शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

पट्टीसाठी शेतकर्‍यांची हेळसांड

By admin | Updated: May 24, 2014 00:44 IST

नांदेड : गत काही दिवसांपासून बाजारावर तेजी नसल्याने शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार मंद गतीने सुरु आहेत.

नांदेड : गत काही दिवसांपासून बाजारावर तेजी नसल्याने शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार मंद गतीने सुरु आहेत. विक्री केलेल्या शेतमालाचे पैसे विशिष्ट वेळेत देण्याचा नियम व्यापार्‍यांकडून धाब्यावर बसविण्यात येत आहे. यामुळे शेतकर्‍यांना पैशासाठी खाजगी सावकाराचे उंबरठे झिझवावे लागत आहेत. या प्रकाराकडे मात्र बाजार समिती प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीतंर्गत नवा मोंढा बाजारात हळदीसह भुईमूग, ज्वारी, गहू आदी पिकांची आवक सुरु आहे. त्यात हळदीची आवक प्रचंड असल्याने खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर परिणाम झाला आहे. आडत्याने आपल्याकडील शेतमालाची खुल्या पद्धतीने विक्री करु नये, असा लिखित नियम बाजार समिती प्रशासनाने काढला आहे. यामुळे प्रत्येक आडत दुकानदार बीटाद्वारेच पक्या पावतीद्वारे हळदीची विक्री करीत आहे. मात्र एका आडत दुकानावर बीट येण्यासाठी पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी लागत आहे. ज्या शेतकर्‍यांचा शेतमाल लिलावामध्ये विक्री केला. त्या शेतकर्‍यांना आडत व्यापार्‍यांनी चोवीस तासांच्या आत पट्टी देण्याचा नियम आहे. परंतु शेतमालाची विक्री करुनही पंधरा ते पंचवीस दिवस शेतकर्‍यांना पैसे मिळत नाहीत. या प्रकाराने शेतकरी पुरता हताश झाला आहे. बाजारात पैशांचा तुटवडा निर्माण झाल्याचे कारण दाखव खरेदीदारही खरेदीकडे पाठ फिरवत आहेत.परिणाम शेतमाल मोंढ्यात आणूनही विक्री होण्यासाठी पंधरा ते वीस दिवस वाट पाहत लागत आहे. शेतकर्‍यांनी एकाच वेळी विक्रीसाठी हळद बाजारात आणल्याने व्यापार्‍यांना खरेदीदारांची मनधरणी करावी लागत आहे. बीट येण्यासाठी पंधरा ते वीस दिवस तर विक्री केलेल्या हळदीचे माप करण्यासाठी पुन्हा दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी लागतो. त्यानंतर शेतमालाची पट्टीही पंधरा ते वीस दिवसांपर्यंत येत नाही. शेतमाल विक्रीसाठी मोंढा बाजारात आणूनही पैशासाठी एक ते दीड महिन्यांचा कालावधी लागत असल्याने शेतकरी हैराण झाला आहे. खरीप पेरणीचा हंगाम जवळ येवून ठेपल्याने खत-बियाणाच्या खरेदीसाठी शेतकर्‍यांपुढे अडचणी वाढत आहेत. (प्रतिनीधी)शेतकर्‍यांनी विक्री केलेल्या शेतमालाची पट्टी चोवीस तासांत देण्याचा नियम आहे, परंतु शेतकर्‍यांना पंधरा ते वीस दिवसांपर्यंत व्यापार्‍यांकडून पैसे देण्यास टाळाटाळ केली जात आहे. खरीप हंगाम जवळ आल्यामुळे व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांना शेतमालाचे तत्काळ पैसे द्यावेत, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले यांनी दिला आहे.