शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

उच्चदाब वितरण प्रणालीतून वीज जोडणीसाठी शेतकऱ्यांची सत्त्वपरीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 16:35 IST

उच्चदाब वितरण प्रणालीतून (एचव्हीडीएस) विजेच्या जोडणीसाठी आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागेल, हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. 

- विजय सरवदे 

औरंगाबाद : औरंगाबादजालना या दोन दुष्काळी जिल्ह्यांतील कृषिपंपांना उच्चदाब वितरण प्रणालीतून (एचव्हीडीएस) विजेच्या जोडणीसाठी आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागेल, हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. 

अगोदर या योजनेतून वीज जोडणी देण्यासाठी स्वातंत्र्यदिनाचा (१५ आॅगस्ट) मुहूर्त शोधला होता. त्यानंतर १६ आॅक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातूनच या योजनेचे उद्घाटन केले. प्रत्यक्षात मात्र, अजूनही ११ केव्ही ही उच्चदाब वाहिनीच वावरापर्यंत पोहोचलेली नाही. यासंबंधीची कामे करण्यासाठी कंत्राटदार निश्चित झालेले नाहीत. ही योजना राबविण्यासाठी महावितरणला सलग तीन वेळा निविदा प्रक्रिया राबवावी लागली. निविदांमधील दरसूची ही परवडणारी नसल्यामुळे कंत्राटदारांकडून प्रतिसादच मिळत नाही. त्यामुळे आता महावितरणने या योजनेसाठी प्रजासत्ताक दिनाचा (२६ जानेवारी) मुहूर्त तरी साधावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे, हे विशेष!

३१ मार्च २०१८ पर्यंत पैसे भरलेल्या जिल्ह्यातील ९ हजार २१४ तर जालना जिल्ह्यातील १० हजार ८४ शेतकऱ्यांना उच्चदाब वितरण प्रणालीतून (एचव्हीडीएस) वीज जोडणी देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. मागील ७ महिन्यांपासून शेतकऱ्यांचे डोळे या योजनेकडे लागले आहेत. या योजनेंतर्गत एका रोहित्रावर जास्तीत जास्त दोन किंवा तीन कृषिपंपांना वीज जोडणी दिली जाणार आहे. त्यामुळे सतत वीजपुरवठा खंडित होण्याच्या कटकटीपासून शेतकऱ्यांची कायमची सुटका होणार आहे. वीज चोरीपासून सुटका होणार आहे. या योजनेंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात १६८ कोटी ८ लाख रुपये, तर जालना जिल्ह्यात १८३ कोटी ८८ लाख रुपयांची कामे केली जाणार आहेत.

मात्र, या योजनेसाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेवरच कंत्राटदारांनी बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे जुलैपासून तीन वेळा निविदा प्रक्रिया राबविल्यानंतरही कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळत नाही. निविदांमधील विद्युत साहित्यांचा दर हा बाजारभावापेक्षा कमी असल्यामुळे कंत्राटदारांनी या योजनेच्या कामांवर राज्यभर बहिष्कार टाकलेला आहे.

उच्चदाब वितरण प्रणालीचे फायदेसध्या ६५ ते १०० केव्हीए क्षमतेच्या एका रोहित्रावरून २० ते २५ कृषिपंपांसाठी वीजपुरवठा केला जातो. सध्या सर्रासपणे आकडे टाकून कृषिपंपांना विजेचा वापर केला जातो. आता यापुढे उच्चदाब प्रणालीत उच्चदाब वाहिन्यांवर आकडे टाकून कृषिपंपांना वीज चोरी करता येणार नाही. नव्या प्रणालीत एका रोहित्रावरून दोन किंवा जास्तीत जास्त तीनच कृषिपंपांना वीज जोडणी दिली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अखंडित व योग्य दाबाने वीजपुरवठा होईल. उच्चदाब प्रणालीमुळे वीज हानीसुद्धा कमी होणार आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीmahavitaranमहावितरणAurangabadऔरंगाबादJalanaजालना