शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
2
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
3
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
4
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
5
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
6
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
7
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
8
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
9
France Gen-Z Protest: फ्रान्समध्ये Gen- Z चा संताप! लिमामध्ये DINA विरोधात बंड, दगडफेक आणि पोलिसांशी झटापट
10
...तर पतीच्या प्रेयसीकडून पत्नीला मिळेल भरपाई; हायकोर्टानं नोंदवली निरीक्षणे
11
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
12
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
13
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
14
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
15
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
16
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
17
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
18
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
19
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
20
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण

सदृढ लोकशाहीसाठी जबाबदारीने अभिव्यक्त व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 23:42 IST

लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत. निवडणुकीत सोशल मीडियाचे महत्त्व अधिक असणार आहे. यात नकारात्मक भावना बाजूला सारून सुदृढ लोकशाहीसाठी तरुणांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अभिव्यक्त व्हावे, अशा भावना विविध मान्यवरांनी व्यक्त केल्या.

ठळक मुद्देपॉलिटिकल कट्टा : विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागात अभिनव उपक्रम; राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची उपस्थिती

औरंगाबाद : लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत. निवडणुकीत सोशल मीडियाचे महत्त्व अधिक असणार आहे. यात नकारात्मक भावना बाजूला सारून सुदृढ लोकशाहीसाठी तरुणांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अभिव्यक्त व्हावे, अशा भावना विविध मान्यवरांनी व्यक्त केल्या.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागात एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे. ‘पॉलिटिकल कट्टा’ या नावाने सुरू केलेल्या या उपक्रमात विविध समस्यांवर राजकीय चर्चा घडवून आणली जाणार आहे. पहिल्याच पॉलिटिकल कट्ट्यात ‘सोशल मीडिया अ‍ॅण्ड इटस् आफ्टर इफेक्टस्’ या विषयावर चर्चा घेण्यात आली. यात एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील, युवक काँग्रेसचे समर्थ हनुमंत पवार, भाजयुमोचे कार्यकर्ते मल्हार गंधे, कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडियाचे अ‍ॅड. अभय टाकसाळ यांना अमंत्रित केले होते. निवेदकाची भूमिका ज्येष्ठ विचारवंत जयदेव डोळे यांनी पार पाडली. कार्यक्रमाचे मुख्य संयोजक विभागप्रमुख डॉ. प्रशांत अमृतकर यांनी प्रास्ताविक केले. यात त्यांनी आयोजनामागील भूमिका मांडली. आमची कोणती जात नाही, कोणता धर्म नाही; पण संविधानाने घालून दिलेल्या संकेतांचे पालन करून सुदृढ लोकशाहीसाठी अभिव्यक्तीचे एक जबाबदार व्यासपीठ आम्ही तरुणांना उपलब्ध करून देत आहोत. यानंतरदेखील विविध विषयांवर पोलिटिकल कट्ट्यामध्ये विविध विषयांवर चर्चा होणार असल्याचे डॉ. अमृतकर यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाला डॉ. शुजा शाकीर, डॉ. दासू वैद्य, डॉ. मुस्तजीब खान, डॉ. उल्हास उढाण, राजेश मुंढे आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.कोण काय म्हणाले...- आमदार जलील म्हणाले की, सोशल मीडियामुळे देशाच्या राजकारणाला नवी दिशा मिळाली असून, येणाऱ्या काळात राजकारणात सोशल मीडियाचा वापर सर्वात जास्त होणार आहे. २०१४ मध्ये भाजपाने सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर केला. याचा गैरवापरही करण्यात आला असल्याचा आरोप केला.- भाजयुमोचे मल्हार शिंदे म्हणाले की, आजपर्यंत राजकीय नेते जनतेपर्यंत पोहोचत नव्हते. आता लोकच नेत्यांपर्यंत पोहोचत आहेत. ही एक क्रांती झाली आहे. एखादी घटना तात्काळ व्हायरल होऊ लागल्यामुळे नेतेही सावधपणे बोलताना दिसून येत आहेत.- युवक काँग्रेसचे हणमंत पवार म्हणाले की, सोशल मीडियावर व्यक्त होताना संसदीय संकेत पाळले पाहिजेत, असा आदेश आमच्या पक्षाकडून दिला जातो. जो कार्यकर्ता याचे पालन करीत नाही त्यांना नोटीस दिली जाते किंवा काढून टाकले जाते.- सीपीआयचे अ‍ॅड. अभय टाकसाळ म्हणाले की, आमचा पक्ष ज्या जनतेचे प्रतिनिधित्व करतो तो शोषित आणि वंचित समूह असल्यामुळे त्यांच्याकडे अ‍ॅण्ड्रॉईडचे फोन नाहीत, तरीपण जेवढे शक्य आहे तेवढा वापर करून आम्ही जनतेपर्यंत पोहोचण्याचे काम करीत आलो आहोत. राजकीय पक्ष सोशल मीडिया वापरत आहेत की, सोशल मीडिया राजकीय पक्षांचा वापर करीत आहे, हे कळत नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :Educationशिक्षणPoliticsराजकारण