शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

अवयव दानाचा संकल्प प्रत्येकाने करावा-पाटील

By admin | Updated: September 1, 2016 01:00 IST

जालना : समाजात आज अनेक रूग्ण अवयवाच्या प्रतीक्षेत आहेत. या रूग्णांना जीवनदान देऊन मृत्यूनंतरही अवयवरुपी जीवंत राहण्यासाठी समाजातील प्रत्येकाने

जालना : समाजात आज अनेक रूग्ण अवयवाच्या प्रतीक्षेत आहेत. या रूग्णांना जीवनदान देऊन मृत्यूनंतरही अवयवरुपी जीवंत राहण्यासाठी समाजातील प्रत्येकाने अवयवदानाचा संकल्प करावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता पाटील यांनी केले.जालना शहरातील कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात नगर परिषद व जिल्हा रूग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत आरोग्य तपासणी शिबीर व महाअवयवदान अभियान जनजागृती शिबीराच्या उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. पाटील बोलत होत्या.यावेळी मनकर्णा डांगे, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. सुनिता गोलाईत, डॉ. वि.भा. भिवरे, जिल्हा माहिती अधिकारी एस.के. बावकस्कर, तृप्ती पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. पाटील पुढे म्हणाल्या की, अवयवदानासंदर्भात जनजागृती व्हावी, यासाठी हे अभियान राबविण्यात येत असल्याचे स्पष्ट करून अवयवदानासंदर्भात समाजामध्ये आजही अनेक गैरसमज असून ते दूर होणे गरजेचे आहे. आपल्या अवयवदानामुळे एखाद्या व्यक्तीला नव्याने जीवन प्राप्त होणार असल्याने प्रत्येकाने अवयवदानाचा संकल्प करावा असे आवाहनही डॉ. पाटील यांनी केले.यावेळी अवयवदानाचे महत्व पटवून देणारा ‘फिर जिंदगी’ हा लघुपटही उपस्थितांना दाखिवण्यात आला. तसेच तज्ज्ञांनी महिलांची व बालकांची आरोग्य तपासणी केली. कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार व्यंकट कुलकर्णी यांनी मानले.बचतगटातील महिला सदस्या, रूग्णालयातील अधिकारी, कर्मचारी आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)