शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पावसाळा संपला तरीही अतिक्रमणे जशास तशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 00:31 IST

पावसाळा संपला तरी नाल्यातील अतिक्रमणांसह रस्त्यांवर जिकडे तिकडे झालेली अतिक्रमणे काढण्यास प्रशासन तयार नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पावसाळ्यात अतिक्रमणे पाडता येत नाहीत, असे एका शासकीय परिपत्रकाचा आधार घेत महापालिका मागील चार महिन्यांपासून जबाबदारी झटकून टाकते. आता पावसाळा संपला तरी नाल्यातील अतिक्रमणांसह रस्त्यांवर जिकडे तिकडे झालेली अतिक्रमणे काढण्यास प्रशासन तयार नाही. शहरातील मुख्य रस्त्यांवर सायंकाळी औरंगाबादकरांना दुचाकी नेणे कठीण झाले आहे. जुन्या शहरात अधिक यातना सहन कराव्या लागत आहेत.महापालिका प्रशासनाचे शहरात अजिबात ‘भय’उरलेले नाही. ज्याच्या मनात येईल तो तिथे अतिक्रमण करून मोकळा होतो. रस्त्यावर, नाल्यात अतिक्रमण का केले असा जाबही पालिकेच्या प्रशासकीय विभागातर्फे विचारण्यात येत नाही. उलट या अतिक्रमणाला ‘कायदेशीर’संरक्षण कसे मिळवून देता येईल, यादृष्टीने अधिकारी व कर्मचारी ‘काम’करतात. अतिक्रमण हटाव विभागाकडे ३६५ दिवसांमध्ये तब्बल १२०० तक्रारी प्राप्त होतात. त्यातील १०० तक्रारींचेदेखील निरसन होत नाही. आकड्यांकडे लक्ष घातले असता महापालिकेचा अतिक्रमण हटाव विभाग नेमका करतो तरी काय हा प्रश्न निर्माण होतो.गतमहिन्यात शहरातील विविध भागांत नाल्यांमधील अतिक्रमणांचे काय परिणाम होत आहेत याची प्रचीती औरंगाबादकरांना आली. नाल्यातील अतिक्रमणे काढा, यावर नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. अधिकाºयांनीही तीन दिवसांमध्ये अतिक्रमणे काढण्याचे आश्वासन दिले. आता ३० दिवस होत आले तरी अतिक्रमणे जशास तशी आहेत.