शहरं
Join us  
Trending Stories
1
White House Shooting: गोळीबारानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या संयमाचा कडेलोट; म्हणाले, "आता विदेशातील प्रत्येक नागरिकाला..."
2
वॉशिंग्टन: नॅशनल गार्ड्सवर भररस्त्यात गोळीबार करणारा 'तो' तरूण कोण? महत्त्वाची माहिती समोर
3
धक्कादायक! ज्याला मुलगा मानले, त्याच्यासोबतच प्रेमसंबंधाचे टोमणे, दोन सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
4
"ज्यांनी निवडून आणलं त्यांच्याच घरी जाऊन..."; नीलेश राणेंच्या 'स्टिंग ऑपरेशन'वर भाजप प्रदेशाध्यक्षांचे थेट प्रत्युत्तर
5
नोकरी सोडली किंवा काढलं, आता २ दिवसांत होणार फुल अँड फायनल सेटलमेंट! नव्या 'लेबर लॉ'नं बंदलला खेळ
6
कोट्यवधी कर्जदारांना RBI चा मोठा दिलासा! क्रेडिट स्कोअरबाबत मोठा निर्णय; कर्ज आणि EMI त्वरित होईल स्वस्त!
7
Mohammed Siraj: "एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानातून प्रवास करू नका" सिराज असं का म्हणाला?
8
लोकगायिका नेहा सिंह राठोड झालीय बेपत्ता? संपर्क नाही, नोटिशीला उत्तरही नाही, पोलीस घेताहेत शोध
9
माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू झाला आहे का? पाकिस्तान सरकारने दिली माहिती
10
Donald Trump: "खूप मोठी किंमत मोजावी लागेल" व्हाईट हाऊस जवळील गोळीबारानंतर डोनाल्ड ट्रम्प संतापले!
11
शेतकरी कर्जवसुलीस एक वर्षाची स्थगिती; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा
12
Mumbai Video: वासनांध नजर, अश्लील हातवारे; मुंबईतील रेल्वे स्टेशनवर तरुणीने लगावल्या कानशि‍लात, व्हिडीओ व्हायरल
13
देशातील सर्वात महागडी नंबर प्लेट, कोट्यवधीमध्ये झाली विक्री, एवढ्या किमतीत आली असती एक आलिशान कार
14
आईच्या नावे पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये महिन्याला गुंतवा ₹४०००; मॅच्युरिटीवर मिळेल लाखोंचा फंड, पैसाही सुरक्षित
15
चार-पाच लोकांमध्ये झाली होती 'सीक्रेट डील'; शिवकुमार यांचा माघार घेण्यास नकार, काँग्रेस काय करणार?
16
पुण्यात तीन लाख, तर पिंपरी-चिंचवडमध्ये ९२ हजार बोगस मतदार; उद्धवसेनेचा आरोप
17
धर्मेंद्र यांची संपत्ती नको, फक्त 'ती' एक गोष्ट हवी; लेक अहाना देओलने व्यक्त केलेली इच्छा
18
Share Market Today: शेअर बाजारात जोरदार तेजी; Nifty वर्षभरानंतर नव्या उच्चांकाजवळ, बँक निफ्टीतही विक्रमी तेजी
19
आगीच्या ज्वाळा, धुराचे लोट, ४४ जणांचा मृत्यू... हाँगकाँगमध्ये गगनचुंबी इमारतीला आग (PHOTOS)
20
IND vs SA: गुवाहाटी कसोटी पराभवामुळे चाहते संतापले, गंभीरच्या तोंडावरच त्याला म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

विष्णूपुरीचे अतिरिक्त पाणी आता तलावात साठणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 00:07 IST

अशिया खंडातील सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प असलेल्या विष्णूपुरी प्रकल्पावर बांधण्यात आलेल्या उजव्या कालव्यातून शेतकºयांना पाणी सोडण्याचा मार्ग आता मोकळा होणार आहे. यासाठीची विद्युत यंत्रणा आणि तसेच त्याच्या दुरुस्तीसाठीचे नियोजन करण्यात आले असून या ठिकाणी दोन मोठे रोहित्र बसविण्यासाठी राज्य शासनाने ४ कोटी ५९ लाख ८८ हजार ९८५ रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: अशिया खंडातील सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प असलेल्या विष्णूपुरी प्रकल्पावर बांधण्यात आलेल्या उजव्या कालव्यातून शेतकºयांना पाणी सोडण्याचा मार्ग आता मोकळा होणार आहे. यासाठीची विद्युत यंत्रणा आणि तसेच त्याच्या दुरुस्तीसाठीचे नियोजन करण्यात आले असून या ठिकाणी दोन मोठे रोहित्र बसविण्यासाठी राज्य शासनाने ४ कोटी ५९ लाख ८८ हजार ९८५ रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे.सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प म्हणून विष्णूपुरीकडे पाहिले जाते. १९९० साली बांधकाम पूर्ण होऊन हा प्रकल्प सिंचन व्यवस्थापनाकडे हस्तांतरीत झाला. या प्रकल्पासाठी नांदेड शहराच्या वरील बाजूस १० किलोमीटर अंतरावर गोदावरी नदीवर बंधारा बांधण्यात आला आहे. सदर बंधाºयाची लांबी ३२१ मीटर आहे. कालव्याद्वारे येणारे पाणी लिफ्ट करणे व शेतीला पुरविण्यात येते. मात्र यामध्ये मागील काही वर्षांपासून अडसर येत होता. त्यातच विष्णूपुरी प्रकल्पाचा खंडित झालेला विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज वितरण कंपनी आणि पाटबंधारे मंडळ यांच्यात समन्वय नव्हता. दरम्यान, आ. हेमंत पाटील यांनी डिसेंबर २०१६ मध्ये झालेल्या एका बैठकीत हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्रीमहोदय व वरिष्ठ अधिकाºयांत समन्वय घडवून आणला. याच बैठकीत वीज बिलाचा भरणाही समन्वयाने करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, या मान्यतेमुळे नांदेड व लोहा तालुक्यातील सुमारे ५२ गावांतील शेतकºयांना याचा लाभ मिळणार असून याबाबतचे काम पूर्ण झाल्यानंतर या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात आंध्र प्रदेशात वाहून जाणारे पाणी या नव्या यंत्रणेद्वारे वेगवेगळ्या लिफ्ट मार्फत तलावातच साठविणे शक्य होणार आहे.रोहित्र उभारणीसह रोहित्राची दुरुस्ती तसेच अन्य दुरुस्त्या, पुरवठा व उभारणी तसेच चाचणी कामासाठी लागणारा निधी व विशेष दुरुस्तीसाठी मोठा खर्च होता. खरीप व रबी हंगामात सदरची यंत्रणा पूर्णत: ठप्प पडल्याने कालव्याद्वारे येणारे पाणी शेतकºयांना मिळत नव्हते. मात्र ३१ आॅगस्ट रोजी याबाबतचा निर्णय झाल्याने शेतकºयांना कालव्याद्वारे पाणी मिळण्याचा मार्गही मोकळा होणार आहे. रखडलेला हा प्रश्न मार्गी लागल्याने या निर्णयाचे शेतकºयांतून स्वागत होत आहे.