शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

महागड्या टँकरची औरंगाबादकरांना झळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 23:59 IST

उन्हाळ्याला सुरुवात होताच शहरात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनत आहे. महापालिका समाधानकारक पाणी देऊ शकत नाही, त्यामुळे आजही शहरातील हजारो नागरिकांना दररोज खाजगी टँकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. खाजगी टँकरचालक फक्त वापरण्यायोग्य पाणी देतात. यासाठीही दरामध्ये प्रचंड वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे औरंगाबादकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

ठळक मुद्देनागरिक त्रस्त : मनपाकडून कोणत्याच उपाययोजना नाहीत

औरंगाबाद : उन्हाळ्याला सुरुवात होताच शहरात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनत आहे. महापालिका समाधानकारक पाणी देऊ शकत नाही, त्यामुळे आजही शहरातील हजारो नागरिकांना दररोज खाजगी टँकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. खाजगी टँकरचालक फक्त वापरण्यायोग्य पाणी देतात. यासाठीही दरामध्ये प्रचंड वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे औरंगाबादकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.शहराच्या आसपास किमान २५० वसाहतींना महापालिका पाणी देत नाही. यातील काही वसाहतींना टँकरद्वारे पाणीपुरवठा होतो. ज्या नागरिकांनी टँकरसाठी अ‍ॅडव्हान्स पैसे भरले आहेत, त्यांनाच टँकरद्वारे दोन दिवसाआड दोन ड्रम पाणी देण्यात येते. मनपाकडून फक्त पिण्यासाठी म्हणून पाणी देण्यात येते. वापरण्यासाठी आज हजारो नागरिकांना पाणी मिळत नाही. नाइलाजास्तव नागरिकांना खाजगी टँकर मागवावे लागते. मार्च महिन्याला सुरुवात होताच टँकर लॉबीनेही दरामध्ये भरमसाठ वाढ केली आहे. किलोमीटरनुसार याचे दर आहेत. जेथे टँकर भरण्यात येते तेथून अंतर मोजण्यात येते. जिथे पाणी नेऊन टाकायचे आहे, तेथील अंतर जास्त असल्यास दरही सर्वाधिक असतात. दोन हजार लिटरचे टँकर २ कि.मी. अंतरापर्यंत कोणी मागविले तर ३५० रुपये दर आकारला जातो. ४ कि.मी. अंतर असल्यास ४०० रुपये. किलोमीटर जसजसे वाढेल तसे शंभर रुपये वाढत जातात, असे एका टँकर विक्रेत्याने सांगितले. शहराच्या आसपास ज्या नवीन वसाहती तयार झाल्या आहेत, त्या भागातील विंधन विहिरींचे पाणी आता आटले आहे. अनेक विहिरींनी तळ गाठला आहे.मनपाचे ९४ टँकरमहापालिकेमार्फत सध्या ९४ टँकर सुरू आहेत. नागरिकांनी पैसे भरून टँकर मागविले तर दोन ते तीन तासांमध्ये पाणी देण्यात येते. पाच हजार लिटरचे टँकर ८९० रुपयांमध्ये, तर १० हजार लिटरसाठी १७८० रुपये द्यावे लागतात. गुंठेवारी भागातील असंख्य नागरिक पैसे भरून मनपाकडून पाणी घेतात. एका नागरिकाकडून दरमहा ३६६ रुपये भरून घेण्यात येतात. महिन्यातून १८ ते २० ड्रम पाणी मनपाकडून देण्यात येते. १८ ते २० नागरिकांनी ग्रुप तयार करून पाणी घ्यावे, अशी मनपाची अट आहे.खाजगी टँकरचे दर२ हजार लिटर३५० ते ४००.........................५ हजार लिटर१ हजार रुपये.......................१० हजार लिटर१२०० ते १५००

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater scarcityपाणी टंचाई