शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

शेतकर्‍यांची पिळवणूक

By admin | Updated: May 21, 2014 00:49 IST

मोहन बोराडे , सेलू मान्सून लवकर येणार असल्याच्या हवामान खात्याच्या वृत्तामुळे तालुक्यातील शेतकरी खरीपाच्या पिकासाठी लागणार्‍या विविध प्रकारच्या रासायनिक खतांची खरेदी करण्यासाठी रांगा करीत आहेत.

मोहन बोराडे , सेलू मान्सून लवकर येणार असल्याच्या हवामान खात्याच्या वृत्तामुळे तालुक्यातील शेतकरी खरीपाच्या पिकासाठी लागणार्‍या विविध प्रकारच्या रासायनिक खतांची खरेदी करण्यासाठी रांगा करीत आहेत. शहरातील व ग्रामीण भागातील कृषी केंद्र चालकांकडून रासायनिक खताच्या पक्क्या पावती शिवाय खत देण्यात येवून मुळ किंमती पेक्षा जास्त दराने खुलेआम विक्री होत आहे़ आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्‍याची खत खरेदीतही लुबाडणूक करण्यात येत आहे़ यंदा मान्सून वेळेआधी दाखल होण्याचे चिन्हे हवामान विभागाकडून वर्तविले जात असल्यामुळे तालुक्यातील शेतकरी रासायनिक खत खरेदी करण्यासाठी बाजारात येत आहेत़ परंतु, कृषी केंद्र चालकांकडून शेतकर्‍यांची अधिक मागणी असलेल्या खतांच्या गोणी मागे ५० ते २०० रूपयांपर्यंत अधिकचा दर सांगण्यात येत आहे़ खरीप हंगामासाठी शेतकर्‍यांना रासायनिक खताची गरज भासते़ ऐनवेळीच बाजारात खताची कृत्रिम टंचाई होण्याचा अनुभव शेतकर्‍यांना असल्यामुळे अगोदरच खत खरेदी करण्याचा शेतकर्‍यांचा प्रयत्न आहे़ परंतु, मागणी असलेल्या खताच्या गोणी मागे अधिकचे दर वसूल करून कच्च्या पावत्या कृषी केंद्र चालकाकडून दिल्या जात आहेत.सेलू व ग्रामीण भागातील वालूर सारख्या मोठया गावातील कृषी केंद्र चालकांनी विविध रासायनिक खताचा मोठया प्रमाणावर साठा करण्यात आला आहे़ जादा दराने बियाणे व खत विक्री करणार्‍या दुकानदारावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला असला तरी बाजारात मात्र बिनधास्तपणे जादा दराने खत विक्री केली जात आहे़ खताशिवाय सोयाबीन, काही कापूस बियाणांच्या पाकिटाची जादा दराने विक्री सर्रासपणे होत असल्याचे चित्र आहे़ युरिया, डि़ए़पी़ सुपर फ ॉस्फ ेट, १०:२६:२६ या आर सी एफ व नामांकित कंपनीच्या खतांना शेतकर्‍यांकडून मागणी अधिक आहे़ मान्सूनच्या तोंडावर खत खरेदीची शेतकर्‍यांची लगबग सुरू असतानाच अधिकचा दर वसूल केल्या जात असल्यामुळे शेतकर्‍यांचा नाईलाज झाला आहे. बाजारात रासायनिक खतांची चढया भावाने विक्री केली जात आहे़ दुकानदारांकडून शेतकर्‍यांना कच्च्या पावत्या देण्यात येत आहेत.बियाणे व खताविषयी शेतकर्‍यांना तालुका कृषी अधिकारी व पंचायत समितीच्या कृषी विभागाकडून कुठलीही माहिती व मार्गदर्शन मिळत नाही़ काही शेतकरी या बाबत चौकशी करतात मात्र संबंधित विभागाकडून कानावर हात ठेवले जातात़ गतवर्षी खरीप व रबी हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे हे दोन्हीही हंगाम शेतकर्‍यांच्या दृष्टीने लाभदायक नव्हते़ रबी हंगामात गारपीटीने हातची पिके गेली. या वर्षी खरीप हंगामात गतवर्षीची कसर भरून काढण्याचा प्रयत्न शेतकर्‍यांचा आहे परंतु, खरीप हंगामासाठी लागणार्‍या रासायनिक खत खरेदीत अधिकचा दर शेतकर्‍यांना मोजावा लागत आहे़ सर्वसामान्य शेतकरी खत मिळेल की नाही या भीतीपोटी अगोदरच खत खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहे.