शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

गारपिटीत नुकसान झालेले शेतकरी वंचित

By admin | Updated: May 20, 2014 01:08 IST

एकदरा: माजलगाव तालुक्यातील बहुतांश गावातील शेतकर्‍यांचे मार्च दरम्यान झालेल्या गारपिटीसह अवकाळी पावसात मोठे आर्थिक नुकसान झाले.

एकदरा: माजलगाव तालुक्यातील बहुतांश गावातील शेतकर्‍यांचे मार्च दरम्यान झालेल्या गारपिटीसह अवकाळी पावसात मोठे आर्थिक नुकसान झाले. मात्र या नुकसानीचे ना पंचनामे झाले ना मदत मिळाली. शासनाने दुबार पंचनामे करुन आर्थिक मदत करावी, अशी मागणी जदीदजवळा, एकदरा येथील शेतकर्‍यांनी केली आहे. मागील तीन वर्षांपासून दुष्काळाच्या संकटात सापडलेला शेतकरी यावर्षी कसाबसा उभा राहिला होता. रबीची पिके चांगली आली होती. मात्र अचानक गारपिटीचे संकट शेतकर्‍यांवर ओढावले आणि हातातोंडाशी आलेला घास अस्मानी संकटाने ओढावून नेला. या संकटातून सावरण्यासाठी शासन थोडीफार आर्थिक मदत करील, या आशेवर माजलगाव तालुक्यातील शेतकरी होता. मात्र एकदरा, जदीदजवळा येथील शेतकर्‍यांच्या नुकसानीचे पंचनामेच शासनाने केले नाहीत, असा आरोप शेतकर्‍यांकडून होत आहे. शासनाने लावलेल्या जाचक अटींमुळे अनेक शेतकर्‍यांचे ४० टक्केपर्यंत नुकसान होऊन देखील मदत यादीत नाव आले नाही. यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक मदत मिळाली नाही. आतापर्यंत बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी ९८ कोटी रुपयांची उपलब्धता झाली आहे. आलेला निधी अत्यंत कमी असल्याने शेतकर्‍यांनी दुबार पंचनामे करुन ४० टक्के नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी परिसरातून जोर धरू लागली आहे. जदीदजवळा शिवारात गहू, हरबरा, ज्वारी व फळबाग या पिकांचे मोठे क्षेत्र आहे. येथील शेतकर्‍यांचा उदरनिर्वाह निव्वळ शेतीवरच अवलंबून आहे. अशा स्थितीत अस्मानी संकटाने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. गारपिटीनंतर तलाठी, ग्रामसेवक यांच्यामार्फत पंचनामे तर केले मात्र पंचनामे केल्यानंतर लाभार्थी यादीत कोणाचीच नावे आली नसल्याचे येथील शेतकरी विष्णू खरात यांनी सांगितले. ४० टक्के नुकसान झाले काय? आणि ५० टक्के नुकसान झाले काय? शेवटी शेतकर्‍यांचे नुकसान तर झालेलच आहे. काळ्या पडलेल्या गहू व ज्वारीला कोण विकत घेणार? असा सवाल एकदरा येथील शेतकरी नितीन बडे यांनी उपस्थित केला आहे. (वार्ताहर)