शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
3
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
4
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
5
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
6
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
7
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
8
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
9
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
10
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
11
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
12
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
13
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
14
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
15
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
16
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
17
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
18
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
19
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
20
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश

अंगणवाडीस्तरावर होणार ग्राम बालविकास केंद्र स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 01:05 IST

जिल्ह्यातील शून्य ते सहा वयोगटातील कमी वजनाच्या बालकांना सर्वसामान्य मुलांच्या श्रेणीत आणण्यासाठी महिला व बालविकास विभागामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील शून्य ते सहा वयोगटातील कमी वजनाच्या बालकांना सर्वसामान्य मुलांच्या श्रेणीत आणण्यासाठी महिला व बालविकास विभागामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी अंगणवाडी स्तरावर ग्राम बालविकास केंद्राची स्थापना करून मुलांना १२ आठवडे पोषक आहार दिला जाणार आहे.कुपोषण मुक्त महाराष्ट्रासाठी राज्यशासनाने विशेष प्रयत्न सुरू केले असून त्यानुसार कुपोषित बालकांच्या श्रेणी संवर्धनाची जबाबदारी महिला व बालविकास विभाग व आरोग्य विभागाकडे देण्यात आली आहे. सोमवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, महिला व बालविकास अधिकारी एस. डी. लोंढे, जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गिते यांनी तालुका आरोग्य अधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकाºयांची बैठक घेतली.ग्राम बाल विकास केंद्रामार्फत कुपोषित मुलांचा शोध घेण्यासाठी पुढील पंधरा दिवस प्रत्येक गावात मोहीम राबविण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. यामध्ये ० ते सहा वयोगटातील मुलांचे वजन व उंची वयानुसार योग्य आहे का, त्यांच्या कमरेचा व दंडाचा घेर याचे मोजमाप करून कुपोषित व तीव्र कुपोषित बालकांची संख्या निश्चित केली जाणार आहे. यासाठी अंगणवाडी मदतनीस, अंगणवाडी सेविका, आरोग्यसेवक, आशा कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक गावातील कमी वजनाच्या बालकांची संख्या निश्चित केली जाणार आहे. एकदा संख्या निश्चित झाल्यानंतर त्यानुसार ग्राम बाल विकास केंद्र स्थापन केले जाणार आहेत. या केंद्राच्या माध्यमातून कुपोषित बालकांना विशेष पूरक आहाराचे वाटप केले जाणार आहे. बारा आठवड्यांच्या आहार वाटप कार्यक्रमात प्रत्येक आठवड्याला बालकांचे वजन तपासले जाणार आहे. कमी वजनाची मुले सर्वसामान्य मुलांच्या श्रेणीत येत नाही तोपर्यंत ग्राम केंद्र सुरू राहणार आहे. ज्या बालकांच्या वजनात वाढ होत नाही, अशांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. यात मुलांना नेमका काय आजार आहे याचे निदान करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुमारे दोन हजार अंगणवाड्या असून अंगणवाडी सेविका व मदतनीसांची संख्या साडेतीन हजारांपर्यंत आहे. या अंगणवड्यांध्ये येणाºया लाभार्थी बालकांची संख्या मोठी आहे.