शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
2
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
3
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
4
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
5
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...
6
Swami Samartha: देवाजवळ दिवा लावताना काच फुटली, दिवा पडला तर स्वामींना करावी 'ही' प्रार्थना!
7
अतूट प्रेम! कोमात असलेल्या लेकीला शुद्धीवर आणण्यासाठी १० वर्ष आईने रोज केला डान्स अन्...
8
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी! IT शेअर्समध्ये जोरदार खरेदी, एशियन पेंट्स टॉप गेनर, कुठे झाली घसरण?
9
Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा
10
Shreeji Global FMCG Shares: पहिल्याच दिवशी शेअरची स्थिती खराब; १२५ रुपयांचा शेअर आला ९९ रुपयांवर, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ
11
बिहार निवडणुकीत NDA पराभूत झाल्यास निफ्टी ७% पर्यंत घसरू शकतो? ब्रोकरेज फर्मने दिला इशारा
12
सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
13
जीएसटी रद्द झाल्यानं जीवन, आरोग्य विमा घेण्याचं प्रमाण वाढलं; प्रीमियम वाढून ३४,००७ कोटी रुपयांवर 
14
'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण?
15
दिल्ली नाही, टार्गेटवर होते अयोध्या-काशी; चौकशीत नवीन धक्कादायक माहिती समोर आली
16
Delhi Blast: शाहीन शाहीदचा महाराष्ट्रातील डॉ. हयात जफर सोबत घटस्फोट का झालेला, कोणत्या मुद्द्यावरून बिनसलेलं?
17
शेख हसीना बांगलादेशला परतण्यास तयार, परतीसाठीच्या अटी सांगितल्या; मोहम्मद युनूस यांच्यावर केली टीका
18
PM Modi: भूतानहून परतताच मोदींनी एलएनजेपी रुग्णालय गाठलं, दिल्ली बॉम्बस्फोटातील जखमींना भेटले!
19
दिल्ली स्फोटात 'डबल ॲटॅक'चा संशय! घटनास्थळी अमोनियम नायट्रेटसह 'दुसरे शक्तिशाली' स्फोटक आढळले
20
पार्सल, मनी ऑर्डर, इन्शुरन्स प्रीमिअम : सर्व कामं एका क्लिकवर; पोस्ट ऑफिसची नवी 'सेवा' 

काँग्रेसने पाठिंबा काढला तरी अध्यक्षपदाला धोका नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 23:11 IST

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी युतीची घोषणा केली आहे. दुसरीकडे, राज्यात ज्या ज्या ठिकाणी जिल्हा परिषद, पंचायत समित्या किंवा नगरपालिकांमध्ये सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने सेना किंवा भाजपसोबत केलेली अभद्र आघाडी तात्काळ तोडण्याचे आदेश पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत.

ठळक मुद्देयुतीच्या घडामोडी : जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये सत्ता बदलाची चर्चा

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी युतीची घोषणा केली आहे. दुसरीकडे, राज्यात ज्या ज्या ठिकाणी जिल्हा परिषद, पंचायत समित्या किंवा नगरपालिकांमध्ये सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने सेना किंवा भाजपसोबत केलेली अभद्र आघाडी तात्काळ तोडण्याचे आदेश पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाला धोका निर्माण होईल, असा काढला जात असलेला कयास खोटा ठरेल. काँग्रेसने सेनेसोबतची आघाडी तोडली, तरी सेनाही भाजपला सोबत घेऊन किमान सप्टेंबरपर्यंत तरी अध्यक्षपद हे आपल्याकडेच ठेवण्यात यशस्वी होईल, असे या पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी बोलून दाखविलेल्या भूमिकांवरून स्पष्ट होते.शिवसेनेने स्वबळावर लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेत राज्यातील शिवसैनिकांना कामाला लागण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेना-भाजप युती होणार नाही, असे चित्र निर्माण झाले होते; परंतु आज सोमवारी सायंकाळी या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी मुंबईत युती झाल्याचे जाहीर केले. युती होण्याच्या हालचाली दिसताच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी जि.प., पं.स. तसेच नगरपालिकांमधील सेना-भाजपसोबतची अभद्र आघाडी तोडण्याचे आदेश दिले. त्यानुसार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितले की, पक्षश्रेष्ठींचे आदेश आम्हाला मान्य राहील. पक्षादेशानुसार आम्ही निर्णय घेऊ. दुसरीकडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांनी मात्र सावध पवित्रा घेत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी युती झाली आहे. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करायची की नाही, हे पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार निर्णय घेतला जाईल, तर शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी काँग्रेसने पाठिंबा काढला तरी आम्हाला काही फरक पडत नाही, असे ‘लोकमत’ला सांगितले. आपण भाजपला सोबत घेऊन जिल्हा परिषदेत सत्ता स्थापणार का, या प्रश्नावर ते म्हणाले, आता जि.प. अध्यक्षांच्या टर्मचे तीनच महिने राहिले आहेत. आमच्यासमोर आता जि.प., पं.स. मधील सत्ता नव्हे, तर लोकसभा निवडणूक जिंकण्याचे टार्गेट आहे. यासंदर्भात पक्षनेत्यांच्या आदेशानुसार बघू.चौकट ...काँग्रेसने पाठिंबा काढला तर...जिल्ह्यात जि.प., औरंगाबाद पंचायत समिती, कन्नड पंचायत समिती, सोयगाव पंचायत समितीमध्ये शिवसेनेची काँग्रेससोबत आघाडी आहे, तर वैजापूर पंचायत समितीमध्ये भाजपसोबत राष्ट्रवादीची आघाडी आहे. पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने अभद्र युती तोडली, तर जिल्हा परिषदेसह कन्नड, सोयगाव व वैजापूर पंचायत समित्यांमधील सत्ता समीकरणे बदलू शकतात.

टॅग्स :PoliticsराजकारणShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस