शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

परीक्षा केंद्रांवर केवळ ६१ सहकेंद्रप्रमुख दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 20:55 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षांना सोमवारपासून सुरू झाली आहे. दुसऱ्या दिवशी कोठेही गोंधळाचा प्रकार समोर आला नाही. मात्र, २२५ परीक्षा केंद्रांवर नेमलेल्या २२५ सहकेंद्रप्रमुखांपैकी केवळ ६१ जणच दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षांना सोमवारपासून सुरू झाली आहे. नियोजनाचा अभाव असल्यामुळे पहिल्याच दिवशी सावळा गोंधळ समोर आला होता. दुसऱ्या दिवशी कोठेही गोंधळाचा प्रकार समोर आला नाही. मात्र, २२५ परीक्षा केंद्रांवर नेमलेल्या २२५ सहकेंद्रप्रमुखांपैकी केवळ ६१ जणच दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.

विद्यापीठाच्या पदवी परीक्षा कॉपीमुक्त घेण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा, भरारी पथकांची नेमणूक करण्याच्या घोषणा परीक्षा सुरू होण्यापूर्वी करण्यात आल्या होत्या. मात्र या यंत्रणाची उभारणीच महाविद्यालयांनी केली नसल्यामुळे विविध परीक्षा केंद्रांवर कॉप्यांचा महापूर आला असल्याची माहिती प्राध्यापकांनी दिली. याचवेळी विद्यापीठाने नेमलेल्या भरारी पथकतील बहुतांश प्राध्यापकांना संबंधित महाविद्यालयांनी परीक्षेचे काम करण्यास परवानगी दिली नसल्याचे दिसून आले. यात २२५ परीक्षा केंद्रांवर २२५ सहकेंद्रमुखांची नियुक्ती केली होती.

या सहकेंद्रप्रमुखांच्या नियंत्रणातच परीक्षा घेण्यात येतात. केंद्रप्रमुख हा त्या महाविद्यालयाचा प्राचार्य असतो. मात्र, विद्यापीठाने पाठविलेला सहकेंद्रप्रमुख हा जबाबदार व्यक्ती असताना केवळ ६१ केंद्रांवर सहकेंद्रप्रमुख दाखल झाले आहेत. याविषयी परीक्षा संचालक डॉ. जयश्री सूर्यवंशी यांना विचारले असता, त्यांनी विविध महाविद्यालयांमध्ये पूर्णवेळ प्राध्यापकांची संख्या कमी असून, त्याही महाविद्यालयांत परीक्षा सुरू आहेत. त्याठिकाणी प्राध्यापकांना कामे असल्यामुळे अनेकांनी सहकेंद्रप्रमुख म्हणून दाखल होण्यास नकार कळविला. यामुळे त्यांच्या जागी दुसरे नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचेही डॉ. सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले. कॉपीमुक्तीसाठी सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याच्या सूचना महाविद्यालयांना देण्यात आल्या होत्या. मात्र शहरातील काही महाविद्यालयांचा अपवाद वगळता कोणत्याही केंद्रावर ही यंत्रणा उभारण्यात आलेली नाही.

कुलगुरू, परीक्षा संचालक केंद्रांच्या भेटीला

परीक्षेच्या दुसºया दिवशीही कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी शहरातील रफीक झकेरिया कॅम्पसमधील मराठवाडा कॉलेज आॅफ एज्युकेशन केंद्राला भेट देत परीक्षेची पाहणी केली. परीक्षा संचालक डॉ. जयश्री सुर्यवंशी यांनीही आडूळ, पाचोड, चित्तेपिंपळगाव आणि शहरातील पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयातील परीक्षा केंद्राला भेटी दिल्या. 

टॅग्स :examपरीक्षाAurangabadऔरंगाबाद