शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

विजेच्या समस्येवर तोडग्यासाठी पैठण तहसीलवर शेतकऱ्यांचा मोर्चा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 20:35 IST

शेतातील कृषी पंपाचा वीजपुरवठा आठ तास ऐवजी चार तासच करण्यात आला आहे.

पैठण (औरंगाबाद ) : पैठण येथील तहसील कार्यालयावर शुक्रवारी छावा क्रांतिवीर सेना व शेतकऱ्यांच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. यावेळी विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.  तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील कृषी पंपाचा वीजपुरवठा आठ तास ऐवजी चार तासच करण्यात आला. हा शेतकऱ्यांवर अन्याय असून याविरूद्ध पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट असल्याने छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने पैठण तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

यावेळी नायब तहसीलदार नानासाहेब फोलाने यांना निवेदन देण्यात आले. त्यात नमुद केले की, शेतातील कृषी पंपाचा वीज पुरवठा पूर्ववत सुरळीत करावा, दुष्काळजन्य परिस्थितीत शेतकऱ्यांना पेन्शन योजना चालू करावी, कारखान्याने थकविलेले ऊसाचे बिले तत्काळ जमा करण्यात यावे, ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजना लवकरात लवकर मार्गी लावावी, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यात याव्या अशा विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. प्रशासनाने दखल घेतली नाही तर आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. 

यावेळी शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अनिल राऊत, मराठवाडा अध्यक्ष रामेश्वर बावणे, अविनाश गायकवाड, भगवान सोरमारे, सागर बिराजदार, किशोर देवघरे, मुक्ताराम मोटे, दिलीप मोटे, योगेश बखले, बळीराम बाबर, अनिल मगरे, भीमशक्ती तालुकाध्यक्ष भाऊराव धरम, बबरु कदम, मोहन कणसे, सुरेश कणसे, रावसाहेब बावणे, राकेश वाघे, अविनाश राऊत, सजन भोसले शिवाजी पाटील साबळे, सुनील खोमणे, कृष्णा पाटणकर, दिनेश देवघरे, कृष्णा बावणे, वैजनाथ देवघरे, धनंजय सोनवणे, संजय मस्के, आकाश संत, अमोल बोंबले, प्रतीक सोनवणे, रामेश्वर निर्मळ, राजू ननवरे, बळीराम बाबर यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

टॅग्स :FarmerशेतकरीelectricityवीजMorchaमोर्चा