शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

होईना छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळ धावपट्टीचा विस्तार; उद्योग, पर्यटन कसे वाढणार?

By विकास राऊत | Updated: July 4, 2024 16:12 IST

७३४ कोटींची तरतूद होऊन वर्ष झाले, भूसंपादन मात्र अद्याप कागदावरच

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणांची तयारी होत असताना धावपट्टीसाठी करण्यात येणारी भूसंपादन प्रक्रिया ७३४ कोटींची तरतूद होऊनही कागदावरच आहे.

नगररचना विभागाचा भूसंपादन अधिकारी नेमल्यामुळे भूसंपादनाला खीळ बसली आहे. या प्रकरणात शासनाला कळविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पाऊल उचलले आहे. ऑरिकमध्ये अँकर प्रोजेक्ट न येण्यामागे विमानतळ धावपट्टी अरुंद असल्याचे कारण मागे समोर आले होते. त्यानंतर धावपट्टी विस्तारीकरणासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली. सहा वर्षांत यावर फक्त चर्चाच झाल्या. गेल्यावर्षी शासनाने भूसंपादनासह इतर घटकांसाठी तरतूद केली. परंतु अजूनही विस्तारीकरणास चालना मिळालेली नाही. विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणासाठी दक्षिण बाजूने १४७ एकर जमीन लागणार आहे. भूसंपादनासह इतर कामांसाठी शासनाने ७३४ कोटी रुपयांची तरतूद मार्च २०२३च्या अर्थसंकल्पात केली. वर्षभरात कुठलीही हालचाल झालेली नाही. तीन वर्षांपासून विस्तारीकरणासाठी अनुदान मिळण्याबाबत केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा झाला. शासनाने अर्थसंकल्पात तरतूद केली, भूसंपादन अधिकारी नियुक्त केले, परंतु पुढे काहीही झाले नाही.

का झाला धावपट्टीच्या विस्ताराचा निर्णय?गेल्यावर्षी जिल्हाधिकारी कार्यालयाने विमानतळ प्राधिकरणाला भूसंपादनासाठी २०१३च्या कायद्यानुसार ४६५ कोटी ८५ लाख तर खासगी जमीन वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीने ५४० कोटी ४ लाख रुपयांचा निधी लागेल, असा प्रस्ताव दिला होता. शासनाने मार्च २०२३ मध्ये ७३४ कोटींची तरतूद केली. पहिल्या मोजणीत आलेल्या १२०० मालमत्ता वाचविल्या असून, १ डिग्रीने धावपट्टीचे अलायन्मेंट सरकवले आहे. टॅक्सी रन-वेसह आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी येथील धावपट्टी विस्तारेल. शिवाय उद्योग वाढीसाठी चालना मिळेल. यासाठी धावपट्टीचा विस्तार करण्याचा निर्णय झाला आहे.

तर भूसंपादन अधिकारी बदलण्याची मागणीभूसंपादन प्रक्रियेबाबत बुधवारी महापालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनात बोलणी झाली. भूसंपादनाची जबाबदारी नगररचना विभागाशी निगडित अधिकाऱ्यावर सोपविली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचे त्यावर नियंत्रण नाही. याबाबत दोन दिवसांत बैठक होईल. भूसंपादन अधिकाऱ्यांना वेळेची मर्यादा घालून देण्यात येईल. मुदतीत काम सुरू झाले नाही तर, भूसंपादन अधिकारी बदलून द्यावा, अशी मागणी शासनाकडे करण्यात येईल. धावपट्टीचा विस्तार झाला तरच उद्योग, पर्यटनवाढीसाठी चालना मिळेल.-दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAirportविमानतळtourismपर्यटनbusinessव्यवसाय