शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

भोनगिरी येथे अतिसाराचा उद्रेक

By admin | Updated: July 21, 2014 00:23 IST

भूम : तालुक्यातील भोनगिरी येथे ग्रामस्थांना अशुद्ध पाणीपुरवठा झाल्याने अतिसाराची साथ पसरली आहे.

भूम : तालुक्यातील भोनगिरी येथे ग्रामस्थांना अशुद्ध पाणीपुरवठा झाल्याने अतिसाराची साथ पसरली आहे. ३७ जणांना या आजाराची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर गावामध्येच उपचार करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.शहरापासून ५ कि.मी. अंतरावर असलेल्या भोनगिरी येथील ग्रामस्थांना दूषित पाणी पुरवठा झाला. त्यामुळे १८ जुलैपासून येथील ग्रामस्थांना अतिसाराच्या साथीने त्रस्त झाले आहेत. १९ जुलै रोजी येथील जिल्हा परिषद शाळेत पथकाने ९३ जणांची तपासणी केली. यावेळी ३४ जणांना अतिसाराची लागण झाली असल्याचे समोर आले. त्यानंतर २० जुलै रोजीही १८ जणांची आरोग्य तपासणी केली. या तपासणीदरम्यान तीन जणांना अतिसाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या आजाराची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा ३७ वर जावून ठेपला आहे. दरम्यान, आरोग्य विभागाच्या पथकाकडून ही अतिसाराची साथ आटोक्यात आल्याचा दावा केला जात आहे. तर दुसरीकडे रुग्णांची संख्या वाढत आहे. पथकामध्ये वैद्यकीय अधिकारी एम.एस. सलगर, आरोग्य सेविका ठोकळ यांच्यासह कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ग्रामसेवकही तळ ठोकून आहेत. (वार्ताहर)अशुद्ध पाणीपुरवठागावाला अशुद्ध पाणीपुरवठा झाल्यामुळेच अतिसाराची लागण झाल्याचे येथील काही ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. त्यामुळे ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा करताना काळजी घेण्याची गरज यानिमित्ताने झाली आहे.पाण्याच्या टाकीची साफसफाईअतिसाराची साथ पसरल्यानंतर ग्रामपंचायतीने गावाला पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या टाकीची साफसफाई केली आहे. तसेच ब्लिचींग पावडरही टाकण्यात आली आहे. यासोबतच स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून अन्य उपाययोजनाही केल्याचे वैद्यकीय अधिकारी एस.आर. खराडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.