शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
3
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
4
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
5
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
7
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
8
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
9
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
10
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
11
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
13
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
14
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
15
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
16
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
17
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
18
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
19
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
20
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

डाळींबाच्या बागेत आंतरपिक घेऊन शेतकऱ्याने केली लाखोंची कमाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 20:37 IST

यशकथा :  खर्च वजा जाता चार महिन्यांत सुमारे २० लाख रुपयांपर्यंतचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे.

- बाळासाहेब काकडे, (श्रीगोंदा, जि.अहमदनगर)

दुष्काळग्रस्त परिस्थिती असताना कमी पाण्यावर श्रीगोंदा तालुक्यातील लोणीव्यंकनाथ येथील राजेंद्र झुंबर काकडे यांची चार एकर क्षेत्रात डाळिंबाची बाग आहे. या बागेत त्यांनी गॅलन वांगी व झेंडूचे आंतरपीक घेऊन पहिल्याच महिन्यात दहा लाख रुपये कमविले. खर्च वजा जाता चार महिन्यांत सुमारे २० लाख रुपयांपर्यंतचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे.

राजेंद्र काकडे यांना वडिलोपार्जित तीन एकर शेती आहे. त्यामुळे जबर इच्छा शक्ती असूनदेखील सुधारित पद्धतीने शेती करण्यास अडचणी होत्या. अशातच शेजारी राहणारे तुकाराम डुबल यांची चार एकर शेती १२ वर्षांच्या कराराने त्यांनी भाडेतत्त्वावर घेतली आहे. तीन महिन्यांपूर्वी भगवा जातीच्या डाळिंबाची त्यांनी लागवड केली.

डाळिंबाची लागवड केल्यानंतर पाण्याचे नियोजन केले. सूक्ष्म खते पाण्यासाठी देण्यासाठी स्वतंत्र ठिबक सिंचनाचा वापर केला. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी शेणखताचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. त्यामुळे पिकांमध्ये रोग प्रतिबंधक शक्ती वाढली. त्यामुळे पिकांची जोमाने वाढ झाली आणि अपेक्षित उत्पन्न मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. डाळिंबात झेंडूची लागवड केल्यामुळे आर्थिक लाभाबरोबर निमॉटोड रोगाचा प्रतिबंध करणे शक्य झाले. डाळिंबाच्या दोन ओळीमध्ये जे १४ फुटांचे मोकळे अंतर होते. त्यामध्ये गॅलन जातीच्या वाग्यांची लागवड केली. या आंतरपिकाचा फायदा दुहेरी पद्धतीने झाला.

यामुळे बागेत वाढणाऱ्या तणनाशकाला आळा बसला. याचा परिणाम पिकांच्या जोमदार वाढीवर झाला. बाजारपेठेचा अंदाज या आंतरपिकाचे नियोजन केले होते. त्यासाठी सुमारे चार लाख गुंतवणूक केली. त्या शेतात गहू, ज्वारी घेतली जात होती. त्याच मळ्यात डाळिंब आणि झेंडू, वांग्यांनी मळा बहरला आणि वांग्याला ३० ते ३५ रुपये किलोप्रमाणे भाव मिळत आहे. मुंबईच्या बाजारपेठेत राजेंद्र काकडे यांच्या वांग्याला मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याने चांगला भाव मिळत आहे. झेंडूलाही चांगला भाव मिळाला. शिवाय झेंडूच्या झाडांचा डाळिंबावरील निमॉटोड रोखण्यासाठी मोठा फायदा होणार आहे. गेल्या महिनाभरातच या आंतरपिकातून १० लाखांचे उत्पन्न निघाले. आणखी २० लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे. उत्पादन वजा जाता चार महिन्यांत २० लाख रुपयांपर्यंत नफा मिळविण्याचे आम्ही नियोजन केल्याचे काकडे यांनी सांगितले.

चालू वर्षी श्रीगोंदा तालुक्यात कमी पाऊस झाल्यामुळे भूजल पातळी खालावली आहे. तालुक्यातील खरीप हंगाम गेला. रबीच्या पेरण्या झाल्या नाहीत. शेतकऱ्यांची झुंज फळबागा जगविण्यासाठी चालू झाली आहे. अशा दुष्काळग्रस्त परिस्थितीचा राजेंद्र काकडे यांनी केलेले नियोजन हा कौतुकाचा विषय ठरला आहे. पाणीटंचाईचे आव्हान पेलून डाळिंबात आंतरपीक घेतले. पाण्याच्या अडचणीतही धीर सोडला नाही. कमीत कमी खर्चात जास्तीचे उत्पन्न मिळविण्याचे ध्येय ठेवल्याचे राजेंद्र काकडे यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी