शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दर १२ दिवसाला एक शेतकरी कवटाळतो मृत्यूला

By admin | Updated: November 16, 2014 23:37 IST

अमित सोमवंशी, उस्मानाबाद मागील सात वर्षात जिल्ह्यातील २१० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

अमित सोमवंशी, उस्मानाबादमागील सात वर्षात जिल्ह्यातील २१० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. विशेष म्हणजे यातील केवळ ६३ शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना शासनातर्फे मदत देण्यात आलेली असून, १४५ मदतीचे प्रस्ताव विविध कारणावरुन फेटाळण्यात आले आहेत. सद्यस्थितीत दोन प्रस्ताव समिती स्तरावर निर्णयासाठी राखीव असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली. जिल्ह्याला मागील काही वर्षापासून सातत्याने दुष्काळी स्थितीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने जिरायत शेती असलेले या भागातील शेतकरी हवालदिल झालेले आहेत. अपुऱ्या पावसामुळे उत्पन्नात घट झाल्यानंतर घेतलेले कर्ज कशाने फेडायचे, असा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर उभा राहतो. त्यातूनच यातील बहुतांश आत्महत्या झाल्याचे सांगितले जाते. मागील तीन वर्षात जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यातच मागील वर्षी पिके जोमदार असताना जिल्ह्यातील मोठ्या भागाला गारपिटीने तडाखा दिला. यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके नष्ट झाली. त्यामुळे घेतलेल्या कर्जाचा डोंगर तसाच वाढत जात असल्याने काही शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्येच्या घटना २०१४ मध्ये झाल्या असून, या चालू वर्षात तब्बल ३९ तर २००८ ते नोव्हेंबर २०१४ या कालावधीत जिल्ह्यात २१० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यातील ६३ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रशासनाच्या वतीने मदत वाटप करण्यात आली तर १४५ जणांना मदतीपासून अपात्र करण्यात आले. ही प्रकरणे शासकीय नियमात बसत नसल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान यंदाही जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठलेली नाही. अशा परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांच्या पाठिशी राहून ठोस निर्णय घेण्याची गरज व्यक्त होत आहे.आत्महत्येचा विचार मनात येत असल्यास शक्यतो एकटे फिरू नका. मन कशात तरी गुंतून राहील, असे पहा. मनोरंजनाची अधिकाधिक साधने वापरून आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. आत्महत्या करणारा माणूस एकटा राहतो, जेवत नाही, अबोल राहतो, अशा वेळी कुटुंबियांनी दखल घेतली पाहिजे. असा कुणी विचार व्यक्त केल्यास कुटुंबातील व्यक्तींनी थेट मानसोपचार तज्ज्ञाकडे दाखवून तात्काळ उपचार घेण्याची आवश्यकता आहे.