शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
4
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
5
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
6
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
7
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
8
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
9
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
10
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
11
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
12
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
13
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
14
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
15
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
16
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

कृउबाचा तडजोडीचा ठराव बेकायदाच; विद्यमान सभापती, संचालकांनी मंजूर केलेला ठराव ‘गोत्यात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 16:10 IST

जळगाव रोडलगत असलेल्या २० एकर जमिनीच्या तडजोडीचा ठराव कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती, संचालकांनी मंजूर केला आहे. मात्र, मुळात यासाठी कायद्यानुसार राज्य पणन संचालकांची पूर्व परवानगी आवश्यक असते, तशी परवानगी न घेताच ठराव घाईघाईत मंजूर केला. त्यामुळे तडजोडीचा ठराव बेकायदेशीर असल्याचा आरोप माजी संचालक काकासाहेब कोळगे पाटील यांनी केला आहे. 

औरंगाबाद : जळगाव रोडलगत असलेल्या २० एकर जमिनीच्या तडजोडीचा ठराव कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती, संचालकांनी मंजूर केला आहे. मात्र, मुळात यासाठी कायद्यानुसार राज्य पणन संचालकांची पूर्व परवानगी आवश्यक असते, तशी परवानगी न घेताच ठराव घाईघाईत मंजूर केला. त्यामुळे तडजोडीचा ठराव बेकायदेशीर असल्याचा आरोप माजी संचालक काकासाहेब कोळगे पाटील यांनी केला आहे. 

जाधववाडीतील कृउबामध्ये येण्यासाठी जळगाव रोडवरून २१ मीटरचा रस्ता बिल्डर्स तयार करून देणार आहे. तसेच मुख्य कमान, सुरक्षारक्षकाची केबीन, पथदिवे, फुटपाथचा सुमारे सव्वादोन कोटींचा खर्च येणार आहे. हा संपूर्ण खर्च बिल्डर्स करणार असून, रस्त्यासाठी लागणार्‍या १ एकर जमिनीचा खरेदीखतही बाजार समितीच्या नावाने करून देणार आहे. या बदल्यात बाजार समितीने २० एकर जागेवरील आपला हक्क सोडून द्यावा, असा तडजोडीचा प्रस्ताव बाजार समितीत मांडण्यात आला होता. विद्यमान सभापती व संचालक मंडळाने ‘तडजोडी’ चा ठराव मंजूर केला. आता हा ठराव सुप्रीम कोर्टासमोर सादर करण्यात येणार आहे.

यासंदर्भात बाजार समितीचे माजी संचालक काकासाहेब कोळगे पाटील यांनी सांगितले की, बाजार समितीला तडजोडीचा कोणताही ठराव मंजूर करण्यापूर्वी महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री अधिनियम १९६३ -१९६७ याप्रमाणे कलम १२ (१) नुसार राज्य पणन संचालक पुणे यांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, तडजोडीचा ठराव घेताना बाजार समितीने पणन संचालकांची पूर्व परवानगी घेतली नाही. त्यामुळे  मंजूर केलेली तडजोड बेकायदेशीर आहे. विद्यमान सभापती व संचालकांनी तडजोडीची घाई न करता बाजार समितीच्या विकासाचा विचार करावा, जमीन विकण्याचा किंवा तडजोडीचा विचार करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला. 

सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप अर्ज काकासाहेब कोळगे पाटील म्हणाले की, २० एकर जमीन वाचविण्यासाठी १९८८ पासून बाजार समिती प्रयत्न करीत आहे. २००३-०४ मध्ये सर्वोच्च  न्यायालयात जागा वाचविण्यासाठी आम्ही हस्तक्षेप अर्ज दाखल केला होता. विद्यमान संचालकांनी घेतलेल्या तडजोडीच्या निर्णयाच्या विरोधात मी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप अर्ज दाखल करीत असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद