शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
3
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
4
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
5
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
7
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
8
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
9
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
10
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
11
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
12
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
13
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
14
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
15
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
16
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
17
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
18
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
19
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
20
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

आर्थिक स्थिती हाताळण्यात केंद्राला अपयश : पी. साईनाथ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 19:50 IST

पी. साईनाथ यांनी ‘लॉकडाऊनचा संपूर्ण भारतावर तसेच पत्रकारितेवर झालेला परिणाम’ या विषयावर मार्गदर्शन केले. 

ठळक मुद्देमजुरांसाठी जाहीर केलेल्या अन्नधान्यांच्या योजनाही फसव्या होत्या. दीर्घकालीन परिणाम अर्थव्यवस्थेवर झालेले असतानाच त्यातून पत्रकारिताही सुटलेली नाही.

औरंगाबाद : देशातील आर्थिक परिस्थिती अतिशय गंभीर वळणावर असून, कोरोनाविषयी राबवलेल्या चुकीच्या धोरणांमुळे रसातळाला पोहोचली आहे. अर्थव्यवस्था खड्ड्यात जात असतानाही केंद्र शासन जागे होत नाही, हे अधिक धोकादायक असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध पत्रकार पी. साईनाथ यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वृत्तपत्र विभागातील विद्यार्थ्यांनी देशपातळीवरील विविध मान्यवरांचे आॅनलाईन मार्गदर्शन आयोजित केले होते. यात पी. साईनाथ यांनी ‘लॉकडाऊनचा संपूर्ण भारतावर तसेच पत्रकारितेवर झालेला परिणाम’ या विषयावर मार्गदर्शन केले. 

यावेळी पी. साईनाथ म्हणाले, मागील तीन वर्षांपासून देश आर्थिक अडचणींचा सामना करीत आहे. बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. यातच कोरोनाच्या काळात अतिशय चुकीच्या पद्धतीने धोरणे आखण्यात आली. लॉकडाऊन जाहीर केला. यात कामगारांचे झालेले स्थलांतर  आणि त्यांचे हाल भयंकर होते. या धक्क्यातून सावरण्यासाठी देशाला मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. मजुरांसाठी जाहीर केलेल्या अन्नधान्यांच्या योजनाही फसव्या होत्या. कामगारांना धान्य घेण्यासाठी पैसे मोजावे लागले आहेत. या काळाचे दीर्घकालीन परिणाम  अर्थव्यवस्थेवर झालेले असतानाच त्यातून पत्रकारिताही सुटलेली नाही. साखळी वृत्तपत्रांच्या महसुलांवर मोठा परिणाम  झाला असून, डिजिटल पत्रकारितेला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे. साध्या पत्रकारितेचे प्रमाण २५ टक्केच झाले असून, स्टेनोग्राफरची संख्या वाढली असल्याचेही पी. साईनाथ यांनी सांगितले.

पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी चांगले पत्रकार होत सामान्य जनतेची पत्रकारिता केली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी  अधिष्ठाता डॉ. चेतना सोनकांबळे, विभागप्रमुख डॉ. दिनकर माने, डॉ. विक्रम खिलारे, डॉ. मारुती तेगमपुरे आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या आयोजनावर आक्षेप?विद्यापीठातील वृत्तपत्र विभागातील विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या आॅनलाईन व्याख्यानमालेला ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ, कुमार केतकर आदींची व्याख्याने आयोजित केली होती. या व्याख्यानमालेत  डाव्या आणि पुरोगामी विचारांच्या व्यक्तींना बोलावण्यात आले होते. यावर उजव्या  विचारांच्या संघटनांना आक्षेप घेतल्याची माहिती समोर आली आहे.  यासाठी राजभवनातून कुलगुरूंवर दबाव आणला असून, कुलगुरूंनी विभागप्रमुखांना बोलावून घेत यापुढे कोणलाही बोलावताना परवानगी घेण्याच्या सूचना केल्याचे वृत्तपत्र विभागातील एका विद्यार्थ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला सांगितले. याविषयी  विभागप्रमुख डॉ. माने यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.  

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्याDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादCentral Governmentकेंद्र सरकारEconomyअर्थव्यवस्था