शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

पाणी वापराचे फेरनियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 00:58 IST

जायकवाडी धरणातील पाणी वापराच्या फेरनियोजनाच्या ताळेबंदास बुधवारी जलसंपदा विभागाने मान्यता दिली. यामध्ये दोन्ही कालव्यांसह, माजलगाव धरणात सोडण्यात येणाऱ्या पाण्यात घट केली असून, घरगुती व औद्योगिक पाणी वापराची नव्याने तरतूद करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जायकवाडी धरणातीलपाणी वापराच्या फेरनियोजनाच्या ताळेबंदास बुधवारी जलसंपदा विभागाने मान्यता दिली. यामध्ये दोन्ही कालव्यांसह, माजलगाव धरणात सोडण्यात येणाऱ्या पाण्यात घट केली असून, घरगुती व औद्योगिक पाणी वापराची नव्याने तरतूद करण्यात आली आहे.पैठण तालुक्यात १९७६ मध्ये गोदावरी नदीवर जायकवाडी धरण झाले आहे. जायकवाडी प्रकल्पाच्या १९८५ च्या फेरनियोजनानुसार सुधारित ताळेबंदास शासनाची मान्यता मिळण्यासंदर्भातील प्रस्ताव गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जलसंपदा विभागास सादर केला होता. त्यास शासनाची मंजुरी मिळाली आहे. मंजूर प्रकल्प अहवालानुसार २६१८.५९ दलघमी पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे.जायकवाडी धरणातील मागील ४२ वर्षांतील प्रत्यक्ष पाणी वापर पाहता मूळ प्रकल्पातील पाणी वापर तरतूद आणि प्रत्यक्ष पाणी वापर यात बराच फरक झाला आहे. वेळोवेळी पाण्याच्या गरजेनुसार पाणी वापराच्या नियोजनात बदल करण्यात आलेले आहे. ताळेबंदात गोदावरी नदीवरील उच्च पातळी बंधाºयांमुळे पैठण उजवा आणि डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात घट झाली आहे. मूळ प्रकल्पीय बाष्पीभवनाच्या तरतुदीपेक्षा कमी बाष्पीभवन होत असल्याचे फेरनियोजन करण्यात आले आहे. माजलगाव धरणात सोडण्यात येणा-या पाण्यातही घट करण्यात आली आहे, तर घरगुती आणि औद्योगिक पाणी वापराची नव्याने तरतूद करण्यात आली आहे. जलाशयावरून शासकीय उपसा सिंचन योजनांची नव्याने तरतूद करण्यात आली आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणी