शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

सिल्लोड तालुक्यात अतिवृष्टीने हाहाकार

By admin | Updated: September 20, 2015 01:11 IST

सिल्लोड : सिल्लोड तालुक्यात गुरुवारी व शुक्रवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वत्र हाहाकार उडाला असून ९०० हेक्टर शेतजमीन पाण्याने खरडून निघाली.

सिल्लोड : सिल्लोड तालुक्यात गुरुवारी व शुक्रवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वत्र हाहाकार उडाला असून ९०० हेक्टर शेतजमीन पाण्याने खरडून निघाली. शंभरच्या वर घरे उद्ध्वस्त झाली. नदीकाठी असलेली जवळपास ६० कुटुंबे बेघर झाली, तर तालुक्यातील २० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. सिल्लोड तालुक्यात गुरुवारी १५७.८८ मि.मी., तर शुक्रवारी ६८.६३ मि.मी. असा २२६.५१ मि.मी. पाऊस झाला. तालुक्यातील बनकिन्होळा, गेवराई सेमी, सोयगाव तालुक्यातील शंभरच्या वर घरे उद्ध्वस्त झाली आहेत, तर ६० कुटुंबे बेघर झाली आहे. बेघर झालेल्या कुटुंबांना गावातीलच जि.प. च्या शाळेत स्थलांतरित करण्यात आले. त्यांची जेवण्याची व्यवस्था केली आहे. ६० गावातील अंधार मिटला...तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोळेगाव, पानवडोद, उंडणगाव, आमठाणा, भराडी सर्कलमध्ये ४८ लघुदाब वाहिनी व ११ केव्ही विजेचे १७ खांब पडले होते. जागोजागी तारा तुटल्या होत्या. गोळेगाव, पानवडोद, उंडणगाव परिसरात ३ ट्रान्सफार्मर फेल झाले होते. यामुळे तालुक्यातील ६० गावे अंधारात होती. महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता ए. एस. गायकवाड, कनिष्ठ अभियंता व तांत्रिक वीज कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करून भर पावसात पोल उभे केले. त्यामुळे शनिवारी दुपारपर्यंत बाधित ६० गावांचा वीजपुरवठा सुरू झाला. पंचनामे करण्याचे आदेशतहसीलदार राहुल गायकवाड यांनी तालुक्यातील ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक यांना तात्काळ नुकसान पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.तालुक्यात कोट्यवधींचे नुकसानआ. अब्दुल सत्तार यांनी सांगितले की, अतिवृष्टीची मी तात्काळ पाहणी केली. कधी नव्हे एवढी अतिवृष्टी सिल्लोड तालुक्यात झाली आहे. कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे यात नुकसान झाले. यामुळे शेतकरी पुन्हा आर्र्थिक संकटात सापडला आहे. शासनाने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना व बेघर झालेल्या नागरिकांना भरघोस मदत करावी.सरकारी यंत्रणा लागली कामालातालुक्यातील बांधकाम विभाग, पंचायत समिती, जि.प. महसूल, कृषी विभाग व विविध विभागांचे सर्व कर्मचारी नैसर्गिक आपत्तीच्या कामाला लागले आहेत. तालुक्यातील गरजूंना ते मदत करून आर्थिक संकटात सापडलेल्या लोकांना धीर देऊन झालेल्या नुकसानीचे पंचनामे करीत आहेत. येत्या दोन दिवसांत झालेल्या नुकसानीचा मूळ आकडा समजेल, असे उपजिल्हाअधिकारी दीपक धाडगे यांनी सांगितले.