शहरं
Join us  
Trending Stories
1
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
2
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
3
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
4
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
5
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
6
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
7
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
8
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
9
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
10
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
11
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
12
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
13
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
14
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
15
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
16
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
17
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
18
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
19
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
20
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?

फळबागाला शेततळ्याचा आधार

By admin | Updated: June 18, 2016 00:49 IST

टेंभूर्णी : एकीकडे दुष्काळामुळे तालुक्यातील फळबागा नष्ट होत असताना दुसरीकडे मात्र, प्रयत्नांची पराकाष्टा, जिद्द, चिकाटी अंगी बाळगून आहे.

टेंभूर्णी : एकीकडे दुष्काळामुळे तालुक्यातील फळबागा नष्ट होत असताना दुसरीकडे मात्र, प्रयत्नांची पराकाष्टा, जिद्द, चिकाटी अंगी बाळगून आहे. त्या पाण्याचे योग्य पद्धतीने चांगले नियोजन करून दुष्काळामध्ये डाळींब व आंबा या फळबागांना शेततळ्याचा आधार मिळाल्याने गणेशपूर येथील शेतकरी नितीन माधोराव अंधारे, अरूण माधोराव अंधारे, अनिल माधोराव अंधारे यांना फळबागेतून लाखो रुपयांची उत्पन्न मिळाले आहे.गणेशपूर येथील शेतकरी अंधारे या तीन बंधुंनी २०१२ मध्ये कृषी विभागाच्या राष्ट्रीय फलोत्पादन रोहयो योजनेतून फळबाग लागवड केली. यामध्ये डाळींबाची १ हजार झाडे तर अंब्याची साडेपाचशे झाडे लावली. फळबागांना पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून २०१२ मध्येच एक एकरचा ३५ बाय ३५ चे शेततळे उभारले. हे शेततळे पावसाळ्यात तुडूंब भरायचे. फक्त फळबागेसाठीच ठिबकच्या साह्याने पाणी, खते, औषधी दिले. दुष्काळामध्ये पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये म्हणून झाडांच्या खोडाजवळ मल्चिंग करून सकाळी एक वेळेस व रात्रीला पाणी देण्यात आले.या सर्व फळबागांना सेंद्रीय खताचा वापर करण्यात आला. त्यामुळे फळबाग रोगमुक्त आहे. सेंद्रीय पद्धतीने तयार केलेल्या फळबागेतून डाळींब जवळपास साडेतीन लाख केशर आंबा, अडीच लाख रुपये उत्पन्न दिले आहे. परिसरातील या शेतकऱ्यांचा आदर्श घेऊन सेंद्रीय शेती करावी, उत्पन्न हमखास मिळते, या फळबागेसाठी गांडूळ प्रकल्प उभारला असून, या खताचा मोठा वापर करत असल्याने फळांचा दर्जा सुद्धा चांगला असल्याने भाव मिळत असल्याचे शेतकरी नितीन अंधारे यांनी सांगितले. (वार्ताहर)