शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

औरंगाबादेत आगामी पाच वर्षांत विमानसेवेचा विस्तार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 20:04 IST

जगप्रसिद्ध अजिंठा, वेरूळ लेण्यांमुळे जगभरातील पर्यटक औरंगाबादला येतात. शहरात औद्योगिकीकरणही वाढलेले आहे. त्यामुळे विमानसेवेचा विस्तार वाढण्यासाठी सर्व काही असूनही मोजकी विमानसेवा आहे.

औरंगाबाद : जगप्रसिद्ध अजिंठा, वेरूळ लेण्यांमुळे जगभरातील पर्यटक औरंगाबादला येतात. शहरात औद्योगिकीकरणही वाढलेले आहे. त्यामुळे विमानसेवेचा विस्तार वाढण्यासाठी सर्व काही असूनही मोजकी विमानसेवा आहे. त्यामुळे स्थानिक राजकारण आणि प्रशासनाने योग्य पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे. तरीही पाच वर्षांत विमानसेवेचा आणखी विस्तार होईल, असे भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे पश्चिम क्षेत्राचे कार्यकारी संचालक केशव शर्मा म्हणाले.

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उभारण्यात आलेल्या ध्वजस्तंभाचा (हायमास्ट) गुरुवारी (दि. २९) उद्घाटन सोहळा केशव शर्मा यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांची उपस्थिती होती. यावेळी १०० फूट उंच राष्ट्रीय ध्वज फडकविण्यात आला. डी. जी. साळवे यांनी औरंगाबाद विमानतळाच्या इतिहासाची माहिती देऊन आंतरराष्ट्रीय कार्गो सेवा महिनाभरात सुरू होणार असल्याचे सांगितले.  विमानतळ विस्तारीकरणासाठी १८२ एकर जमीन अधिग्रहणाची कारवाई सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. डॉ.  भापकर यांनी विमानतळाच्या विकासाबाबत शासनाकडून पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. शरद येवले यांनी आभार मानले.

कंपन्यांकडे विमानांचा तुटवडासध्या विमान कंपन्यांकडे विमानांचा तुटवडा आहे. आगामी कालावधीत विमान कंपन्यांकडे ९०० विमाने येण्याची शक्यता आहे. यामुळे मराठवाड्यातून विविध शहरांसाठी विमानसेवा सुरू होण्यास चालना मिळेल, असे केशव शर्मा म्हणाले. नवल किशोर राम यांनी जिल्हा प्रशासनातर्फे  विमानसेवेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. सध्या विमान कंपन्यांकडे विमानांचा तुटवडा आहे. आगामी कालावधीत विमान कंपन्यांकडे ९०० विमाने येण्याची शक्यता आहे. यामुळे मराठवाड्यातून विविध शहरांसाठी विमानसेवा सुरू होण्यास चालना मिळेल, असे केशव शर्मा म्हणाले. नवल किशोर राम यांनी जिल्हा प्रशासनातर्फे  विमानसेवेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.  

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळAirportविमानतळtourismपर्यटनMIDCएमआयडीसीPoliticsराजकारण