शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळा संपला तरीही अतिक्रमणे जशास तशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 00:31 IST

पावसाळा संपला तरी नाल्यातील अतिक्रमणांसह रस्त्यांवर जिकडे तिकडे झालेली अतिक्रमणे काढण्यास प्रशासन तयार नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पावसाळ्यात अतिक्रमणे पाडता येत नाहीत, असे एका शासकीय परिपत्रकाचा आधार घेत महापालिका मागील चार महिन्यांपासून जबाबदारी झटकून टाकते. आता पावसाळा संपला तरी नाल्यातील अतिक्रमणांसह रस्त्यांवर जिकडे तिकडे झालेली अतिक्रमणे काढण्यास प्रशासन तयार नाही. शहरातील मुख्य रस्त्यांवर सायंकाळी औरंगाबादकरांना दुचाकी नेणे कठीण झाले आहे. जुन्या शहरात अधिक यातना सहन कराव्या लागत आहेत.महापालिका प्रशासनाचे शहरात अजिबात ‘भय’उरलेले नाही. ज्याच्या मनात येईल तो तिथे अतिक्रमण करून मोकळा होतो. रस्त्यावर, नाल्यात अतिक्रमण का केले असा जाबही पालिकेच्या प्रशासकीय विभागातर्फे विचारण्यात येत नाही. उलट या अतिक्रमणाला ‘कायदेशीर’संरक्षण कसे मिळवून देता येईल, यादृष्टीने अधिकारी व कर्मचारी ‘काम’करतात. अतिक्रमण हटाव विभागाकडे ३६५ दिवसांमध्ये तब्बल १२०० तक्रारी प्राप्त होतात. त्यातील १०० तक्रारींचेदेखील निरसन होत नाही. आकड्यांकडे लक्ष घातले असता महापालिकेचा अतिक्रमण हटाव विभाग नेमका करतो तरी काय हा प्रश्न निर्माण होतो.गतमहिन्यात शहरातील विविध भागांत नाल्यांमधील अतिक्रमणांचे काय परिणाम होत आहेत याची प्रचीती औरंगाबादकरांना आली. नाल्यातील अतिक्रमणे काढा, यावर नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. अधिकाºयांनीही तीन दिवसांमध्ये अतिक्रमणे काढण्याचे आश्वासन दिले. आता ३० दिवस होत आले तरी अतिक्रमणे जशास तशी आहेत.