लातूर : औसा तालुक्यातील हिप्परसोगा येथील सिंगल फेज डीपीचे काम वर्षभरापूर्वी करण्यात आले आहे. परंतु, ते निकृष्ट दर्जाचे झाल्याने सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याचा आरोप शेतकरी संघटना व हिप्परसोगा ग्रामस्थांनी केला आहे. त्याअनुषंगाने बुधवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. हिप्परसोगा येथे सिंगल फेज डीपीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. परंतु, ते निकृष्ट झाल्याने सतत वीज गायब असते. शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या पंपासाठी वीजपुरवठा होणारा ट्रान्सफार्मरही व्यवस्थित नाही. पोल आणायचे असेल तर भाडेही शेतकऱ्यांनाच द्यावे लागते, असा आरोप ग्रामस्थ व शेतकरी संघटनेने केला आहे. तातडीने यात लक्ष घालून महावितरणने कार्यवाही न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला. आंदोलनात शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मदन सोमवंशी, माजी जिल्हा प्रमुख माधवराव मल्लेशे, माजी सरपंच हेमंत पाटील, जि.प. सदस्य पांडुरंग चेवले, चक्रधर शेळके, नरसिंग पाटील, विठ्ठल संपत्ते, नरसिंग सोमवंशी, जगजीवन सोमवंशी, तुकाराम सोमवंशी, विठ्ठल सोमवंशी, गुंडेराव चेवले, मारुती मगर, नागोराव आळंदकर, संभाजी यादव, रामेश्वर यादव, धनराज सोमवंशी, विलास आळंदकर, प्रकाश सोमवंशी यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व ग्रामस्थ सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
विजेसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन
By admin | Updated: June 19, 2014 00:18 IST