शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या नशिबी पुन्हा खेटे !

By admin | Updated: July 13, 2014 00:19 IST

कळंब : उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ईटकुरसह काही शाखांमधील तिजोरीत पुन्हा खडखडाट निर्माण झाला

कळंब : उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ईटकुरसह काही शाखांमधील तिजोरीत पुन्हा खडखडाट निर्माण झाला असून, मागील दहा दिवसांपासून अनेक शेतकरी आपली भरपाईरुपी मदत उचलण्यासाठी बँकेत खेटे मारत आहेत. ऐन पेरणीच्या दिवसांत शेतकऱ्यांना शासनाकडून आलेली रक्कम उचलण्यासठी कसरत करावी लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कळंब तालुक्यातील ११ शाखांमध्ये ९६ गावातील शेतकऱ्यांना ३१ कोटी एवढी अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानपोटी अनुदान जमा झाले होते. सदर अनुदान व्यवस्थित वाटप करु असे प्रतिज्ञापत्र देणाऱ्या बँक व्यवस्थापनास अनुदान वेळेत व व्यवस्थित वाटप करण्यात यश आले हा वादाचा विषय निर्माण झाला आहे. ईटकूरसारख्या मोठ्या शाखेत तर सदर अनुदान उचलण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला आहे. शासनाकडून आलेले गारपीट अनुदान उचलण्यासाठी कधी शाखेत आवश्यक तेवढा कॅश उपलब्ध न होणे, कर्मचाऱ्यांचा प्रश्न तरी कधी संगणक किंवा नेटचा प्रश्न यामुळे ग्राहकांना त्रास सोसावा लागत होता. अशा प्रकारे जवळपास तीन महिन्यापासून अनुदान वाटप सुरु असताना आजही अनेक शेतकऱ्यांना आपली हक्काची रक्कम मिळाली नसल्याची वस्तूस्थिती आहे. याही परिस्थितीत यादीनुसार बँकेने शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर रकमा जमा केल्या आहेत. या रकमा शेतकऱ्यांना मिळाल्या नसल्या तरी नावे जमा झाल्याने बँक कर्मचारी वरिष्ठांना किंवा महसूल प्रशासनाला वाटपाचे मोठे आकडे सांगण्यास मोकळे होत आहेत.बँकेने लक्ष देण्याची गरजतालुक्यात खरिपाखालील पेरणीचे क्षेत जवळपास ७० हजार हेक्टरपेक्षा जास्त आहे. एवढ्या मोठ्या क्षेत्राचा धनी असलेला शेतकरी मागील दोन-तीन वर्षाची टंचाईसदृश्य परिस्थिती व मध्यंतरीचा अवकाळी व गारपिटीचा तडाखा यामुळे मेटाकुटीस आला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेली मदत संपूर्ण शेतकऱ्यांच्या हातात पडली असती तर त्याचा बी-बियाणे, खत खरेदीसाठी उपयोग झाला असता. यामध्ये ज्या शेतकऱ्यांना आपल्या अनुदानाची रक्कम मिळाली. त्यांचे ठिक झाले आहे, परंतु ज्यांना आपली रक्कम मिळालेली नाही त्यांना ऐन पेरणीच्या दिवसांत बँकेत हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. बँक व्यवस्थापनाने किमान पेरणीचे दिवस डोळ्यासमोर ठेवून तरी रक्कम उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)बँकेत पुन्हा ठणठणाटजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ईटकूरसह काही शाखेत पुन्हा चलन टंचाई जागवण्यास सुरुवात झाली आहे. मागील दहा ते पंधरा दिवसापासून पुन्हा ठणठणाट जाणवत असून, असंख्य शेतकऱ्यांना या कालावधीत एक छदामही मिळालेला नाही. आपली हक्काची गारपिटीची रक्कम मिळविण्यासाठी बँकेत शेतकरी हेलपाटे मारत आहेत. बँकेत दररोज वरुन कॅश आला नाही असे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येते. परंतु हे रहाटगाडगे किती दिवस चालणार असा शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे.म्हणे २९ कोटींचे वाटप ?यासंदर्भात कळंब येथील मुख्य शाखेचे ज्येष्ठ तपासणीस सुनील गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ११ शाखेस ९६ गावातील शेतकऱ्यांसाठी ३१ कोटी रुपये प्राप्त झाले होते. त्यापैकी २९ कोटी ४९ लाख रुपयाचे वाटप झाले असून, केवळ १ कोटी ५४ लाख रुपये वाटप करणे बाकी आहे. शिवाय ही रक्कम लवकरच वाटप करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. बँक प्रशासनाकडून सांगण्यात आलेली प्रत्यक्षात शेतकऱ्यास वाटप झाली.