शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
3
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
4
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
5
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
6
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
7
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
8
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
9
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
10
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
11
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
12
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
13
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
14
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
15
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
16
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
17
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?
18
Amazon.in च्या 'ग्रेट सेव्हिंग्ज सेलिब्रेशन' स्टोअरफ्रंटसह GST बचतीचा धमाका
19
तू परत आलास..?? IND vs PAK Final वरून पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या भन्नाट मीम्सचा पाऊस
20
Vodafone-Idea च्या शेअरमध्ये मोठी घसरण, AGR प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला

वीज जोडणीबाबत शेतकरी संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 19:27 IST

काही शेतकरी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेच्या, तर काही जण उच्चदाब वीज वितरण प्रणालीच्या मोहात अडकले आहेत.

औरंगाबाद : काही शेतकरी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेच्या, तर काही जण उच्चदाब वीज वितरण प्रणालीच्या मोहात अडकले आहेत. या दोन्हीही योजना शेतकऱ्यांसाठी हितकारी आहेत; पण १ एप्रिल २०१८ पासून नवीन वीज जोडणीसाठी अर्ज करणाºया शेतकºयांना अनुदानित मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेचा लाभ दिला जाणार आहे. त्यांना विजेची नवीन जोडणी दिली जाणार नाही, तर दोन वर्षांपूर्वी कोटेशन भरलेले शेतकरी उच्चदाब वितरण प्रणालीच्या (एचव्हीडीएस) माध्यमातून वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत.

उच्चदाब वीज वितरण प्रणालीच्या (एचव्हीडीएस) प्रतीक्षेत असलेल्या शेतकºयांना अनुदानित सौरऊर्जेचा पंप हवा असेल, तर त्यांना ‘एचव्हीडीएस’च्या जोडणीसाठी नकार दर्शवून नव्याने मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेसाठी अर्ज करावा लागणार आहे. या शेतकºयांनी भरलेली रक्कम समायोजित करण्याची सुविधा महावितरणने दिली आहे. महावितरणने मार्च २०१९ अखेरपर्यंत राज्यात ५० हजार शेतकºयांना मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेंतर्गत वीज जोडणी देण्याचे उद्दिष्ट आहे. सध्या संपूर्ण मराठवाडा दुष्काळाच्या सावटाखाली असून, या विभागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे या विभागातील कृषिपंपांना सौरऊर्जा किंवा ‘एचव्हीडीएस’च्या वीज जोडणीची तेवढी आवश्यकता नाही.आगामी काळातील नियोजन म्हणून मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या राज्यातील १८८०, तर औरंगाबाद परिमंडळातील ८०३ शेतकºयांनी सौर कृषिपंपांसाठी महावितरणच्या पोर्टलवर अर्ज केले आहेत. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ७१ आणि जालना जिल्ह्यातील ७३२ शेतकºयांचा समावेश आहे. मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेमुळे कमी दाबाने वीजपुरवठा होणे, वारंवार बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित होणे, रोहित्र बिघाड, विद्युत अपघात यासारख्या त्रासातून सुटका होणार आहे. या योजनेत ५ एकरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकºयांना ३ अश्वशक्ती आणि ५ एकरपेक्षा अधिक जमीन असलेल्या शेतक ºयांना ५ अश्वशक्तीचा सौरपंप मिळणार. यासाठी सर्वसाधारण गटातील लाभार्थ्यांना पंप किमतीच्या १० टक्के , तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना ५ टक्के रक्कम भरावी लागणार आहे. सौरपंप त्वरित मिळणार आहेत.

३५ पैकी १४ निविदा लागल्या मार्गी‘एचव्हीडीएस’ अंतर्गत काम करणाºया कंत्राटदारांनी बहिष्कार टाकल्यामुळे दोन वर्षांपासून ही योजना रखडली आहे. मागील आठवड्यात औरंगाबाद जिल्ह्यात ३५ निविदा जाहीर करण्यात आल्या होत्या. यापैकी १४ निविदा उघडण्यात आल्या असून, त्यांना कामांचे आदेशही देण्यात आले. ८ निविदांना प्रतिसाद मिळाला नसून १३ निविदा उडण्याच्या प्रतीक्षेत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील ९ हजार ६१५ कृषिपंपांना, तर जालना जिल्ह्यातील १० हजार ८४ कृषिपंपांना वीज जोडणी दिली जाणार आहे. 

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणAurangabadऔरंगाबाद