शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

औरंगाबाद दौ-यात मंत्र्यांकडून अपेक्षाभंग...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 23:56 IST

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री जे.पी. नड्डा यांच्या औरंगाबाद दौ-यामुळे मराठवाड्याच्या पदरी काहीतरी नवीन पडेल, नवीन घोषणा होईल, अशी अपेक्षा होती; परंतु त्यांनी काहीच दिले नाही. केवळ अर्थसंकल्पातील तरतुदी आणि सुरू असलेल्या प्रकल्पांविषयी भाषण करून केंद्र सरकार आरोग्यासाठी कशी उत्कृष्ट कामगिरी करीत आहे, याचे दाखले देत आटोपते घेतले. त्यामुळे त्यांनी निराशा केल्याची कुजबुज कार्यक्रमस्थळी सुरू होती.

ठळक मुद्देराज्य कर्करोग संस्थेचे भूमिपूजन : केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा दौरा वांझोटाच

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री जे.पी. नड्डा यांच्या औरंगाबाद दौ-यामुळे मराठवाड्याच्या पदरी काहीतरी नवीन पडेल, नवीन घोषणा होईल, अशी अपेक्षा होती; परंतु त्यांनी काहीच दिले नाही. केवळ अर्थसंकल्पातील तरतुदी आणि सुरू असलेल्या प्रकल्पांविषयी भाषण करून केंद्र सरकार आरोग्यासाठी कशी उत्कृष्ट कामगिरी करीत आहे, याचे दाखले देत आटोपते घेतले. त्यामुळे त्यांनी निराशा केल्याची कुजबुज कार्यक्रमस्थळी सुरू होती.औरंगाबादेतील शासकीय कर्करोग रुग्णालयास राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा दिली असून, संस्थेचे भूमिपूजन आणि भाभा ट्रॉन-२ युनिटचे उद्घाटन रविवारी (दि.११) जे. पी. नड्डा यांच्या हस्ते झाले. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन अध्यक्षस्थानी होते. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महापौर नंदकुमार घोडेले, आ. अतुल सावे, आ. सुभाष झांबड, आ. प्रशांत बंब, टाटा मेमोरियल रुग्णालयाचे शैक्षणिक संचालक डॉ. कैलास शर्मा, वैद्यकीय शिक्षण सचिव संजय देशमुख, वैद्यकीय शिक्षण सहसंचालक डॉ. प्रकाश वाकोडे, सहसंचालक डॉ. सुरेश बारपांडे, जि. प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, घाटीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे, डॉ. भागवत कराड, शिरीष बोराळकर, नवदीप यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.यावेळी जे. पी. नड्डा म्हणाले, कर्करोगाच्या दृष्टीने दूरपर्यंत विचार करण्यात आला आहे. देशात हरियाणा येथील झंजर आणि कोलकता येथील चित्तरंजन येथे नॅशनल कॅन्सर सेंटर उभारण्यात येत आहे. टाटा मेमोरियल रुग्णालयासोबत बनारस, आसामसह विविध ठिकाणी इन्स्टिट्यूट सुरू होत आहे. ५० टर्शरी केअर सेंटरपैकी एक मराठवाड्यातील लातूरमध्ये होत आहे. २० राज्य कर्करोग संस्थांपैकी एक औरंगाबादेत आहे. स्वच्छ भारतसह आरोग्यदायी भारत होईल, यादृष्टीने वाटचाल सुरू आहे. डायलिसिस योजना लागू केली आहे. रुग्णालयांवर रुग्णसेवेचा भार अधिक असतो. त्यामुळे उपचारांच्या सोयी-सुविधांबरोबर प्रतिबंधात्मक उपाययोजनांवरही भर दिला जात आहे.गिरीश महाजन म्हणाले, रुग्णांना आरोग्य सुविधा देण्यासाठी वेगवेगळ्या विभागांत सेंटर उभे केले जात आहे. याठिकाणी यंत्रसामुग्री देण्यासह मनुष्यबळाचा प्रश्न सोडविला जाईल.हरिभाऊ बागडे म्हणाले, १२ रुपयांत २ लाखांचा अपघात विमा मिळतो. परंतु हा विमा घेतला जात नाही. परंतु मोबाईल बंद पडला की पैसे खर्च केले जातात. मोबाईल कधीही बंद पडत नाही. त्यामुळे हा विमा मोबाईल कार्डशी जोडला पाहिजे. डॉ. कैलास शर्मा म्हणाले, शासनाने रुग्णालयास मनुष्यबळ, चांगली उपकरणे उपलब्ध करून द्यावीत. रुग्णसेवेसाठी ते महत्त्वपूर्ण ठरेल.वैद्यकीय महाविद्यालयातीलजागांत वाढदेशभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत ‘यूजी’च्या १० हजार तर ‘पीजी’च्या ८ हजार ५०० जागा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबरोबच जिल्हा रुग्णालयांचे विस्तारीकरण करून ५८ वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यात येत आहेत. यामध्ये गोंदिया येथील जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय महाविद्यालयात रुपांतर करीत आहोत. त्यासाठी १८९ कोटी रुपये दिले जात असल्याचे नड्डा म्हणाले.तोगडियांविषयी बोलण्याचे टाळलेदेशाचे आरोग्य अतिदक्षता विभागात दाखल आहे. सरकारी आरोग्य व्यवस्थेत पुरेसे डॉक्टर नाहीत, परिचारिका नाहीत, असे विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया कालच औरंगाबादेत म्हणाले होते. याविषयी पत्रकार परिषदेत विचारले असता नड्डा यांनी बोलण्याचे टाळले. प्रतिबंधात्मक उपायाविषयी बोलत सारवासारव केली. कर्करोगाला कारणीभूत ठरणाºया पदार्थांच्या उत्पादन बंदीविषयीही ते बोलले नाही.कर्करोगाची युनिव्हर्सल स्क्रिनिंगआजारांकडून निरोगाकडे जाण्यासाठी आयुष्यमान भारत अभियानांतर्गत दीड लाख आरोग्य उपकें द्र वेलनेस सेंटरमध्ये रुपांतरित क रून नागरिकांची युनिव्हर्सल स्क्रिनिंग केली जाणार आहे. याठिकाणी गर्भाशय, ब्रेस्ट, मुख कर्करोगानसह उच्च रक्तदाब आणि मधुमेह तपासणी होईल.यामध्ये ३० वर्षांपर्यंतच्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी होईल. त्यामुळे लवकर निदान होऊन उपचार होतील. यातून कर्करोगाने मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असे नड्डाम्हणाले. परंतु वेलनेस सेंटरदेखील अंर्थसंकल्पात होतेटीबीला रोखण्यासाठी अर्थसंकल्पात ६०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. ‘टीबी’च्या रुग्णांना दरमहा ५०० रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून या होत्या अपेक्षाघाटी रुग्णालयात केंद्र आणि राज्य सरकारच्या साह्याने उभारण्यात येत असलेल्या २५३ खाटांच्या स्वतंत्र सुपर स्पेशालिटी विभागासाठी पदनिर्मिती आणि पदस्थापनेची प्रतीक्षा आहे. घाटीत जन औषधी (जेनरिक) केंद्र कागदावरच आहे. याबरोबर शासकीय दंत महाविद्यालयाच्या जुन्या वसतिगृहाचे नूतनीकरण करून तेथे अतिविषोपचार केंद्र सुरू करण्याचा प्रस्तावदेखील रेंगाळला आहे. यासह अनेक रखडलेल्या प्रस्तावांपैकी काहीतरी मार्गी लागेल, नवीन काही मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु यासाठी आरोग्यमंत्र्यांना प्रस्ताव, निवेदन देण्याचीच वेळ आली. त्यामुळे या प्रश्नांसाठी पाठपुरावा करण्याशिवाय पर्याय नसल्याचे दिसते.