शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

शेतकर्‍यांची पिळवणूक

By admin | Updated: May 21, 2014 00:49 IST

मोहन बोराडे , सेलू मान्सून लवकर येणार असल्याच्या हवामान खात्याच्या वृत्तामुळे तालुक्यातील शेतकरी खरीपाच्या पिकासाठी लागणार्‍या विविध प्रकारच्या रासायनिक खतांची खरेदी करण्यासाठी रांगा करीत आहेत.

मोहन बोराडे , सेलू मान्सून लवकर येणार असल्याच्या हवामान खात्याच्या वृत्तामुळे तालुक्यातील शेतकरी खरीपाच्या पिकासाठी लागणार्‍या विविध प्रकारच्या रासायनिक खतांची खरेदी करण्यासाठी रांगा करीत आहेत. शहरातील व ग्रामीण भागातील कृषी केंद्र चालकांकडून रासायनिक खताच्या पक्क्या पावती शिवाय खत देण्यात येवून मुळ किंमती पेक्षा जास्त दराने खुलेआम विक्री होत आहे़ आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्‍याची खत खरेदीतही लुबाडणूक करण्यात येत आहे़ यंदा मान्सून वेळेआधी दाखल होण्याचे चिन्हे हवामान विभागाकडून वर्तविले जात असल्यामुळे तालुक्यातील शेतकरी रासायनिक खत खरेदी करण्यासाठी बाजारात येत आहेत़ परंतु, कृषी केंद्र चालकांकडून शेतकर्‍यांची अधिक मागणी असलेल्या खतांच्या गोणी मागे ५० ते २०० रूपयांपर्यंत अधिकचा दर सांगण्यात येत आहे़ खरीप हंगामासाठी शेतकर्‍यांना रासायनिक खताची गरज भासते़ ऐनवेळीच बाजारात खताची कृत्रिम टंचाई होण्याचा अनुभव शेतकर्‍यांना असल्यामुळे अगोदरच खत खरेदी करण्याचा शेतकर्‍यांचा प्रयत्न आहे़ परंतु, मागणी असलेल्या खताच्या गोणी मागे अधिकचे दर वसूल करून कच्च्या पावत्या कृषी केंद्र चालकाकडून दिल्या जात आहेत.सेलू व ग्रामीण भागातील वालूर सारख्या मोठया गावातील कृषी केंद्र चालकांनी विविध रासायनिक खताचा मोठया प्रमाणावर साठा करण्यात आला आहे़ जादा दराने बियाणे व खत विक्री करणार्‍या दुकानदारावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला असला तरी बाजारात मात्र बिनधास्तपणे जादा दराने खत विक्री केली जात आहे़ खताशिवाय सोयाबीन, काही कापूस बियाणांच्या पाकिटाची जादा दराने विक्री सर्रासपणे होत असल्याचे चित्र आहे़ युरिया, डि़ए़पी़ सुपर फ ॉस्फ ेट, १०:२६:२६ या आर सी एफ व नामांकित कंपनीच्या खतांना शेतकर्‍यांकडून मागणी अधिक आहे़ मान्सूनच्या तोंडावर खत खरेदीची शेतकर्‍यांची लगबग सुरू असतानाच अधिकचा दर वसूल केल्या जात असल्यामुळे शेतकर्‍यांचा नाईलाज झाला आहे. बाजारात रासायनिक खतांची चढया भावाने विक्री केली जात आहे़ दुकानदारांकडून शेतकर्‍यांना कच्च्या पावत्या देण्यात येत आहेत.बियाणे व खताविषयी शेतकर्‍यांना तालुका कृषी अधिकारी व पंचायत समितीच्या कृषी विभागाकडून कुठलीही माहिती व मार्गदर्शन मिळत नाही़ काही शेतकरी या बाबत चौकशी करतात मात्र संबंधित विभागाकडून कानावर हात ठेवले जातात़ गतवर्षी खरीप व रबी हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे हे दोन्हीही हंगाम शेतकर्‍यांच्या दृष्टीने लाभदायक नव्हते़ रबी हंगामात गारपीटीने हातची पिके गेली. या वर्षी खरीप हंगामात गतवर्षीची कसर भरून काढण्याचा प्रयत्न शेतकर्‍यांचा आहे परंतु, खरीप हंगामासाठी लागणार्‍या रासायनिक खत खरेदीत अधिकचा दर शेतकर्‍यांना मोजावा लागत आहे़ सर्वसामान्य शेतकरी खत मिळेल की नाही या भीतीपोटी अगोदरच खत खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहे.