शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटात 'डबल ॲटॅक'चा संशय! घटनास्थळी ॲमोनियम नायट्रेटसह 'दुसरा शक्तिशाली' स्फोटक आढळला
2
Delhi blast: हाडे तुटली, आतडी फाटली अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचे भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट
3
काय सांगता! २० हजारांचे पॉकेट, 'Apple' ने लाँच केलेल्या उत्पादनाची जोरदार चर्चा
4
"ती कट्टर मुस्लीम नव्हती" जैशची लेडी कमांडर डॉ. शाहीनशी संसार मोडणाऱ्या नवऱ्याने केला खुलासा
5
पैसा काय, जीव वाचणे महत्वाचे...! दुचाकीस्वारांसाठी एअरबॅग भारतात लाँच; एकदा उघडली तरी...
6
Parvez Ansari: की-पॅड मोबाईल, आंतरराष्ट्रीय सीमकार्ड अन्...; अन्सारीच्या घरात 'एटीएस'ला काय काय मिळाले?
7
ChatGPT ची निर्माती कंपनी OpenAI ची भारतात एन्ट्री! 'या' शहरात उघडणार ऑफिस, काय आहेत योजना?
8
सोन्याचे भाव पुन्हा धडाम..., चांदी चमकली...! पटापट चेक करा १८ ते २४ कॅरेटचे लेटेस्ट रेट
9
Govinda: "डॉक्टरांनी मला...", गोविंदाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, स्वत:च दिले हेल्थ अपडेट, चाहत्यांना दिलासा
10
VIDEO: स्वॅग..!! मुलींच्या वर्गात अचानक शिरला कुत्रा; बिनधास्तपणे चालत आत आला अन् मग...
11
संपूर्ण परिसर सजला, राम मंदिर झाले आणखी भव्य-दिव्य; तुम्ही नवीन लूक पाहिला का? पाहा, Photos
12
Tata Motors CV Listing: टाटाच्या 'या' शेअरचं लिस्टिंग २८% प्रीमिअमवर, गुंतवणूकदार मालामाल; तुमच्याकडे आहे का शेअर?
13
दहशतवाद्यांचा स्लीपर सेल...! मुंब्र्यातून उर्दू शिक्षकाला अटक; अल कायदाशी संबंध, एटीएसला मोठा सुगावा लागला...
14
Mumbai Local: धावत्या लोकलमध्ये ३० वर्षीय तरुणीसोबत घृणास्पद प्रकार, प्रवाशांमध्ये संताप!
15
Crime News : सांगलीत ‘मुळशी पॅटर्न’सारखी हत्या! वाढदिवसाच्या दिवशीच रक्तरंजित शेवट; धक्कादायक कारण आले समोर
16
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
17
हळव्या मनाचा कणखर बाप! लेकीसाठी ९०० किमीचा प्रवास, युनिव्हर्सिटीबाहेर लावला 'घरच्या जेवणा'चा स्टॉल
18
एकेकाळी दूरसंचार क्षेत्रात होतं वर्चस्व! आता २ लाख कोटी रुपये थकीत; सरकारकडे मदतीसाठी याचना
19
एका रात्रीत 'नॅशनल क्रश' बनली मराठमोळी गिरीजा ओक, निळ्या साडीतील फोटो व्हायरल, अभिनेत्रीचं वय ऐकून बसेल धक्का
20
Vastu Tips: पोपटाला आकर्षून घेणे म्हणजे धन-सुखाला आमंत्रण; तो नियमित यावा म्हणून खास टिप्स!

वीज जोडणीबाबत शेतकरी संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 19:27 IST

काही शेतकरी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेच्या, तर काही जण उच्चदाब वीज वितरण प्रणालीच्या मोहात अडकले आहेत.

औरंगाबाद : काही शेतकरी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेच्या, तर काही जण उच्चदाब वीज वितरण प्रणालीच्या मोहात अडकले आहेत. या दोन्हीही योजना शेतकऱ्यांसाठी हितकारी आहेत; पण १ एप्रिल २०१८ पासून नवीन वीज जोडणीसाठी अर्ज करणाºया शेतकºयांना अनुदानित मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेचा लाभ दिला जाणार आहे. त्यांना विजेची नवीन जोडणी दिली जाणार नाही, तर दोन वर्षांपूर्वी कोटेशन भरलेले शेतकरी उच्चदाब वितरण प्रणालीच्या (एचव्हीडीएस) माध्यमातून वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत.

उच्चदाब वीज वितरण प्रणालीच्या (एचव्हीडीएस) प्रतीक्षेत असलेल्या शेतकºयांना अनुदानित सौरऊर्जेचा पंप हवा असेल, तर त्यांना ‘एचव्हीडीएस’च्या जोडणीसाठी नकार दर्शवून नव्याने मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेसाठी अर्ज करावा लागणार आहे. या शेतकºयांनी भरलेली रक्कम समायोजित करण्याची सुविधा महावितरणने दिली आहे. महावितरणने मार्च २०१९ अखेरपर्यंत राज्यात ५० हजार शेतकºयांना मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेंतर्गत वीज जोडणी देण्याचे उद्दिष्ट आहे. सध्या संपूर्ण मराठवाडा दुष्काळाच्या सावटाखाली असून, या विभागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे या विभागातील कृषिपंपांना सौरऊर्जा किंवा ‘एचव्हीडीएस’च्या वीज जोडणीची तेवढी आवश्यकता नाही.आगामी काळातील नियोजन म्हणून मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या राज्यातील १८८०, तर औरंगाबाद परिमंडळातील ८०३ शेतकºयांनी सौर कृषिपंपांसाठी महावितरणच्या पोर्टलवर अर्ज केले आहेत. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ७१ आणि जालना जिल्ह्यातील ७३२ शेतकºयांचा समावेश आहे. मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेमुळे कमी दाबाने वीजपुरवठा होणे, वारंवार बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित होणे, रोहित्र बिघाड, विद्युत अपघात यासारख्या त्रासातून सुटका होणार आहे. या योजनेत ५ एकरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकºयांना ३ अश्वशक्ती आणि ५ एकरपेक्षा अधिक जमीन असलेल्या शेतक ºयांना ५ अश्वशक्तीचा सौरपंप मिळणार. यासाठी सर्वसाधारण गटातील लाभार्थ्यांना पंप किमतीच्या १० टक्के , तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना ५ टक्के रक्कम भरावी लागणार आहे. सौरपंप त्वरित मिळणार आहेत.

३५ पैकी १४ निविदा लागल्या मार्गी‘एचव्हीडीएस’ अंतर्गत काम करणाºया कंत्राटदारांनी बहिष्कार टाकल्यामुळे दोन वर्षांपासून ही योजना रखडली आहे. मागील आठवड्यात औरंगाबाद जिल्ह्यात ३५ निविदा जाहीर करण्यात आल्या होत्या. यापैकी १४ निविदा उघडण्यात आल्या असून, त्यांना कामांचे आदेशही देण्यात आले. ८ निविदांना प्रतिसाद मिळाला नसून १३ निविदा उडण्याच्या प्रतीक्षेत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील ९ हजार ६१५ कृषिपंपांना, तर जालना जिल्ह्यातील १० हजार ८४ कृषिपंपांना वीज जोडणी दिली जाणार आहे. 

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणAurangabadऔरंगाबाद