शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

उच्चदाब वितरण प्रणालीतून वीज जोडणीसाठी शेतकऱ्यांची सत्त्वपरीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 16:35 IST

उच्चदाब वितरण प्रणालीतून (एचव्हीडीएस) विजेच्या जोडणीसाठी आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागेल, हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. 

- विजय सरवदे 

औरंगाबाद : औरंगाबादजालना या दोन दुष्काळी जिल्ह्यांतील कृषिपंपांना उच्चदाब वितरण प्रणालीतून (एचव्हीडीएस) विजेच्या जोडणीसाठी आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागेल, हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. 

अगोदर या योजनेतून वीज जोडणी देण्यासाठी स्वातंत्र्यदिनाचा (१५ आॅगस्ट) मुहूर्त शोधला होता. त्यानंतर १६ आॅक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातूनच या योजनेचे उद्घाटन केले. प्रत्यक्षात मात्र, अजूनही ११ केव्ही ही उच्चदाब वाहिनीच वावरापर्यंत पोहोचलेली नाही. यासंबंधीची कामे करण्यासाठी कंत्राटदार निश्चित झालेले नाहीत. ही योजना राबविण्यासाठी महावितरणला सलग तीन वेळा निविदा प्रक्रिया राबवावी लागली. निविदांमधील दरसूची ही परवडणारी नसल्यामुळे कंत्राटदारांकडून प्रतिसादच मिळत नाही. त्यामुळे आता महावितरणने या योजनेसाठी प्रजासत्ताक दिनाचा (२६ जानेवारी) मुहूर्त तरी साधावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे, हे विशेष!

३१ मार्च २०१८ पर्यंत पैसे भरलेल्या जिल्ह्यातील ९ हजार २१४ तर जालना जिल्ह्यातील १० हजार ८४ शेतकऱ्यांना उच्चदाब वितरण प्रणालीतून (एचव्हीडीएस) वीज जोडणी देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. मागील ७ महिन्यांपासून शेतकऱ्यांचे डोळे या योजनेकडे लागले आहेत. या योजनेंतर्गत एका रोहित्रावर जास्तीत जास्त दोन किंवा तीन कृषिपंपांना वीज जोडणी दिली जाणार आहे. त्यामुळे सतत वीजपुरवठा खंडित होण्याच्या कटकटीपासून शेतकऱ्यांची कायमची सुटका होणार आहे. वीज चोरीपासून सुटका होणार आहे. या योजनेंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात १६८ कोटी ८ लाख रुपये, तर जालना जिल्ह्यात १८३ कोटी ८८ लाख रुपयांची कामे केली जाणार आहेत.

मात्र, या योजनेसाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेवरच कंत्राटदारांनी बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे जुलैपासून तीन वेळा निविदा प्रक्रिया राबविल्यानंतरही कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळत नाही. निविदांमधील विद्युत साहित्यांचा दर हा बाजारभावापेक्षा कमी असल्यामुळे कंत्राटदारांनी या योजनेच्या कामांवर राज्यभर बहिष्कार टाकलेला आहे.

उच्चदाब वितरण प्रणालीचे फायदेसध्या ६५ ते १०० केव्हीए क्षमतेच्या एका रोहित्रावरून २० ते २५ कृषिपंपांसाठी वीजपुरवठा केला जातो. सध्या सर्रासपणे आकडे टाकून कृषिपंपांना विजेचा वापर केला जातो. आता यापुढे उच्चदाब प्रणालीत उच्चदाब वाहिन्यांवर आकडे टाकून कृषिपंपांना वीज चोरी करता येणार नाही. नव्या प्रणालीत एका रोहित्रावरून दोन किंवा जास्तीत जास्त तीनच कृषिपंपांना वीज जोडणी दिली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अखंडित व योग्य दाबाने वीजपुरवठा होईल. उच्चदाब प्रणालीमुळे वीज हानीसुद्धा कमी होणार आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीmahavitaranमहावितरणAurangabadऔरंगाबादJalanaजालना