शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

विजेच्या समस्येवर तोडग्यासाठी पैठण तहसीलवर शेतकऱ्यांचा मोर्चा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 20:35 IST

शेतातील कृषी पंपाचा वीजपुरवठा आठ तास ऐवजी चार तासच करण्यात आला आहे.

पैठण (औरंगाबाद ) : पैठण येथील तहसील कार्यालयावर शुक्रवारी छावा क्रांतिवीर सेना व शेतकऱ्यांच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. यावेळी विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.  तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील कृषी पंपाचा वीजपुरवठा आठ तास ऐवजी चार तासच करण्यात आला. हा शेतकऱ्यांवर अन्याय असून याविरूद्ध पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट असल्याने छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने पैठण तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

यावेळी नायब तहसीलदार नानासाहेब फोलाने यांना निवेदन देण्यात आले. त्यात नमुद केले की, शेतातील कृषी पंपाचा वीज पुरवठा पूर्ववत सुरळीत करावा, दुष्काळजन्य परिस्थितीत शेतकऱ्यांना पेन्शन योजना चालू करावी, कारखान्याने थकविलेले ऊसाचे बिले तत्काळ जमा करण्यात यावे, ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजना लवकरात लवकर मार्गी लावावी, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यात याव्या अशा विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. प्रशासनाने दखल घेतली नाही तर आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. 

यावेळी शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अनिल राऊत, मराठवाडा अध्यक्ष रामेश्वर बावणे, अविनाश गायकवाड, भगवान सोरमारे, सागर बिराजदार, किशोर देवघरे, मुक्ताराम मोटे, दिलीप मोटे, योगेश बखले, बळीराम बाबर, अनिल मगरे, भीमशक्ती तालुकाध्यक्ष भाऊराव धरम, बबरु कदम, मोहन कणसे, सुरेश कणसे, रावसाहेब बावणे, राकेश वाघे, अविनाश राऊत, सजन भोसले शिवाजी पाटील साबळे, सुनील खोमणे, कृष्णा पाटणकर, दिनेश देवघरे, कृष्णा बावणे, वैजनाथ देवघरे, धनंजय सोनवणे, संजय मस्के, आकाश संत, अमोल बोंबले, प्रतीक सोनवणे, रामेश्वर निर्मळ, राजू ननवरे, बळीराम बाबर यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

टॅग्स :FarmerशेतकरीelectricityवीजMorchaमोर्चा