीचौक पोलिसांनी तत्परता दाखवून अंगावर रॉकेल ओतून घेतलेल्या शेतकºयांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी याप्रकरणी ३७ शेतक-यांवर दंगलीसह अन्य गुन्हे दाखल केले आहेत.क्रांतीचौकातील विभागीय सहसंचालक कार्यालयासमोर गंगापूर तालुक्यातून माजी सभापती संतोष जाधव (वजनापूरकर) यांच्यासह अनेक कार्यकर्ते आले. त्यांनी गळ्यात कपाशीच्या कैºयांच्या माळा घातल्या होत्या. बोंडअळीचे पंचनामे, क्रॉसपंचनामे होऊनही कृषी खाते जबाबदारी विमा कंपन्यांवर ढकलत आहे.दुसरीकडे शासन कागदोपत्रीच घोडे नाचवीत आहे, याचा निषेध करून संतोष पाटील जाधव यांनी लपवून आणलेली रॉकेलची बॉटली अंगावर ओतण्यास सुरुवात केली. पोलीस पथकाने त्वरित त्यांच्या हातातून बाटली हिसकावली. शेतकºयांनी ‘बोंडअळीग्रस्त शेतकºयांंच्या बँक खात्यात अनुदान त्वरित जमा करा’ अशी घोषणाबाजी सुरू केली. या वेळेत चार ते पाच शेतकºयांंनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. सर्व शेतकºयांना ताब्यात घेत १० ते १५ मिनिटे चाललेल्या नाट्यावर पोलिसांनी पडदा टाकला. आंदोलनातील ३७ शेतकºयांना पोलिसांनी ताब्यात घेऊन गाडीत कोंबले. यावेळी आंदोलनात बबन डुबे (संभाजी सेना), महेश गुजर (शेकाप), युवराज ताठे, भावराव लोहकरे, सुभाष जगताप, काकासाहेब डुबे, अण्णासाहेब जाधव (मनसे तालुकाध्यक्ष), ज्ञानेश्वर तिवाडे, राजू तिखे, संजय चव्हाण, पंडित खेडकर, अप्पासाहेब जगदाळे आदी शेतकºयांची उपस्थिती होती. क्रांतीचौक ठाण्यात दंगलीचे गुन्हे दाखल केले आहेत.आंदोलनाचे पत्र दिले ७ रोजीतक-यांनी आंदोलनाचे पत्र ७ फेब्रुवारीला कृषी विभागाला दिले होते. आठवडा होऊनही कारवाई न झाल्याने शेतकºयांंनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी तो हाणून पाडत त्यांना ताब्यात घेतले. राज्यात ३४ लाख ५५ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशी पिकांवर गुलाबी बोंडअळीने आक्रमण केले. परिणामी, १ लाख ८१ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड केलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकºयांचे कंबरडेच मोडले आहे.आंदोलनास पाठिंबाआत्मदहन आंदोलनाला मराठा मावळा संघटनेने पाठिंबा दिला आहे. दरम्यान मदत तात्काळ न मिळाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकºयांंनी दिला.