शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

पीकविम्याला मुदतवाढ; बँकांची अनास्था कायम

By admin | Updated: August 3, 2014 01:12 IST

हिंगोली : खरीप हंगामातील पीक विम्याच्या जनजागृत्तीबद्दल कृषी विभागाला सोयरसुतक नसल्याने वंचित उत्पादकांना विम्याच्या मुदतवाढीची मागणी करावी लागली.

हिंगोली : खरीप हंगामातील पीक विम्याच्या जनजागृत्तीबद्दल कृषी विभागाला सोयरसुतक नसल्याने वंचित उत्पादकांना विम्याच्या मुदतवाढीची मागणी करावी लागली. अपेक्षेनुसार १६ आॅगस्टपर्यंत मूदतवाढ झाली असली तरी शेतकऱ्यांना विमा देण्यात बँकांची अनास्था कायम आहे. खुद्द मध्यवर्ती बँकेलाच यंदाच्या टार्गेटचा विसर पडला असून पीकविमा दिलेल्या राष्ट्रीयीकृत बँकांची माहिती नसल्याचे समोर आले आहे. आजही बहुतांश शेतकऱ्यांकडून पीकविमा काढला जात नाही. मुळात शेतकऱ्यांना विम्याच्या मुदतीची माहिती नसते. कशीतरी महिती मिळाल्यानंतर बँकांच्या अनास्थेला सामोरे जावे लागते. खेटे मारून थकलेले शेतकरी पीकविम्याचा नाद सोडून देतात. जागरूक शेतकरी कागदपत्रांच्या कात्रीत अडकतात. यंदाही हीच बोंब झाल्याने विम्याची मुदत संपून गेली होती. परिणामी, उत्पादकांनी मुदतवाढीची मागणी केल्यानंतर १६ आॅगस्टपर्यंत कालावधी वाढवला; परंतु जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांच्या अनास्थेमुळे वाढीव कालावधीदेखील उत्पादकांना अपुरा पडेल. नियमित ग्राहक सोडून विम्याच्या कामासाठी कर्मचारी नाक मुरडतात. शाखा व्यवस्थापकांनादेखील विम्याचे काम लादल्यासारखे वाटते.परिणामी, बँकांचे उंबरे झिजवून उत्पादक विमा काढण्याचे सोडून देतात. म्हणून लीड बँकेने याकडे कटाक्षाने लक्ष देऊन जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांना सूचना देण्याची मागणी होत आहे. खरीप हंगामाच्या पीक विम्याबद्दल काहीही महिती नसल्याने एकदाही विमा काढला नसल्याचे अंबादास पांढरे आणि अर्जुन वाबळे यांनी सांगितले. तारखेची माहिती नाही, मुदत वाढवलेलीही माहिती नाही. यापूर्वी कृषी सहाय्यक, तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी याबद्दल काही सांगितलेही नाही. त्यामुळे कधी पीकविमा काढला नसल्याचे दोन्ही उत्पादक म्हणाले. विम्याबद्दल शाखा व्यवस्थापक अनभिज्ञजिल्हातील उत्पादकांना यंदा देण्यात येणाऱ्या पीकविम्याच्या टार्गेटबद्दल जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखा व्यवस्थापक अनभिज्ञ आहेत. नव्याने तारीख वाढवण्यापूर्वी काढलेल्या विम्याची माहितीसुद्धा बँकेकडून घेण्यात आलेली नाही. इतर बँकांनी कागदपत्रे पाठवून दिले असले तरी मध्यवर्ती बँकेकडून त्याचे मोजमाप केले नसल्याचे शाखा व्यवस्थापक जाधव यांनी सांगितले. परिणामी जिल्ह्यातील कोणत्या बँकेने किती शेतकऱ्यांना विमा दिली, बँकांनी टार्गेट पूर्ण केले?, कोणाचे टार्गेट राहिले?, कोणत्या बँका उत्पादकांना विम्यास टाळाटाळ करतात? या बँकेला काहीही माहिती नसल्याचे शनिवारी समोर आले. विम्यासाठी लागणाऱ्या बेबाकी प्रमाणपत्रासाठी बँकेतील कर्मचारी पैसे मागत असल्याची तक्रार हिंगोली तालुक्यातील खंडाळा येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. तब्बल १६ बँकेची बेबाकी घेण्यासाठी लागत असलेली रक्कम विम्याच्या रक्कमेच्या पुढे जाते. शेतकऱ्यांना तत्काळ बेबाकी दिलीही जात नाही. पैशांसाठी चार-चार दिवस झुलवत ठेवल्या जात असल्याचा आरोप या निवेदनात केला आहे. निवेदनावर रामेश्वर गायकवाड, अनिल गायकवाड, दिलीप जाधव, संतोष गिरी, बाबूराव गायकवाड, माधव गायकवाड, रमेश जाधव, प्रकाशराव पोले, गणेश गायकवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.