शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
2
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
3
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
4
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
5
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
6
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
7
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
8
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
9
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
10
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
11
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
12
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
13
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
14
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
15
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
16
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
17
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

आर्थिक स्थिती हाताळण्यात केंद्राला अपयश : पी. साईनाथ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 19:50 IST

पी. साईनाथ यांनी ‘लॉकडाऊनचा संपूर्ण भारतावर तसेच पत्रकारितेवर झालेला परिणाम’ या विषयावर मार्गदर्शन केले. 

ठळक मुद्देमजुरांसाठी जाहीर केलेल्या अन्नधान्यांच्या योजनाही फसव्या होत्या. दीर्घकालीन परिणाम अर्थव्यवस्थेवर झालेले असतानाच त्यातून पत्रकारिताही सुटलेली नाही.

औरंगाबाद : देशातील आर्थिक परिस्थिती अतिशय गंभीर वळणावर असून, कोरोनाविषयी राबवलेल्या चुकीच्या धोरणांमुळे रसातळाला पोहोचली आहे. अर्थव्यवस्था खड्ड्यात जात असतानाही केंद्र शासन जागे होत नाही, हे अधिक धोकादायक असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध पत्रकार पी. साईनाथ यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वृत्तपत्र विभागातील विद्यार्थ्यांनी देशपातळीवरील विविध मान्यवरांचे आॅनलाईन मार्गदर्शन आयोजित केले होते. यात पी. साईनाथ यांनी ‘लॉकडाऊनचा संपूर्ण भारतावर तसेच पत्रकारितेवर झालेला परिणाम’ या विषयावर मार्गदर्शन केले. 

यावेळी पी. साईनाथ म्हणाले, मागील तीन वर्षांपासून देश आर्थिक अडचणींचा सामना करीत आहे. बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. यातच कोरोनाच्या काळात अतिशय चुकीच्या पद्धतीने धोरणे आखण्यात आली. लॉकडाऊन जाहीर केला. यात कामगारांचे झालेले स्थलांतर  आणि त्यांचे हाल भयंकर होते. या धक्क्यातून सावरण्यासाठी देशाला मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. मजुरांसाठी जाहीर केलेल्या अन्नधान्यांच्या योजनाही फसव्या होत्या. कामगारांना धान्य घेण्यासाठी पैसे मोजावे लागले आहेत. या काळाचे दीर्घकालीन परिणाम  अर्थव्यवस्थेवर झालेले असतानाच त्यातून पत्रकारिताही सुटलेली नाही. साखळी वृत्तपत्रांच्या महसुलांवर मोठा परिणाम  झाला असून, डिजिटल पत्रकारितेला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे. साध्या पत्रकारितेचे प्रमाण २५ टक्केच झाले असून, स्टेनोग्राफरची संख्या वाढली असल्याचेही पी. साईनाथ यांनी सांगितले.

पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी चांगले पत्रकार होत सामान्य जनतेची पत्रकारिता केली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी  अधिष्ठाता डॉ. चेतना सोनकांबळे, विभागप्रमुख डॉ. दिनकर माने, डॉ. विक्रम खिलारे, डॉ. मारुती तेगमपुरे आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या आयोजनावर आक्षेप?विद्यापीठातील वृत्तपत्र विभागातील विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या आॅनलाईन व्याख्यानमालेला ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ, कुमार केतकर आदींची व्याख्याने आयोजित केली होती. या व्याख्यानमालेत  डाव्या आणि पुरोगामी विचारांच्या व्यक्तींना बोलावण्यात आले होते. यावर उजव्या  विचारांच्या संघटनांना आक्षेप घेतल्याची माहिती समोर आली आहे.  यासाठी राजभवनातून कुलगुरूंवर दबाव आणला असून, कुलगुरूंनी विभागप्रमुखांना बोलावून घेत यापुढे कोणलाही बोलावताना परवानगी घेण्याच्या सूचना केल्याचे वृत्तपत्र विभागातील एका विद्यार्थ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला सांगितले. याविषयी  विभागप्रमुख डॉ. माने यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.  

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्याDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादCentral Governmentकेंद्र सरकारEconomyअर्थव्यवस्था