शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

उरलेल्या तुरीचे आम्ही करायचे काय? औरंगाबादच्या शेतक-यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 11:44 IST

शासनाकडून औरंगाबाद जिल्ह्यात प्रतिहेक्टर केवळ साडेपाच क्विंटल तूर खरेदी केली जात असल्याने संतप्त शेतक-यांनी सोमवारी (दि.५) जाधववाडीतील तूर खरेदी केंद्रावर गोंधळ घातला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शासनाकडून औरंगाबाद जिल्ह्यात प्रतिहेक्टर केवळ साडेपाच क्विंटल तूर खरेदी केली जात असल्याने संतप्त शेतक-यांनी सोमवारी (दि.५) जाधववाडीतील तूर खरेदी केंद्रावर गोंधळ घातला. आधीच हंगाम संपत आलेला असताना शासनाने तूर खरेदी सुरू केल्यामुळे नाराज शेतक-यांनी ‘आता आम्ही उरलेल्या तुरीचे करायचे काय?’ असा सवाल करत रोष व्यक्त केला.जाधववाडीतील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ‘नाफेड’च्या वतीने शनिवारी (दि.३) तूर खरेदीला सुरुवात झाली. शासनातर्फे यंदा बोनससह प्रतिक्विंटल ५४०० रुपये हमीभाव दिला जात आहे. आॅनलाईन नोंदणी केल्यानंतर सोमवारी संतोष भवर हे शेतकरी केंद्रावर ११ क्विंटल तूर विक्री करण्यास घेऊन आले. मात्र, शासनाच्या आदेशानुसार त्यांची केवळ तीन क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.असाच अनुभव इतर शेतक-यांनाही आला. त्यांनी केंद्रावरील अधिका-यांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. त्यामुळे सोमवारी केवळ १६५ क्विंटल तूर खरेदी झाली़‘शासन जर पूर्ण तूर खरेदी करणार नसेल तर बाकीच्या तुरीचे आम्ही काय करायचे? फेकून द्यायची?’ अशा शब्दांत शेतक-यांनी आपली तीव्र प्रतिक्रिया ‘लोकमत’जवळ व्यक्त केली. अडत बाजारामध्ये तुरीला ४१०० ते ४३०० रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे व्यापा-याला तूर विक्री केल्यानंतर शेतक-यांचे मोठे नुकसान होणार असल्यामुळे ते नाराज झाले आहेत. ‘हमीभावाने तूर खरेदी केली’ केवळ एवढेच दाखविण्यासाठी हे सुरू आहे. उरलेली तूर व्यापा-यांकडेच जावी हाच सरकारचा डाव असल्याचा आरोप शेतक-यांनी केला.गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अतिरिक्त भाव जाहीर केल्यामुळे शेतक-यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र, एकरी दोन क्विंटल तूर खरेदीच्या शासन धोरणाने शेतकरी हैराण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. ‘केंद्रावर चाळणी यंत्र असतानाही आम्हाला खाजगी व्यावसायिकांकडून चाळून आणण्यास सांगितले जाते. त्यासाठी प्रतिक्विंटलमागे दोनशे ते अडीचशे रुपये खर्च होतो, असा तक्रारींचा पाढाच शेतक-यांनी मांडला.