शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

एक एकरात सधन झाला शेतकरी

By admin | Updated: July 1, 2014 01:05 IST

फकिरा देशमुख , भोकरदन केवळ एक एकर शेतीमध्ये दोन जिल्ह्यात फुलांच्या व्यवसायाचा विस्तार करून वालसा खालसा येथील एका शेतकऱ्याने तालुक्यात सधन शेतकरी म्हणून ओळख निर्माण करून एक आदर्श निर्माण केला आहे.

फकिरा देशमुख , भोकरदनकेवळ एक एकर शेतीमध्ये दोन जिल्ह्यात फुलांच्या व्यवसायाचा विस्तार करून वालसा खालसा येथील एका शेतकऱ्याने तालुक्यात सधन शेतकरी म्हणून ओळख निर्माण करून एक आदर्श निर्माण केला आहे.सुभाष पुंडलिक जाधव असे या शेतकऱ्याचे नाव आहे. जाधव यांनी पत्नी सिंधूबाई यांच्या सहाय्याने एक एकर शेतीमध्ये नियोजन केल्याने २० एकरची शेती करणाऱ्या शेतकऱ्याची आर्थिक बाबतीत बरोबरी करण्याचा प्रयत्न केला आहे. सुभाष जाधव यांच्या शेतजमिनीचे क्षेत्र एक एकर दहा गुंठे एवढे आहे. एवढ्या कमी क्षेत्रात काय करावे, असा प्रश्न सर्वप्रथम त्यांना पडला. कारण आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक असल्याने व निसर्गाच्या लहरीपणामुळे या शेतीत काय पीक निघू शकेल, या विचाराने त्यांच्यासमोर फुलांच्या शेतीचा पर्याय उभा राहिला. २० गुंठ्यामध्ये त्यांनी गुलाबाची सहाशे झाडे लावली. तर गुंठ्यात गलांडा, काही भागात निशीगंधा आणि उर्वरित क्षेत्रात तुरीची झाडे, पपई, १० गुंठ्यात कपाशी लावली. एकाच एकरमध्ये वेगवेगळे पीक घेऊन आपल्या कुटुंबियाच्या उदरनिर्वाहासह आर्थिक प्रगतीकडे त्यांनी केलेली वाटचाल सद्यस्थितीत शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण करणारी आहे. जाधव यांच्या शेतातील गुलाबाची फुलांची बाग सजलेली आहे. दररोज ५०० फुलांची विक्री होते. फुलांचे पार्सल एस.टी. बसद्वारे बुलढाण्याला पाठविण्याची कल्पनाही त्यांचीच. दररोज फुलांचे पार्सल भोकरदन येथून बुलढाण्याला तसेच तालुक्यातील काही गावांमध्ये पाठविले जाते. फुले खरेदी करणाऱ्यांची एक यादी त्यांनी तयार केली असून दररोज फुलांचे पार्सल मिळते किंवा नाही, याची खात्रीही ते संबंधितांकडे दूरध्वनीद्वारे संपर्क साधून करतात. सध्या पाऊस नसल्याने पपईऐवजी २० गुंठ्यात कपाशीवरच त्यांनी भर दिला आहे. सुभाष जाधव व सिंधूबाई जाधव यांनी दूर अंतरावरून डोक्यावर पाणी आणून गुलाबाची बाग जगविली आहे. मुले दीपक, अमोल आणि गजानन या तिघांनाही पदवीपर्यंतचे शिक्षण देऊन आपल्या मेहनतीचे फळ केवळ व्यवसायातच नव्हे, तर कुटुंबाच्या शैक्षणिक प्रगतीतही त्यांनी मिळवून दाखविले आहे. जाधव यांचे वार्षिक उत्पन्न पाच लाखांच्या घरात आहे.२० गुंठ्यामध्ये त्यांनी गुलाबाची सहाशे झाडे लावली. तर गुंठ्यात गलांडा, काही भागात निशिगंधा आणि उर्वरित क्षेत्रात तुरीची झाडे, पपई, १० गुंठ्यात कपाशी लावली. एकाच एकरमध्ये वेगवेगळे पीक घेऊन आपल्या कुटुंबियाच्या उदरनिर्वाहासह आर्थिक प्रगतीकडे त्यांनी केलेली वाटचाल सद्यस्थितीत शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण करणारी आहे.