शहरं
Join us  
Trending Stories
1
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
2
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
3
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
4
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
5
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
6
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
7
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
8
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
9
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
10
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
11
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
12
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
13
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
14
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
16
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
17
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
18
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
19
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
20
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल

जिल्ह्यातील शेतकरी चिंतातुर

By admin | Updated: August 7, 2014 23:36 IST

जालना : जिल्ह्यात आतापर्यंत जोरदार पाऊस पडला नसल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पावसाअभावी शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली

 

जालना : जिल्ह्यात आतापर्यंत जोरदार पाऊस पडला नसल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पावसाअभावी शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. मात्र, तीही वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून काही ठिकाणी रिमझीम पाऊस पडत असल्याने त्यावरच शेतकरी समाधान मानून मोठ्या पावसाची वाट पाहत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत सर्वात कमी म्हणजे केवळ १७ टक्के पाऊस झालेला आहे. यावर्षी आतापर्यंत ३४ टक्के पावसाची अपेक्षा होती. मात्र अपेक्षापेक्षा ५० टक्के कमी पाऊस झाल्याने शेतकरी चिंतातुर झालेला आहे. दुष्काळाचे सावट नेर: जालना तालुक्यातील नेर परिसरात अद्याप समाधानकारक पाऊस पडलेला नाही. शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करूनही पाण्याअभावी पिके आली नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. परिसरातील नेर, टाकरवन, मोहाडी, शिवणी, हिवर्डी, हस्तपोखरी परिसरात शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. ज्या शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीनची लागवड केली. ते पावसाअभावी चिंतातूर झालेले आहे. बियाणे व औषधीवर केलेला खर्च वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून चारापाण्याची टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेवून उपाययोजना कराव्यात व जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी रामेश्वर बजाज, रमेशराव गाते, नितीन तोटेवार, भागवतराव उफाड आदी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)शेवगा : अंबड तालुक्यातील धनगर पिंप्री परिसरात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी प्रयोग करण्यात आला. यावेळी भट्टीत विविध वनस्पतीचे लाकडे जमा करून एकत्र करून त्यात मीठ टाकून अग्नि देवून पाऊस पाडण्याचा प्रयोग करण्यात आला. ४सलग दोन महिन्यापासून दांडी मारलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. पाऊस पडावा यासाठी वरूण राजाला प्रसन्न करण्यासाठी पिंप्रीवासियांनी एकत्र येवून हा प्रयोग यशस्वी पार पाडला. वड, पिंपळ, लिंब, चंदन, बाभुळ अशा विविध वृक्षांची लाकडे जमा करून मोठा यज्ञ येथे पार पडला. यावेळी नानासाहेब शेळके, विलास कचरे, परमेश्वर जाधव, रामेश्वर सावंत, शिवाजी अरगडे, महेंद्र जाधव, बंडू काळे, श्रीराम अनपट, रामेश्वर जाधव, बाळू नरोडे, कृष्णा वरे, बाळू नरोडे, रामेश्वर मोठकर, ज्ञानेश्वर कदम आदींसह ग्रामस्थांनी पावसासाठी साकडे घातले. शेवगा- अंबड तालुक्यात पावसाने दडी मारल्याने तालुक्यावर दुष्काळाची छाया पसरली आहे. परिसरातील अनेक गावात पावसाळ्यात ही हिरवा चारा मिळेनासा झाला आहे. यावर्षी निम्मा पावसाळा संपत आला तरी अद्यापपर्यंत जोरदार पाऊस पडलेला नाही.त्यामुळे ग्रामस्थांना पशुधनासाठी हिरवा चारा मिळत नाही. बाहेरून चारा खरेदी करून आनावा लागत आहे. पावसाअभावी जनावरांच्या चारापाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासनाने या परिसरात चारा छावनी सुरू करावी अशी मागणी डॉ. अंकुश काकडे, मच्छिद्र नागरे, परमेश्वर जाधव, विठ्ठल धुपे, भास्कर शेरे विलास कचरे, भानुदास तिळेकर, श्याम तिकांडे आदींनी केली आहे.