शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

बेसुमार उपसा सुरुच..!

By admin | Updated: November 5, 2014 00:57 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यात यंदा केवळ ५८ टक्के पाऊस झाल्याने २८ प्रकल्प कोरडे असून, ६६ प्रकल्पातील पाणीसाठा ज्योत्याखाली असल्याने येणाऱ्या दिवसात पाणी टंचाईच्या झळा तीव्र होण्याची शक्यता आहे.

उस्मानाबाद : जिल्ह्यात यंदा केवळ ५८ टक्के पाऊस झाल्याने २८ प्रकल्प कोरडे असून, ६६ प्रकल्पातील पाणीसाठा ज्योत्याखाली असल्याने येणाऱ्या दिवसात पाणी टंचाईच्या झळा तीव्र होण्याची शक्यता आहे. अशावेळी उपलब्ध पाणीसाठ्याची जपवणूक करण्याची आवश्यकता असताना अनेक प्रकल्पातून अवैध पद्धतीने पाण्याचा बेसुमार उपसा सुरु असल्याचे चित्र आहे. टंचाई निवारणार्थ लाखोंचे आराखडे तयार होत असताना प्रशासनाने उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य संरक्षण करण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील काही प्रमुख प्रकल्पावर मंगळवारी भेट दिली असता, अनेक ठिकाणी विद्युत मोटारींद्वारे शेतकरी पाणी खेचत असल्याचे दिसून आले.पांडुरंग पोळे ल्ल नळदुर्गप्रशासन संभाव्य टंचाईवर मात करण्यासाठी लाखोंचे आराखडे तयार करीत असताना धरणातील उपलब्ध पाण्याची जपवणूक करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. शेजारच्या बोरी धरणातून दररोज लाखो लिटर पाणी खेचले जात असून, अनधिकृत विद्युत पुरवठ्यामुळे विद्युत वितरण कंपनीलाही दररोज हजारो रुपयांचा चुना लागत आहे.यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने अनेक तलाव, धरणे कोरडी आहेत. सुमारे दीड लाख लोकसंख्येच्या तुळजापूर, नळदुर्ग व अणदूर गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या या बोरी धरणात आज रोजी २० टक्के पाणीसाठा असून तो एकूण साठवण क्षमतेच्या अवघा ६.५ दसलक्ष घनमिटर इतका आहे. येणाऱ्या ८ महिन्यांच्या काळाकरिता या धरणातून तुळजापूर, नळदुर्ग व अणदूर गावांना पाणी पुरवठा करावयाचा आहे. दरमाणसी प्रतिदिनी ४० लिटर पाण्याचा विचार करता, या धरणातून केवळ ६ महिने पाणी मिळू शकते. असे असताना पाटबंधारे विभाग पाणी साठ्याच्या नियोजनाबाबत उदासीन असल्याचे दिसते. सध्या धरणावर जवळपास १५० विद्युत मोटारी आहेत. मात्र विद्युत वितरण कंपनीने केवळ ९७ ग्राहकांना विद्युत पुरवठा केला आहे. उर्वरित ५३ कनेक्शन हे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मेहरबानीवर सुरु असल्याची चर्चा आहे.पाटबंधारे विभागाकडे असलेल्या नोंदीतही लाभार्थी संख्या कमी आहे. मात्र वास्तवात ती त्याच्या अभिलेखावरील संख्येच्या दुप्पट असल्याचे बोलले जाते. या सर्वच प्रकाराकडे प्रशासन डोळेझाक करीत आहे. आहे त्या पाण्याचा जपून वापर न करता पाणी टंचाईवर कोट्यावधी रुपयाची उधळण करण्यासाठीच हा कानाडोळा असल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे. धरणावर लावलेल्या मोटारीतून अशाचप्रकारे पाणी उपसा राहिल्यास नागरिकांना येणाऱ्या काळात गंभीर पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, धरणातील पाणी साठ्याच्या वापरावरील निर्बंधाबाबत कसल्याही सूचना मिळाल्या नसल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या नळदुर्ग कार्यालयाने दिली.