शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

पावसाळा संपला तरीही अतिक्रमणे जशास तशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 00:31 IST

पावसाळा संपला तरी नाल्यातील अतिक्रमणांसह रस्त्यांवर जिकडे तिकडे झालेली अतिक्रमणे काढण्यास प्रशासन तयार नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पावसाळ्यात अतिक्रमणे पाडता येत नाहीत, असे एका शासकीय परिपत्रकाचा आधार घेत महापालिका मागील चार महिन्यांपासून जबाबदारी झटकून टाकते. आता पावसाळा संपला तरी नाल्यातील अतिक्रमणांसह रस्त्यांवर जिकडे तिकडे झालेली अतिक्रमणे काढण्यास प्रशासन तयार नाही. शहरातील मुख्य रस्त्यांवर सायंकाळी औरंगाबादकरांना दुचाकी नेणे कठीण झाले आहे. जुन्या शहरात अधिक यातना सहन कराव्या लागत आहेत.महापालिका प्रशासनाचे शहरात अजिबात ‘भय’उरलेले नाही. ज्याच्या मनात येईल तो तिथे अतिक्रमण करून मोकळा होतो. रस्त्यावर, नाल्यात अतिक्रमण का केले असा जाबही पालिकेच्या प्रशासकीय विभागातर्फे विचारण्यात येत नाही. उलट या अतिक्रमणाला ‘कायदेशीर’संरक्षण कसे मिळवून देता येईल, यादृष्टीने अधिकारी व कर्मचारी ‘काम’करतात. अतिक्रमण हटाव विभागाकडे ३६५ दिवसांमध्ये तब्बल १२०० तक्रारी प्राप्त होतात. त्यातील १०० तक्रारींचेदेखील निरसन होत नाही. आकड्यांकडे लक्ष घातले असता महापालिकेचा अतिक्रमण हटाव विभाग नेमका करतो तरी काय हा प्रश्न निर्माण होतो.गतमहिन्यात शहरातील विविध भागांत नाल्यांमधील अतिक्रमणांचे काय परिणाम होत आहेत याची प्रचीती औरंगाबादकरांना आली. नाल्यातील अतिक्रमणे काढा, यावर नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. अधिकाºयांनीही तीन दिवसांमध्ये अतिक्रमणे काढण्याचे आश्वासन दिले. आता ३० दिवस होत आले तरी अतिक्रमणे जशास तशी आहेत.