शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
4
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
5
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
6
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
7
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
8
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
9
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
10
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
12
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
13
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
14
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
15
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
16
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
17
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
18
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?

होईना छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळ धावपट्टीचा विस्तार; उद्योग, पर्यटन कसे वाढणार?

By विकास राऊत | Updated: July 4, 2024 16:12 IST

७३४ कोटींची तरतूद होऊन वर्ष झाले, भूसंपादन मात्र अद्याप कागदावरच

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणांची तयारी होत असताना धावपट्टीसाठी करण्यात येणारी भूसंपादन प्रक्रिया ७३४ कोटींची तरतूद होऊनही कागदावरच आहे.

नगररचना विभागाचा भूसंपादन अधिकारी नेमल्यामुळे भूसंपादनाला खीळ बसली आहे. या प्रकरणात शासनाला कळविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पाऊल उचलले आहे. ऑरिकमध्ये अँकर प्रोजेक्ट न येण्यामागे विमानतळ धावपट्टी अरुंद असल्याचे कारण मागे समोर आले होते. त्यानंतर धावपट्टी विस्तारीकरणासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली. सहा वर्षांत यावर फक्त चर्चाच झाल्या. गेल्यावर्षी शासनाने भूसंपादनासह इतर घटकांसाठी तरतूद केली. परंतु अजूनही विस्तारीकरणास चालना मिळालेली नाही. विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणासाठी दक्षिण बाजूने १४७ एकर जमीन लागणार आहे. भूसंपादनासह इतर कामांसाठी शासनाने ७३४ कोटी रुपयांची तरतूद मार्च २०२३च्या अर्थसंकल्पात केली. वर्षभरात कुठलीही हालचाल झालेली नाही. तीन वर्षांपासून विस्तारीकरणासाठी अनुदान मिळण्याबाबत केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा झाला. शासनाने अर्थसंकल्पात तरतूद केली, भूसंपादन अधिकारी नियुक्त केले, परंतु पुढे काहीही झाले नाही.

का झाला धावपट्टीच्या विस्ताराचा निर्णय?गेल्यावर्षी जिल्हाधिकारी कार्यालयाने विमानतळ प्राधिकरणाला भूसंपादनासाठी २०१३च्या कायद्यानुसार ४६५ कोटी ८५ लाख तर खासगी जमीन वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीने ५४० कोटी ४ लाख रुपयांचा निधी लागेल, असा प्रस्ताव दिला होता. शासनाने मार्च २०२३ मध्ये ७३४ कोटींची तरतूद केली. पहिल्या मोजणीत आलेल्या १२०० मालमत्ता वाचविल्या असून, १ डिग्रीने धावपट्टीचे अलायन्मेंट सरकवले आहे. टॅक्सी रन-वेसह आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी येथील धावपट्टी विस्तारेल. शिवाय उद्योग वाढीसाठी चालना मिळेल. यासाठी धावपट्टीचा विस्तार करण्याचा निर्णय झाला आहे.

तर भूसंपादन अधिकारी बदलण्याची मागणीभूसंपादन प्रक्रियेबाबत बुधवारी महापालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनात बोलणी झाली. भूसंपादनाची जबाबदारी नगररचना विभागाशी निगडित अधिकाऱ्यावर सोपविली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचे त्यावर नियंत्रण नाही. याबाबत दोन दिवसांत बैठक होईल. भूसंपादन अधिकाऱ्यांना वेळेची मर्यादा घालून देण्यात येईल. मुदतीत काम सुरू झाले नाही तर, भूसंपादन अधिकारी बदलून द्यावा, अशी मागणी शासनाकडे करण्यात येईल. धावपट्टीचा विस्तार झाला तरच उद्योग, पर्यटनवाढीसाठी चालना मिळेल.-दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAirportविमानतळtourismपर्यटनbusinessव्यवसाय