शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

२०० एकरांतील पिकांवर शेतकऱ्यांनी फिरविला नांगर

By admin | Updated: July 5, 2017 23:34 IST

पालम : पावसाअभावी पेरणी केलेले सोयाबीन वाळून गेल्याने पुयनी शिवारातील २०० एकरांवरील पिकावर शेतकऱ्यांनी नांगर फिरविला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम : पावसाअभावी पेरणी केलेले सोयाबीन वाळून गेल्याने पुयनी शिवारातील २०० एकरांवरील पिकावर शेतकऱ्यांनी नांगर फिरविला आहे. त्यामुळे पेरणीचा खर्च आणि मेहनत वाया गेली असून या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसावर पालम तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या. महागामोलाचे बियाणे खरेदी करून या पेरण्या करण्यात आल्या. सोयाबीन आणि कापसाची लागवड केली. मात्र त्यानंतर पावसाने दगा दिला. पंधरा दिवसांपासून पावसाचा एक थेंबही पडला नाही. पेरणी केलेले बियाणे अंकुरले परंतु, पाऊस नसल्याने ही पिके वाळू लागली आहेत. पुयनी परिसरात गंभीर स्थिती निर्माण झाली असून २०० एकर क्षेत्रावरील सोयाबीन पूर्णत: वाळून जाण्याच्या स्थितीत आले आहे. त्यामुळे हे सोयाबीन आता तग धरणार नसल्याने शेतकऱ्यांनी रानात पाळी घालण्यास सुरुवात केली आहे. पाळी घालून पेरलेले सोयाबीन काढून टाकले जात आहे. शेतकऱ्यांनी आता दुबार पेरणीची तयारी सुरू केली आहे. बागायती नसलेल्या शेतात कापूस मोडण्यास सुरुवात झाली आहे.