शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

युती झाली तरीही नेत्यांचे मनोमिलन झाले नाही; भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचारासाठी जिल्ह्याबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 14:00 IST

भाजपचे दोन-तीन पदाधिकारीच शिवसेनेच्या प्रचारात 

ठळक मुद्देयुतीमध्ये आलबेल नाही

- राम शिनगारे औरंगाबाद : भाजप-शिवसेनेची युती असली तरीही नेत्यांचे मनोमिलन झाले नसल्याचे दिसते आहे. जिल्ह्यातील भाजपाचे प्रमुख पदाधिकारी युतीच्या उमेदवाराचा प्रचार करण्याऐवजी स्वपक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी इतर जिल्ह्यांत गेले आहेत. तेथील मतदान झाल्यानंतर शेवटच्या एक-दोन दिवसांसाठी औरंगाबादेत दाखल होणार असल्याचे या नेत्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ युतीत  शिवसेनेच्या वाट्याला आहे. येथे विद्यमान खासदारांनाच शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली. युती होण्यापूर्वी भाजप व शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये विविध कारणांवरून कलगीतुरा रंगलेला होता. युती झाल्यानंतरही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेत काँग्रेससोबत असलेली शिवसेनेची सोबत तोडून टाकावी, त्याशिवाय प्रचारात सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले. शेवटी महापौरांच्या बंगल्यावर दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची समन्वयाची बैठक झाली. या बैठकीत काँग्रेससोबत असलेली युती सोडण्यास शिवसेना तयार झाली. मात्र, जि.प. अध्यक्षा राजीनामा देणार नाहीत. त्यांचा कालावधी संपल्यानंतर होणाऱ्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती होईल. तोपर्यंत काँग्रेसची जि.प.मध्ये असलेली सत्ता कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले.

या बैठकीनंतर भाजपच्या बहुतांश पदाधिकाऱ्यांनी बीड, जालना, नागपूर आदी ठिकाणच्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराला प्राधान्य दिले आहे. भाजपच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर देशव्यापी दौऱ्यावर आहेत. सोमवारी सकाळीच त्या हैदराबादहून श्रीनगरकडे रवाना झाल्या. तेथे त्या चार दिवस राहतील. त्यानंतर इतरही ठिकाणी त्यांचे नियोजित दौरे आहेत.  औरंगाबादेत युतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी  एक-दोन दिवसांचा वेळ काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कामगार मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय केणेकर यांनी शहरातील १२ सहकाऱ्यांना घेऊन मागील दहा-बारा दिवसांपासून नागपुरात तळ ठोकला आहे.  भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष  डॉ. भागवत कराड , शहर उपाध्यक्ष जालिंदर शेंडगे यांनी बीड जिल्हा जवळ केला आहे. त्यांच्यासह सतीश नागरे, प्रशांत देसरडा, समीर राजूरकर, डॉ. राम बुधवंत, संग्राम पवार अशी पदाधिकाऱ्यांची फौज आहे.  माजी महापौर भगवान घडामोडे, नगरसेवक प्रमोद राठोड, राजू शिंदे आदींसह इतर नगरसेवकांनी जालना जिल्ह्यास प्राधान्य दिले . 

हे करताहेत युतीचा प्रचारऔरंगाबादेतील युतीच्या उमेदवाराचा प्रचार भाजपचे आ. अतुल सावे करीत आहेत. त्यांनी पूर्व मतदारसंघाच्या बाहेर जाण्यास प्राधान्य दिलेले नाही. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांनी प्रचार करण्यात प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. याचवेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांनीही वैजापूर तालुक्यातील प्रचारात सहभाग नोंदवला आहे. त्यातही त्यांनी स्वतंत्र प्रचार सुरू केला असल्याची माहिती आहे. प्रवक्ते शिरीष बोराळकर हे एकमेव शिवसेना नेत्यांसोबत प्रचारात सहभागी होत भाजपची बाजू सांभाळत असल्याचे चित्र आहे. शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्या घरी दु:खद घटना घडलेली असल्यामुळे ते अद्याप प्रचारात सहभागी झालेले नाहीत.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019BJPभाजपाShiv Senaशिवसेना