शहरं
Join us  
Trending Stories
1
बँकांतील सायबर गुन्ह्यांमध्ये ३०० टक्के वाढ; ३६ हजार ग्राहकांना ३०,००० कोटींचा आर्थिक फटका
2
सर्वसामान्यांची लाल परी झाली ७६ वर्षांची! वर्धापन दिनानिमित्त एसटी स्थानके रांगोळीने सजणार
3
२० मेडिकल कॉलेजांना आयोगाने ठोठावला दंड; त्रुटी दूर करण्यासाठी दिला २ महिन्यांचा अवधी
4
प्रसारमाध्यमांकडे तक्रार केल्याने विद्यार्थ्यांवर कारवाई; विद्यापीठाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका
5
कर्जबुडवे विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सीवरून विशेष न्यायालयाची ईडीवर टीका
6
मुंबई विद्यापीठाचा बीए सत्र सहाचा निकाल ४९ टक्के; यंदा ४८०६ विद्यार्थी झाले अनुत्तीर्ण
7
मोठी बातमी: मुंबईतील ताज हॉटेल आणि विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक
8
इस्रायलच्या कंपनीचा लोकसभा निवडणुकीत हस्तक्षेप, ChatGPT बनवणाऱ्या कंपनीचा मोठा दावा...
9
मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; जम्बो ब्लॉकदरम्यान गैरसोय टाळण्यासाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
10
बीडमध्ये पुन्हा एसीबीचा ट्रॅप; केजच्या तहसीलदारासह कोतवाल जाळ्यात
11
जीवघेणी गरमी; इलेक्शन ड्युटीवर गेलेल्या 22 कर्मचाऱ्यांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक....
12
हजारो वारकऱ्यांना CM एकनाथ शिंदेंचा एक कॉल; "पांडुरंगाचा सेवक म्हणून सेवा करणार"
13
नाना पटोलेंनी शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट मुख्यमंत्र्यांना फोन केला; पुढे काय घडलं?
14
'आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्या...'; मोदींच्या ध्यान-धारणेवरून निवडणूक आयोगाचा PMO ला सल्ला
15
पुढचे ४ आठवडे पाकिस्तानी खेळाडूंवर टीका नको; PCB अध्यक्षांची कळकळीची विनंती
16
ऐतिहासिक पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मंदिरातील तळघरात आतापर्यंत काय काय सापडलं?
17
Paris Olympics 2024 : निशांतची ऑलिम्पिकमध्ये एन्ट्री! असं करणारा ठरला पहिला भारतीय पुरूष बॉक्सर
18
एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेस सहभागी होणार नाही; पक्ष हायकमांडचा निर्णय
19
Mr. & Mrs. Mahi Movie Review : राजकुमार राव-जान्हवी कपूरच्या अभिनयाचा 'षटकार'
20
मराठवाड्यात महायुतीला मिळणार भोपळा?; मुंडे, दानवेही पडणार, चंद्रकांत खैरेंचा दावा

शेतकरी संघटनांचा नवा राजकीय पक्ष - रघुनाथ पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 12:03 AM

प्रस्थापित राजकीय पक्षांना पर्याय निर्माण करण्यासाठी देशभरातील शेतकरी संघटना एकत्र येऊन नवा राजकीय पक्ष स्थापन करणार आहेत, अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.

औरंगाबाद : प्रस्थापित राजकीय पक्षांना पर्याय निर्माण करण्यासाठी देशभरातील शेतकरी संघटना एकत्र येऊन नवा राजकीय पक्ष स्थापन करणार आहेत, अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.काँग्रेसने शेतीमालाला भाव दिला नाही म्हणून भाजपाला निवडून आणले; मात्र सत्तेत आल्यावर त्यांनी स्वामीनाथन आयोग लागू करता येणार नाही, असे शपथपत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केले. सरकारचे धोरण शेतक-यांचे मरण असेल, तर या प्रस्थापितांच्या विरोधात नवीन पर्याय निर्माण करण्याशिवाय आमच्यासमोर गत्यंतर नाही. देशभरातील शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन शेतकºयांचा नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही देशभरात उमेदवार उभे करणार आहोत, असे पाटील यांनी सांगितले.अजून नवीन पक्षाचे नाव निश्चित केले नाही. पुढील आठवड्यात अलाहाबाद येथे देशभरातील शेतकरी संघटनांची बैठक आहे. तीत राजकीय पक्षाच्या नावासंदर्भात चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.शरद जोशी ते राजू शेट्टीशेतकरी नेत्यांनी राजकीय पक्ष काढण्याचा प्रयोग यापूर्वीही झालेला आहे. शेतकºयांचे नेते शरद जोशी यांनी ‘स्वतंत्र भारत पक्ष’ स्थापन करून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले होते. ते स्वत:ही नांदेडमधून निवडणूक लढले. मात्र पराभूत झाले. त्यानंतर राजू श्ोट्टी यांनी ‘स्वाभिमानी शेतकरी संघटना’ स्थापन करून लोकसभेची निवडणूक लढविली आणि दुसºयांदा ते विजयी झाले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र