शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
2
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
3
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
4
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
5
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
6
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
7
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
8
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
9
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
10
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
11
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
12
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
14
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
15
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
16
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
17
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
18
मर्मबंध! आईच्या दुधाचा स्वाद, ब्रेस्ट मिल्क फ्लेव्हर्ड आईस्क्रीमची तुफान चर्चा, पण हे आहे तरी काय?
19
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
20
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी

उरलेल्या तुरीचे आम्ही करायचे काय? औरंगाबादच्या शेतक-यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 11:44 IST

शासनाकडून औरंगाबाद जिल्ह्यात प्रतिहेक्टर केवळ साडेपाच क्विंटल तूर खरेदी केली जात असल्याने संतप्त शेतक-यांनी सोमवारी (दि.५) जाधववाडीतील तूर खरेदी केंद्रावर गोंधळ घातला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शासनाकडून औरंगाबाद जिल्ह्यात प्रतिहेक्टर केवळ साडेपाच क्विंटल तूर खरेदी केली जात असल्याने संतप्त शेतक-यांनी सोमवारी (दि.५) जाधववाडीतील तूर खरेदी केंद्रावर गोंधळ घातला. आधीच हंगाम संपत आलेला असताना शासनाने तूर खरेदी सुरू केल्यामुळे नाराज शेतक-यांनी ‘आता आम्ही उरलेल्या तुरीचे करायचे काय?’ असा सवाल करत रोष व्यक्त केला.जाधववाडीतील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ‘नाफेड’च्या वतीने शनिवारी (दि.३) तूर खरेदीला सुरुवात झाली. शासनातर्फे यंदा बोनससह प्रतिक्विंटल ५४०० रुपये हमीभाव दिला जात आहे. आॅनलाईन नोंदणी केल्यानंतर सोमवारी संतोष भवर हे शेतकरी केंद्रावर ११ क्विंटल तूर विक्री करण्यास घेऊन आले. मात्र, शासनाच्या आदेशानुसार त्यांची केवळ तीन क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.असाच अनुभव इतर शेतक-यांनाही आला. त्यांनी केंद्रावरील अधिका-यांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. त्यामुळे सोमवारी केवळ १६५ क्विंटल तूर खरेदी झाली़‘शासन जर पूर्ण तूर खरेदी करणार नसेल तर बाकीच्या तुरीचे आम्ही काय करायचे? फेकून द्यायची?’ अशा शब्दांत शेतक-यांनी आपली तीव्र प्रतिक्रिया ‘लोकमत’जवळ व्यक्त केली. अडत बाजारामध्ये तुरीला ४१०० ते ४३०० रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे व्यापा-याला तूर विक्री केल्यानंतर शेतक-यांचे मोठे नुकसान होणार असल्यामुळे ते नाराज झाले आहेत. ‘हमीभावाने तूर खरेदी केली’ केवळ एवढेच दाखविण्यासाठी हे सुरू आहे. उरलेली तूर व्यापा-यांकडेच जावी हाच सरकारचा डाव असल्याचा आरोप शेतक-यांनी केला.गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अतिरिक्त भाव जाहीर केल्यामुळे शेतक-यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र, एकरी दोन क्विंटल तूर खरेदीच्या शासन धोरणाने शेतकरी हैराण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. ‘केंद्रावर चाळणी यंत्र असतानाही आम्हाला खाजगी व्यावसायिकांकडून चाळून आणण्यास सांगितले जाते. त्यासाठी प्रतिक्विंटलमागे दोनशे ते अडीचशे रुपये खर्च होतो, असा तक्रारींचा पाढाच शेतक-यांनी मांडला.