शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

२५ मेपासून सुरू होणार शेतकऱ्यांची शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 23:55 IST

पेरणीपूर्व ते पीक काढणीपर्यंतची तंत्रशुद्ध पद्धती, नवतंत्रज्ञान याची इत्यंभूत माहिती देण्यासाठी २५ मेपासून शेतकऱ्यांची शाळा सुरू होणार आहे. विभागातील औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांत मिळून २६५२ कृषिशाळा घेण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देकृषी विभाग : औरंगाबाद विभागात २६५२ कृषिशाळेचे नियोजन

औरंगाबाद : पेरणीपूर्व ते पीक काढणीपर्यंतची तंत्रशुद्ध पद्धती, नवतंत्रज्ञान याची इत्यंभूत माहिती देण्यासाठी २५ मेपासून शेतकऱ्यांची शाळा सुरू होणार आहे. विभागातील औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांत मिळून २६५२ कृषिशाळा घेण्यात येणार आहेत.कृषिशाळा घेण्याची जबाबदारी कृषी विभाग, नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व आत्मा या तीन यंत्रणांवर टाकण्यात आली आहे. ९० टक्के शेतकरी असे आहेत की, ते पारंपरिक पद्धतीने शेती करतात. त्यांनी अत्याधुनिक शिक्षण घेतलेले नाही. शेतीक्षेत्रातील नवनवीन शोधाची माहिती शेतकºयांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषिशाळा घेण्याचा निर्णय कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी खरीपपूर्व हंगाम बैठकीत जाहीर केला होता. कृषिशाळेमध्ये पेरणीपूर्व, पीक पेरणी, पीक वाढीची अवस्था, काढणी व काढणी पश्चात असे टप्पे ठरविण्यात आले आहेत. शेतकºयांना सक्षम करण्यासाठी कृषिशाळेच्या माध्यमातून नवे तंत्रज्ञान थेट बांधावर पोहोचविले जाणार आहे. या प्रक्रियेत विद्यापीठातील शास्त्रज्ञ आणि कंपन्यांच्या तज्ज्ञ अभ्यासकांची मदत घेतली जाणार आहे. प्रत्येक कृषी सहायक व कृषी पर्यवेक्षकांमार्फत प्रत्येकी एका गावात कृषिशाळा घ्यावी, असे आदेश आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात ४०३ कर्मचारी ६२६ गावांत ८६९ कृषिशाळा घेणार आहेत. जालना जिल्ह्यात ३५४ कर्मचारी ५७९ गावांत ८२३ कृषिशाळा, तर बीड जिल्ह्यात ४२४ कर्मचारी ६८४ गावांत ९६० कृषिशाळा घेणार आहेत. विभागात एकूण ११८१ कर्मचारी १८८९ गावांत २६५२ कृषिशाळा घेणार आहेत. २५ मेपासून कृषिशाळेला सुरुवात होईल.प्रत्यक्ष शेतावरच प्रात्यक्षिकासह शेतकºयांना माहिती देण्यात येणार आहे. कृषी विभागातर्फे कापूस पिकावरील ६३५, सोयाबीन १६२, मका ११३, तूर १०४, तर उसावरील २८ शेतीशाळा घेणार आहेत. याशिवाय नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाद्वारे १५२६, तर आत्माद्वारे ८४ कृषिशाळा घेण्यात येतील.अळीच्या प्रादुर्भावाची स्थिती लगेच कळेलयंदा मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्याची भीती कृषी विभागाने व्यक्त केली आहे. कृषी अधिकारी, कर्मचारी व शेतकरी कृषिशाळेच्या निमित्ताने दिवसभर शेतावर असणार आहेत. पेरणीनंतर पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाला, तर लगेच त्याची माहिती कृषी आयुक्त, कृषी विद्यापीठ यांना कळविण्यात येणार आहे. त्यासाठी खास अ‍ॅपही तयार करण्यात आले आहे. यावर काय उपाययोजना करायची, ते शास्त्रज्ञ लगेच सांगणार आहेत. यामुळे पिकांवरील अळीला वेळीच रोखण्यास मदत होऊ शकते.चौकट१७ वर्षांनंतर भरणार कृषिशाळाखरीप हंगामापूर्वी कृषिशाळा भरविण्याची कृषी विभागाची ही पहिलीच वेळ नव्हे. यापूर्वी २००३ मध्ये कृषी विभागाचे तत्कालीन आयुक्त सुधीरकुमार गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात कृषिशाळा भरविण्यात आला होत्या. हा प्रयोग यशस्वी झाला होता. त्यानंतर तब्बल १७ वर्षांनंतर कृषिशाळा भरविण्यात येत आहेत.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी