शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

पाणी वापराचे फेरनियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 00:58 IST

जायकवाडी धरणातील पाणी वापराच्या फेरनियोजनाच्या ताळेबंदास बुधवारी जलसंपदा विभागाने मान्यता दिली. यामध्ये दोन्ही कालव्यांसह, माजलगाव धरणात सोडण्यात येणाऱ्या पाण्यात घट केली असून, घरगुती व औद्योगिक पाणी वापराची नव्याने तरतूद करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जायकवाडी धरणातीलपाणी वापराच्या फेरनियोजनाच्या ताळेबंदास बुधवारी जलसंपदा विभागाने मान्यता दिली. यामध्ये दोन्ही कालव्यांसह, माजलगाव धरणात सोडण्यात येणाऱ्या पाण्यात घट केली असून, घरगुती व औद्योगिक पाणी वापराची नव्याने तरतूद करण्यात आली आहे.पैठण तालुक्यात १९७६ मध्ये गोदावरी नदीवर जायकवाडी धरण झाले आहे. जायकवाडी प्रकल्पाच्या १९८५ च्या फेरनियोजनानुसार सुधारित ताळेबंदास शासनाची मान्यता मिळण्यासंदर्भातील प्रस्ताव गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जलसंपदा विभागास सादर केला होता. त्यास शासनाची मंजुरी मिळाली आहे. मंजूर प्रकल्प अहवालानुसार २६१८.५९ दलघमी पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे.जायकवाडी धरणातील मागील ४२ वर्षांतील प्रत्यक्ष पाणी वापर पाहता मूळ प्रकल्पातील पाणी वापर तरतूद आणि प्रत्यक्ष पाणी वापर यात बराच फरक झाला आहे. वेळोवेळी पाण्याच्या गरजेनुसार पाणी वापराच्या नियोजनात बदल करण्यात आलेले आहे. ताळेबंदात गोदावरी नदीवरील उच्च पातळी बंधाºयांमुळे पैठण उजवा आणि डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात घट झाली आहे. मूळ प्रकल्पीय बाष्पीभवनाच्या तरतुदीपेक्षा कमी बाष्पीभवन होत असल्याचे फेरनियोजन करण्यात आले आहे. माजलगाव धरणात सोडण्यात येणा-या पाण्यातही घट करण्यात आली आहे, तर घरगुती आणि औद्योगिक पाणी वापराची नव्याने तरतूद करण्यात आली आहे. जलाशयावरून शासकीय उपसा सिंचन योजनांची नव्याने तरतूद करण्यात आली आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणी