शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

डाळींबाच्या बागेत आंतरपिक घेऊन शेतकऱ्याने केली लाखोंची कमाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 20:37 IST

यशकथा :  खर्च वजा जाता चार महिन्यांत सुमारे २० लाख रुपयांपर्यंतचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे.

- बाळासाहेब काकडे, (श्रीगोंदा, जि.अहमदनगर)

दुष्काळग्रस्त परिस्थिती असताना कमी पाण्यावर श्रीगोंदा तालुक्यातील लोणीव्यंकनाथ येथील राजेंद्र झुंबर काकडे यांची चार एकर क्षेत्रात डाळिंबाची बाग आहे. या बागेत त्यांनी गॅलन वांगी व झेंडूचे आंतरपीक घेऊन पहिल्याच महिन्यात दहा लाख रुपये कमविले. खर्च वजा जाता चार महिन्यांत सुमारे २० लाख रुपयांपर्यंतचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे.

राजेंद्र काकडे यांना वडिलोपार्जित तीन एकर शेती आहे. त्यामुळे जबर इच्छा शक्ती असूनदेखील सुधारित पद्धतीने शेती करण्यास अडचणी होत्या. अशातच शेजारी राहणारे तुकाराम डुबल यांची चार एकर शेती १२ वर्षांच्या कराराने त्यांनी भाडेतत्त्वावर घेतली आहे. तीन महिन्यांपूर्वी भगवा जातीच्या डाळिंबाची त्यांनी लागवड केली.

डाळिंबाची लागवड केल्यानंतर पाण्याचे नियोजन केले. सूक्ष्म खते पाण्यासाठी देण्यासाठी स्वतंत्र ठिबक सिंचनाचा वापर केला. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी शेणखताचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. त्यामुळे पिकांमध्ये रोग प्रतिबंधक शक्ती वाढली. त्यामुळे पिकांची जोमाने वाढ झाली आणि अपेक्षित उत्पन्न मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. डाळिंबात झेंडूची लागवड केल्यामुळे आर्थिक लाभाबरोबर निमॉटोड रोगाचा प्रतिबंध करणे शक्य झाले. डाळिंबाच्या दोन ओळीमध्ये जे १४ फुटांचे मोकळे अंतर होते. त्यामध्ये गॅलन जातीच्या वाग्यांची लागवड केली. या आंतरपिकाचा फायदा दुहेरी पद्धतीने झाला.

यामुळे बागेत वाढणाऱ्या तणनाशकाला आळा बसला. याचा परिणाम पिकांच्या जोमदार वाढीवर झाला. बाजारपेठेचा अंदाज या आंतरपिकाचे नियोजन केले होते. त्यासाठी सुमारे चार लाख गुंतवणूक केली. त्या शेतात गहू, ज्वारी घेतली जात होती. त्याच मळ्यात डाळिंब आणि झेंडू, वांग्यांनी मळा बहरला आणि वांग्याला ३० ते ३५ रुपये किलोप्रमाणे भाव मिळत आहे. मुंबईच्या बाजारपेठेत राजेंद्र काकडे यांच्या वांग्याला मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याने चांगला भाव मिळत आहे. झेंडूलाही चांगला भाव मिळाला. शिवाय झेंडूच्या झाडांचा डाळिंबावरील निमॉटोड रोखण्यासाठी मोठा फायदा होणार आहे. गेल्या महिनाभरातच या आंतरपिकातून १० लाखांचे उत्पन्न निघाले. आणखी २० लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे. उत्पादन वजा जाता चार महिन्यांत २० लाख रुपयांपर्यंत नफा मिळविण्याचे आम्ही नियोजन केल्याचे काकडे यांनी सांगितले.

चालू वर्षी श्रीगोंदा तालुक्यात कमी पाऊस झाल्यामुळे भूजल पातळी खालावली आहे. तालुक्यातील खरीप हंगाम गेला. रबीच्या पेरण्या झाल्या नाहीत. शेतकऱ्यांची झुंज फळबागा जगविण्यासाठी चालू झाली आहे. अशा दुष्काळग्रस्त परिस्थितीचा राजेंद्र काकडे यांनी केलेले नियोजन हा कौतुकाचा विषय ठरला आहे. पाणीटंचाईचे आव्हान पेलून डाळिंबात आंतरपीक घेतले. पाण्याच्या अडचणीतही धीर सोडला नाही. कमीत कमी खर्चात जास्तीचे उत्पन्न मिळविण्याचे ध्येय ठेवल्याचे राजेंद्र काकडे यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी