शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

आरटीईच्या प्रवेश अर्जासाठी ३० मार्चपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:05 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील ६०३ शाळांत ३६२५ मोफत प्रवेशासाठी आरटीईची २०२१-२२ साठी प्रवेश प्रक्रिया ३ मार्चपासून सुरू झाली. मात्र, तांत्रिक ...

औरंगाबाद : जिल्ह्यातील ६०३ शाळांत ३६२५ मोफत प्रवेशासाठी आरटीईची २०२१-२२ साठी प्रवेश प्रक्रिया ३ मार्चपासून सुरू झाली. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे ११ ते १५ मार्चपर्यंत ओटीपी येत नव्हता. तांत्रिक समस्या दूर होईपर्यंत अर्ज भरू नयेत, असे आवाहन पालकांना शिक्षण विभागाने केले होते. आता ती अडचण दूर झाली असून २१ मार्चपर्यंत असलेली मुदत वाढवून ३० मार्च करण्यात आली आहे.

खासगी शाळांतील २५ टक्के जागांवर आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रियेतून मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यान्वये प्रवेश देण्यात येतात. त्यासाठी ३ ते २१ मार्चपर्यंत अर्ज प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, ९ हजार ७५१ अर्ज आतापर्यंत करण्यात आले. ११ ते १५ मार्चपर्यंत ओटीपीच्या तांत्रिक अडचणी होत्या. आता ती अडचण दूर झाल्याने अर्ज करण्याची सूचना शिक्षण विभागाने केली असून ३० मार्चपर्यंत आरटीईतून प्रवेशासाठी पालकांना अर्ज करता येणार आहे.