शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

पीकविम्याला मुदतवाढ; बँकांची अनास्था कायम

By admin | Updated: August 3, 2014 01:12 IST

हिंगोली : खरीप हंगामातील पीक विम्याच्या जनजागृत्तीबद्दल कृषी विभागाला सोयरसुतक नसल्याने वंचित उत्पादकांना विम्याच्या मुदतवाढीची मागणी करावी लागली.

हिंगोली : खरीप हंगामातील पीक विम्याच्या जनजागृत्तीबद्दल कृषी विभागाला सोयरसुतक नसल्याने वंचित उत्पादकांना विम्याच्या मुदतवाढीची मागणी करावी लागली. अपेक्षेनुसार १६ आॅगस्टपर्यंत मूदतवाढ झाली असली तरी शेतकऱ्यांना विमा देण्यात बँकांची अनास्था कायम आहे. खुद्द मध्यवर्ती बँकेलाच यंदाच्या टार्गेटचा विसर पडला असून पीकविमा दिलेल्या राष्ट्रीयीकृत बँकांची माहिती नसल्याचे समोर आले आहे. आजही बहुतांश शेतकऱ्यांकडून पीकविमा काढला जात नाही. मुळात शेतकऱ्यांना विम्याच्या मुदतीची माहिती नसते. कशीतरी महिती मिळाल्यानंतर बँकांच्या अनास्थेला सामोरे जावे लागते. खेटे मारून थकलेले शेतकरी पीकविम्याचा नाद सोडून देतात. जागरूक शेतकरी कागदपत्रांच्या कात्रीत अडकतात. यंदाही हीच बोंब झाल्याने विम्याची मुदत संपून गेली होती. परिणामी, उत्पादकांनी मुदतवाढीची मागणी केल्यानंतर १६ आॅगस्टपर्यंत कालावधी वाढवला; परंतु जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांच्या अनास्थेमुळे वाढीव कालावधीदेखील उत्पादकांना अपुरा पडेल. नियमित ग्राहक सोडून विम्याच्या कामासाठी कर्मचारी नाक मुरडतात. शाखा व्यवस्थापकांनादेखील विम्याचे काम लादल्यासारखे वाटते.परिणामी, बँकांचे उंबरे झिजवून उत्पादक विमा काढण्याचे सोडून देतात. म्हणून लीड बँकेने याकडे कटाक्षाने लक्ष देऊन जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांना सूचना देण्याची मागणी होत आहे. खरीप हंगामाच्या पीक विम्याबद्दल काहीही महिती नसल्याने एकदाही विमा काढला नसल्याचे अंबादास पांढरे आणि अर्जुन वाबळे यांनी सांगितले. तारखेची माहिती नाही, मुदत वाढवलेलीही माहिती नाही. यापूर्वी कृषी सहाय्यक, तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी याबद्दल काही सांगितलेही नाही. त्यामुळे कधी पीकविमा काढला नसल्याचे दोन्ही उत्पादक म्हणाले. विम्याबद्दल शाखा व्यवस्थापक अनभिज्ञजिल्हातील उत्पादकांना यंदा देण्यात येणाऱ्या पीकविम्याच्या टार्गेटबद्दल जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखा व्यवस्थापक अनभिज्ञ आहेत. नव्याने तारीख वाढवण्यापूर्वी काढलेल्या विम्याची माहितीसुद्धा बँकेकडून घेण्यात आलेली नाही. इतर बँकांनी कागदपत्रे पाठवून दिले असले तरी मध्यवर्ती बँकेकडून त्याचे मोजमाप केले नसल्याचे शाखा व्यवस्थापक जाधव यांनी सांगितले. परिणामी जिल्ह्यातील कोणत्या बँकेने किती शेतकऱ्यांना विमा दिली, बँकांनी टार्गेट पूर्ण केले?, कोणाचे टार्गेट राहिले?, कोणत्या बँका उत्पादकांना विम्यास टाळाटाळ करतात? या बँकेला काहीही माहिती नसल्याचे शनिवारी समोर आले. विम्यासाठी लागणाऱ्या बेबाकी प्रमाणपत्रासाठी बँकेतील कर्मचारी पैसे मागत असल्याची तक्रार हिंगोली तालुक्यातील खंडाळा येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. तब्बल १६ बँकेची बेबाकी घेण्यासाठी लागत असलेली रक्कम विम्याच्या रक्कमेच्या पुढे जाते. शेतकऱ्यांना तत्काळ बेबाकी दिलीही जात नाही. पैशांसाठी चार-चार दिवस झुलवत ठेवल्या जात असल्याचा आरोप या निवेदनात केला आहे. निवेदनावर रामेश्वर गायकवाड, अनिल गायकवाड, दिलीप जाधव, संतोष गिरी, बाबूराव गायकवाड, माधव गायकवाड, रमेश जाधव, प्रकाशराव पोले, गणेश गायकवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.