शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँगमध्ये हाहाकार! २,००० फ्लॅट्सचे गगनचुंबी टॉवर एकाचवेळी पेटले, १३ जणांचा मृत्यू...
2
"प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकण्याची धमकी, न्यूड फोटोने ब्लॅकमेलिंग, इतर पुरुषांसोबत...!"; सेलिना जेटलीचे पतीवर 7 गंभीर आरोप
3
राम मंदिर ध्वजारोहणावर बोलणं पाकिस्तानवा महागात पडलं, भारतानं आरसा दाखवत गप-गार केलं!
4
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
5
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
6
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
7
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
8
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
9
२०२६ ला ५ राशींची अग्निपरीक्षा सुरू, साडेसाती तीव्र होणार; शनि प्रकोप-प्रतिकूल, अखंड सावधान!
10
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
11
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
12
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
13
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
14
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
15
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
16
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
17
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
18
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
19
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
20
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
Daily Top 2Weekly Top 5

धर्माबाद रेल्वेस्थानक समस्यांच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:17 IST

रेल्वे विभागाच्या दुर्लक्षामुळे धर्माबाद रेल्वस्थानक अनेक समस्यांच्या विळख्यात असल्याने प्रवाशांची गैरसोय तर होतेच त्याचबरोबर अन्य काही गोष्टींचा त्रास होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कधर्माबाद : रेल्वे विभागाच्या दुर्लक्षामुळे धर्माबाद रेल्वस्थानक अनेक समस्यांच्या विळख्यात असल्याने प्रवाशांची गैरसोय तर होतेच त्याचबरोबर अन्य काही गोष्टींचा त्रास होत आहे.धर्माबाद रेल्वस्थानक हे मराठवाड्यातील शेवटचे स्टेशन म्हणून ओळखले जाते. येथून तेलंगणा राज्य अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर आहे. धर्माबादेत मोठी बाजारपेठ असून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असल्याने रेल्वेने प्रवासी, व्यापारी, कर्मचारी व छोटे- मोठे व्यवसायिक ये-जा करतात़ यातून धर्माबाद रेल्वस्थानकाला दररोज एक लाखाचे उत्पन्न तिकिटाच्या माध्यमातून मिळते. रेल्वेस्थानकात कोणत्याही प्रकारची सुरक्षा नसल्याने प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत.येथे पोलीस चौकी अद्याप कार्यान्वित झालेली नसल्याने चोरट्यांना मोकळे रान मिळाले आहे. रेल्वेने प्रवास करुन चोरटे शहरात चोºया करतात, अशा घटना अनेक घडल्या. एकाही चोरीचा सुगावा न लागल्याने चोरट्यांची हिंमत वाढली आहे. पंधरा दिवसांपूर्वी देवगिरी एक्स्प्रेसमध्ये अमली पदार्थ गांजा सापडला होता. धर्माबादचे रेल्वेस्थानक सीसीटीव्हीपासून वंचित आहे. रेल्वस्थानक परिसरात अस्वच्छता असून घाणीचे साम्राज्य पसरले. स्टेशनची पटरीवर साफ केली जात नसल्याने दुर्गंधी सुटते, नाकाला रूमाल बांधावे लागते.सहा महिन्यांपासून डिसप्ले बंद आहे. बसण्यासाठी आसन व्यवस्था अपुरी पडत असल्याने प्रवाशांना रेल्वे गाडी येईपर्यंत उभे राहावे लागते. गाडी उशिरा येण्याची वेळ झाली तर कंटाळून प्रवासी खाली बसतात. प्लॅटफॉमवर शेडही कमी असल्याने प्रवाशांना उन्हात थांबावे लागते़ तर पावसाळ्यात पाण्यात भिजतात. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही.उशिरा गाडीचे वेळापत्रक दररोजच्या दररोज लावले जात नाही. यासंदर्भात स्टेशन मास्तरशी विचारणा केली असता उद्धट बोलणे, माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या. लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देण्यात यावा यासाठी वेळोवेळी निवेदने देण्यात आले. उड्डाणपूल बांधण्यात यावे, पोलीस चौकी देण्यात यावी, अस्वच्छता, डिसप्ले बंद, पोलीस चौकी नाही, पाण्याची व्यवस्था नाही, बसण्याच्या आसनची कमतरता अशा अनेक प्रकाराच्या विळख्यात धर्माबाद रेल्वस्थानक असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येऊ लागला.