शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

घोटाळे बहाद्दर शाळांना समाज कल्याणचे अभय !

By admin | Updated: August 1, 2014 01:05 IST

बीड: समाजकल्याण विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती वाटपात लाखोंचा घोटाळा असल्याचे ‘लोकमत’ने समाजकल्याणच्या निदर्शनास आणून दिले होते.

बीड: समाजकल्याण विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती वाटपात लाखोंचा घोटाळा असल्याचे ‘लोकमत’ने समाजकल्याणच्या निदर्शनास आणून दिले होते. आठ दिवसांचा कालावधी उलटूनही अद्याप समाजकल्याण सुस्तच असल्याचे दिसून येत आहे. या घोटाळे बहाद्दरांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील मुलींना समाजकल्याण विभागामार्फत प्रत्येक वर्षी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येते. मागासवर्गीय जातीतील मुलींचे शिक्षणातील घटू नये, यासाठी ही शिष्यवृत्ती योजना २००३-०४ साली शासनाने सुरू केली. मात्र प्रत्यक्षात ही शिष्यवृत्ती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेलीच नाही. संस्था चालक, मुख्याध्यापक व इतर कर्मचाऱ्यांनी मिलीभगत करुन मुलींची शिष्यवृत्ती आपल्या खिश्यात टाकण्याचा महाप्रताप केला होता.या शिष्यवृत्ती वाटपाचा घोटाळा ‘लोकमत’ने उजेडात आणला होता. यावर औरंगाबादचे प्रादेशिक उपायुक्त एस.बी. कांबळे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात आजही समिती न नेमल्याने या घोटाळे बहाद्दरांना समाजकल्याणचेच अभय असल्याचा आरोप मनविसेचे शैलेश जाधव यांनी केला आहे.बीडचे सहाय्यक आयुक्त आर.एम. शिंदे यांच्याशी गुरुवारी चर्चा करण्यात आली. मात्र त्यांना या घोटाळ्याबाबत फारसे गांभीर्य असल्याचे दिसून आले नाही. शिंदे यांनीही यापूर्वी आपण चौकशी समिती नेमू, असे सांगितले होते. मात्र त्यांनीही अद्याप कुठलेही पाऊल उचललेच नाही. हा प्रकार मागील तीन-चार वर्षांपासून सुरू असून, यामध्ये समाजकल्याणच्या अधिकाऱ्यांसह शाळेतील कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोपही जाधव यांनी केला आहे.विद्यार्थिनींनीपर्यंत शिष्यवृत्ती पोहोचत नसल्याने आजही सर्वसामान्य कुटुंबातील मुली शिक्षणापासून वंचित रहात आहेत. याला समाजकल्याण कार्यालयच जबाबदार असल्याचा आरोपही जाधव यांनी केला आहे. आठ दिवसानंतरही समाजकल्याणला साधी पाहणी करण्याची तसदीही घ्यावीशी वाटली नाही. आपल्याला इतर कामे भरपूर आहेत, असे सांगून या शिष्यवृत्ती वाटपात घोटाळा करणाऱ्या शाळांची पाठराखण केली जात आहे. गुरुवारी मनविसेचे शैलेश जाधव यांनी शिष्यवृत्ती वाटपाच्या घोटाळ्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली होती. घोटाळे बहाद्दर शाळांवर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देखील मनविसेने दिला आहे. (प्रतिनिधी)विद्यार्थी संघटनाही झाल्या आक्रमकविद्यार्थिनींना शिष्यवृत्तीपासून अलिप्त ठेवणाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा विद्यार्थिनींना सोबत घेऊन आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा एसएफआयचे राज्याध्यक्ष मोहन जाधव, देविदास जाधव, कौस्तुभ पटाईत, रोहिदास जाधव, दिनेश सुरवसे, गोविंद निरडे, अरुण कलेटवार यांनी दिला आहेसमाजकल्याणच्या अधिकाऱ्यांकडूनच घोटाळे बहाद्दरांची पाठराखण होत असल्याचेही मनविसेचे शैलेश जाधव यांनी सांगितले.