शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

डाळींबाच्या बागेत आंतरपिक घेऊन शेतकऱ्याने केली लाखोंची कमाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 20:37 IST

यशकथा :  खर्च वजा जाता चार महिन्यांत सुमारे २० लाख रुपयांपर्यंतचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे.

- बाळासाहेब काकडे, (श्रीगोंदा, जि.अहमदनगर)

दुष्काळग्रस्त परिस्थिती असताना कमी पाण्यावर श्रीगोंदा तालुक्यातील लोणीव्यंकनाथ येथील राजेंद्र झुंबर काकडे यांची चार एकर क्षेत्रात डाळिंबाची बाग आहे. या बागेत त्यांनी गॅलन वांगी व झेंडूचे आंतरपीक घेऊन पहिल्याच महिन्यात दहा लाख रुपये कमविले. खर्च वजा जाता चार महिन्यांत सुमारे २० लाख रुपयांपर्यंतचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे.

राजेंद्र काकडे यांना वडिलोपार्जित तीन एकर शेती आहे. त्यामुळे जबर इच्छा शक्ती असूनदेखील सुधारित पद्धतीने शेती करण्यास अडचणी होत्या. अशातच शेजारी राहणारे तुकाराम डुबल यांची चार एकर शेती १२ वर्षांच्या कराराने त्यांनी भाडेतत्त्वावर घेतली आहे. तीन महिन्यांपूर्वी भगवा जातीच्या डाळिंबाची त्यांनी लागवड केली.

डाळिंबाची लागवड केल्यानंतर पाण्याचे नियोजन केले. सूक्ष्म खते पाण्यासाठी देण्यासाठी स्वतंत्र ठिबक सिंचनाचा वापर केला. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी शेणखताचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. त्यामुळे पिकांमध्ये रोग प्रतिबंधक शक्ती वाढली. त्यामुळे पिकांची जोमाने वाढ झाली आणि अपेक्षित उत्पन्न मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. डाळिंबात झेंडूची लागवड केल्यामुळे आर्थिक लाभाबरोबर निमॉटोड रोगाचा प्रतिबंध करणे शक्य झाले. डाळिंबाच्या दोन ओळीमध्ये जे १४ फुटांचे मोकळे अंतर होते. त्यामध्ये गॅलन जातीच्या वाग्यांची लागवड केली. या आंतरपिकाचा फायदा दुहेरी पद्धतीने झाला.

यामुळे बागेत वाढणाऱ्या तणनाशकाला आळा बसला. याचा परिणाम पिकांच्या जोमदार वाढीवर झाला. बाजारपेठेचा अंदाज या आंतरपिकाचे नियोजन केले होते. त्यासाठी सुमारे चार लाख गुंतवणूक केली. त्या शेतात गहू, ज्वारी घेतली जात होती. त्याच मळ्यात डाळिंब आणि झेंडू, वांग्यांनी मळा बहरला आणि वांग्याला ३० ते ३५ रुपये किलोप्रमाणे भाव मिळत आहे. मुंबईच्या बाजारपेठेत राजेंद्र काकडे यांच्या वांग्याला मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याने चांगला भाव मिळत आहे. झेंडूलाही चांगला भाव मिळाला. शिवाय झेंडूच्या झाडांचा डाळिंबावरील निमॉटोड रोखण्यासाठी मोठा फायदा होणार आहे. गेल्या महिनाभरातच या आंतरपिकातून १० लाखांचे उत्पन्न निघाले. आणखी २० लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे. उत्पादन वजा जाता चार महिन्यांत २० लाख रुपयांपर्यंत नफा मिळविण्याचे आम्ही नियोजन केल्याचे काकडे यांनी सांगितले.

चालू वर्षी श्रीगोंदा तालुक्यात कमी पाऊस झाल्यामुळे भूजल पातळी खालावली आहे. तालुक्यातील खरीप हंगाम गेला. रबीच्या पेरण्या झाल्या नाहीत. शेतकऱ्यांची झुंज फळबागा जगविण्यासाठी चालू झाली आहे. अशा दुष्काळग्रस्त परिस्थितीचा राजेंद्र काकडे यांनी केलेले नियोजन हा कौतुकाचा विषय ठरला आहे. पाणीटंचाईचे आव्हान पेलून डाळिंबात आंतरपीक घेतले. पाण्याच्या अडचणीतही धीर सोडला नाही. कमीत कमी खर्चात जास्तीचे उत्पन्न मिळविण्याचे ध्येय ठेवल्याचे राजेंद्र काकडे यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी