शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंनी ज्याची सुपारी घेतली, त्याची वाजवावी तर लागेलच! जयंत पाटलांनी काढला फडणवीसांचा जुना व्हिडीओ
2
'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्यूत्तर; किनी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण
3
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
4
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा, आनंदाचा दिवस
5
बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता
6
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
7
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
8
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
9
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
10
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
11
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे
12
सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर; पुष्करसिंह धामी यांची टीका
13
४ जूनला भाजपा जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल: शशी थरूर, देशभरात हवा बदलल्याचा दावा
14
मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले
15
चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
16
पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले
17
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
18
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
19
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
20
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 

प्रकल्प प्रेरणातून शेतक-यांना ‘बळ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 11:17 PM

लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : आस्मानी-सुलतानी संकटामुळे बळीराजा मृत्यूस कवटाळत आहे. शेतकºयांच्या आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. जिल्ह्यात ...

ठळक मुद्देसमुपदेशन : आरोग्य सेवा कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : आस्मानी-सुलतानी संकटामुळे बळीराजा मृत्यूस कवटाळत आहे. शेतकºयांच्या आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. जिल्ह्यात जानेवारी ते सप्टेंबर २०१७ मध्ये एकूण ३७ शेतकºयांनी आत्महत्या केल्याची शासन दरबारी नोंद आहे. शेतकºयांच्या वाढत्या आत्महत्याचे प्रमाण लक्षात घेता, त्यांना मानसिक बळ देऊन जगण्याच्या प्रेरणेसाठी जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेमार्फत ‘प्रकल्प प्रेरणा शेतकरी समुपदेशन’ आरोग्य सेवा कार्यक्रम राबविला जात आहे.मानसिक दडपणाखाली जीवन जगताना आत्महत्येसारखे विचार मनात येतात. अशा व्यक्तीचे वेळीच समुपदेशन व उपचार केल्यास त्यास आत्महत्येपासून दूर करता येते. यासाठी शेतकरी आत्महत्येचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन शासनाने हा उपक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबियांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रेरणा प्रकल्प समुपदेशन कार्यक्रम राबविला जात आहे. जानेवारी २०१६ ते सप्टेंबर २०१७ या कालावधीत एकूण ३ हजार ५६४ जणांच्या भेटी प्रकल्पाद्वारे घेतल्या. या सर्वांचे समुपदेशन करण्यात आले असून त्यांना औषधोपचार दिले. आशा वर्कर व प्रकल्प प्रेरणा यंत्रणेमार्फत सध्या शेतकरी कुटुंबांच्या भेटींचे नियोजन केले जात आहे. परंतु सदर कामे करताना स्वतंत्र वाहनच उपलब्ध नाही. वाहन उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी पाठपुरावा सुरू असल्याचे जिल्हा रूग्णालयातर्फे सांगण्यात आले. बाह्यसंपर्कातील १ हजार १५७ तसेच १ हजार ९९५ जणांचे संबंधित यंत्रणेमार्फत समुपदेशन करण्यात आले आहे.