शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
2
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
3
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
4
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
5
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
6
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
7
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
8
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
9
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
10
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
11
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
12
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
13
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
14
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
15
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
16
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
17
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
18
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
19
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
20
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?

पावसाने दाडी मारल्याने शेतकरी, व्यापारी हवालदिल

By admin | Updated: June 25, 2014 01:05 IST

जालना: जिल्ह्यात सर्वत्र पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. तर बाजारपेठेत मालाची आवक कमी झाल्याने व्यापारीही हतबल झाले आहेत.

जालना: जिल्ह्यात सर्वत्र पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. तर बाजारपेठेत मालाची आवक कमी झाल्याने व्यापारीही हतबल झाले आहेत. यंदा चांगला पाऊस पडेल अशी आशा शेतकरी बाळगून होते. मात्र, अद्यापपर्यंत जिल्ह्यात पाऊस पडला नसल्याने शेतकऱ्यांची मोठी निराशा झालेली आहे. पेरणीसाठी सर्व तयारी करून शेतकरी पावसाची वाट पाहत आहे. आणखी आठ दिवस पाऊस पडला नाही तर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असल्याने बाजारपेठेवर त्याचा गंभीर परिणाम दिसून येत आहे. मंगळवारी मात्र, कमालीचा शुकशुकाट दिसून आला.नवीन मोंढ्यात मागील आठ दिवसापासून मालाची आवक कमालीची घटली असल्याचे येथील काही व्यापाऱ्यांनी सांगितले.बाजारपेठेत सध्या गहू, ज्वारी, हरभरा आदी मालाचीच आवक आहे. लोकवन गव्हाची आवक दररोज २०४ ्िक्वंटल असून १४०० ते १५८६ आहेत. ज्वारी ३०० ते ४०० क्विंटल असून भाव ११०० ते २७०० रूपये आहेत. बाजरी ४० क्विंटल आवक असून भाव १३०० ते १४०० आहेत. हरभरा २४७ क्विंटल आवक असून दर १८००ते २३८१ रूपये आहेत. सोयाबीन ८९ क्विंटल आवक असून भाव ३८०० ते ३९०० आहे.सध्या लिंबोळीचा हंगाम सुरू असतानाही आवक कमी आहे. सध्या लिंबोळीची आवक दररोज ७८ क्विंटल असून भाव ६०० ते ७५० रूपये आहे.मक्याची आवक दररोज ३०० पोते इतकी असून शंभर रूपयाची तेजी आल्यानंतर भाव ११७५ ते १३५० रूपये प्रतिक्विंटल आहे. साबुदाण्याच्या दरात १०० रूपयांची तेजी आली असून भाव ६००० ते ६८०० रूपये प्रतिक्विंटल आहे. साखरेच्या दरात थोडी तेजी आल्यानंतर भाव ३१०० ते ३२०० रूपये प्रतिक्ंिवटल आहेत. सर्व प्रकारच्या तेलामध्ये १ ते २ रूपयाची वाढ झाली आहे. दरम्यान, विविध मालांच्या दरात वाढ होत असल्यामुळे त्याची झळ सामान्य नागरिकांना बसत आहे. (प्रतिनिधी)जनावरांच्या बाजारात मोठी गर्दीजालन्यात दर मंगळवारी भरणाऱ्या जनावरांच्या आठवडी बाजारात मात्र गर्दी दिसून आली. परिसरातील शेतकऱ्यांनी आपली जनावरे विक्रीसाठी आणली होती. बाजारात जनावरे खरेदी करणाऱ्यांचीच जास्त गर्दी दिसून आली. पाऊस न पडल्याने जनावरांच्या किंमती नियमित भावापेक्षा कमी होतात. हीच बाब हेरून परिसरातील शेतकऱ्यांनी जनावरे खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी केल्याचे एका व्यापाऱ्याने सांगितले. जनावरे पाहून दर ठरविले जातात. या बाजारात गाय, बैल, म्हैस, बकऱ्या विक्रीसाठी आणल्या होत्या. मात्र, अपेक्षित किंमत न आल्याने काही शेतकऱ्यांनी आपली जनावरे परत नेली.