शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

पट्टीसाठी शेतकर्‍यांची हेळसांड

By admin | Updated: May 24, 2014 00:44 IST

नांदेड : गत काही दिवसांपासून बाजारावर तेजी नसल्याने शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार मंद गतीने सुरु आहेत.

नांदेड : गत काही दिवसांपासून बाजारावर तेजी नसल्याने शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार मंद गतीने सुरु आहेत. विक्री केलेल्या शेतमालाचे पैसे विशिष्ट वेळेत देण्याचा नियम व्यापार्‍यांकडून धाब्यावर बसविण्यात येत आहे. यामुळे शेतकर्‍यांना पैशासाठी खाजगी सावकाराचे उंबरठे झिझवावे लागत आहेत. या प्रकाराकडे मात्र बाजार समिती प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीतंर्गत नवा मोंढा बाजारात हळदीसह भुईमूग, ज्वारी, गहू आदी पिकांची आवक सुरु आहे. त्यात हळदीची आवक प्रचंड असल्याने खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर परिणाम झाला आहे. आडत्याने आपल्याकडील शेतमालाची खुल्या पद्धतीने विक्री करु नये, असा लिखित नियम बाजार समिती प्रशासनाने काढला आहे. यामुळे प्रत्येक आडत दुकानदार बीटाद्वारेच पक्या पावतीद्वारे हळदीची विक्री करीत आहे. मात्र एका आडत दुकानावर बीट येण्यासाठी पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी लागत आहे. ज्या शेतकर्‍यांचा शेतमाल लिलावामध्ये विक्री केला. त्या शेतकर्‍यांना आडत व्यापार्‍यांनी चोवीस तासांच्या आत पट्टी देण्याचा नियम आहे. परंतु शेतमालाची विक्री करुनही पंधरा ते पंचवीस दिवस शेतकर्‍यांना पैसे मिळत नाहीत. या प्रकाराने शेतकरी पुरता हताश झाला आहे. बाजारात पैशांचा तुटवडा निर्माण झाल्याचे कारण दाखव खरेदीदारही खरेदीकडे पाठ फिरवत आहेत.परिणाम शेतमाल मोंढ्यात आणूनही विक्री होण्यासाठी पंधरा ते वीस दिवस वाट पाहत लागत आहे. शेतकर्‍यांनी एकाच वेळी विक्रीसाठी हळद बाजारात आणल्याने व्यापार्‍यांना खरेदीदारांची मनधरणी करावी लागत आहे. बीट येण्यासाठी पंधरा ते वीस दिवस तर विक्री केलेल्या हळदीचे माप करण्यासाठी पुन्हा दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी लागतो. त्यानंतर शेतमालाची पट्टीही पंधरा ते वीस दिवसांपर्यंत येत नाही. शेतमाल विक्रीसाठी मोंढा बाजारात आणूनही पैशासाठी एक ते दीड महिन्यांचा कालावधी लागत असल्याने शेतकरी हैराण झाला आहे. खरीप पेरणीचा हंगाम जवळ येवून ठेपल्याने खत-बियाणाच्या खरेदीसाठी शेतकर्‍यांपुढे अडचणी वाढत आहेत. (प्रतिनीधी)शेतकर्‍यांनी विक्री केलेल्या शेतमालाची पट्टी चोवीस तासांत देण्याचा नियम आहे, परंतु शेतकर्‍यांना पंधरा ते वीस दिवसांपर्यंत व्यापार्‍यांकडून पैसे देण्यास टाळाटाळ केली जात आहे. खरीप हंगाम जवळ आल्यामुळे व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांना शेतमालाचे तत्काळ पैसे द्यावेत, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले यांनी दिला आहे.