शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

विष्णूपुरीचे अतिरिक्त पाणी आता तलावात साठणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 00:07 IST

अशिया खंडातील सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प असलेल्या विष्णूपुरी प्रकल्पावर बांधण्यात आलेल्या उजव्या कालव्यातून शेतकºयांना पाणी सोडण्याचा मार्ग आता मोकळा होणार आहे. यासाठीची विद्युत यंत्रणा आणि तसेच त्याच्या दुरुस्तीसाठीचे नियोजन करण्यात आले असून या ठिकाणी दोन मोठे रोहित्र बसविण्यासाठी राज्य शासनाने ४ कोटी ५९ लाख ८८ हजार ९८५ रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: अशिया खंडातील सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प असलेल्या विष्णूपुरी प्रकल्पावर बांधण्यात आलेल्या उजव्या कालव्यातून शेतकºयांना पाणी सोडण्याचा मार्ग आता मोकळा होणार आहे. यासाठीची विद्युत यंत्रणा आणि तसेच त्याच्या दुरुस्तीसाठीचे नियोजन करण्यात आले असून या ठिकाणी दोन मोठे रोहित्र बसविण्यासाठी राज्य शासनाने ४ कोटी ५९ लाख ८८ हजार ९८५ रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे.सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प म्हणून विष्णूपुरीकडे पाहिले जाते. १९९० साली बांधकाम पूर्ण होऊन हा प्रकल्प सिंचन व्यवस्थापनाकडे हस्तांतरीत झाला. या प्रकल्पासाठी नांदेड शहराच्या वरील बाजूस १० किलोमीटर अंतरावर गोदावरी नदीवर बंधारा बांधण्यात आला आहे. सदर बंधाºयाची लांबी ३२१ मीटर आहे. कालव्याद्वारे येणारे पाणी लिफ्ट करणे व शेतीला पुरविण्यात येते. मात्र यामध्ये मागील काही वर्षांपासून अडसर येत होता. त्यातच विष्णूपुरी प्रकल्पाचा खंडित झालेला विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज वितरण कंपनी आणि पाटबंधारे मंडळ यांच्यात समन्वय नव्हता. दरम्यान, आ. हेमंत पाटील यांनी डिसेंबर २०१६ मध्ये झालेल्या एका बैठकीत हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्रीमहोदय व वरिष्ठ अधिकाºयांत समन्वय घडवून आणला. याच बैठकीत वीज बिलाचा भरणाही समन्वयाने करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, या मान्यतेमुळे नांदेड व लोहा तालुक्यातील सुमारे ५२ गावांतील शेतकºयांना याचा लाभ मिळणार असून याबाबतचे काम पूर्ण झाल्यानंतर या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात आंध्र प्रदेशात वाहून जाणारे पाणी या नव्या यंत्रणेद्वारे वेगवेगळ्या लिफ्ट मार्फत तलावातच साठविणे शक्य होणार आहे.रोहित्र उभारणीसह रोहित्राची दुरुस्ती तसेच अन्य दुरुस्त्या, पुरवठा व उभारणी तसेच चाचणी कामासाठी लागणारा निधी व विशेष दुरुस्तीसाठी मोठा खर्च होता. खरीप व रबी हंगामात सदरची यंत्रणा पूर्णत: ठप्प पडल्याने कालव्याद्वारे येणारे पाणी शेतकºयांना मिळत नव्हते. मात्र ३१ आॅगस्ट रोजी याबाबतचा निर्णय झाल्याने शेतकºयांना कालव्याद्वारे पाणी मिळण्याचा मार्गही मोकळा होणार आहे. रखडलेला हा प्रश्न मार्गी लागल्याने या निर्णयाचे शेतकºयांतून स्वागत होत आहे.