शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला
3
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
4
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
5
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
6
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
7
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
8
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
9
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
10
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
11
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
12
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
14
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
15
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
16
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
17
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
18
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
19
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
20
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...

अंगणवाडीस्तरावर होणार ग्राम बालविकास केंद्र स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 01:05 IST

जिल्ह्यातील शून्य ते सहा वयोगटातील कमी वजनाच्या बालकांना सर्वसामान्य मुलांच्या श्रेणीत आणण्यासाठी महिला व बालविकास विभागामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील शून्य ते सहा वयोगटातील कमी वजनाच्या बालकांना सर्वसामान्य मुलांच्या श्रेणीत आणण्यासाठी महिला व बालविकास विभागामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी अंगणवाडी स्तरावर ग्राम बालविकास केंद्राची स्थापना करून मुलांना १२ आठवडे पोषक आहार दिला जाणार आहे.कुपोषण मुक्त महाराष्ट्रासाठी राज्यशासनाने विशेष प्रयत्न सुरू केले असून त्यानुसार कुपोषित बालकांच्या श्रेणी संवर्धनाची जबाबदारी महिला व बालविकास विभाग व आरोग्य विभागाकडे देण्यात आली आहे. सोमवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, महिला व बालविकास अधिकारी एस. डी. लोंढे, जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गिते यांनी तालुका आरोग्य अधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकाºयांची बैठक घेतली.ग्राम बाल विकास केंद्रामार्फत कुपोषित मुलांचा शोध घेण्यासाठी पुढील पंधरा दिवस प्रत्येक गावात मोहीम राबविण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. यामध्ये ० ते सहा वयोगटातील मुलांचे वजन व उंची वयानुसार योग्य आहे का, त्यांच्या कमरेचा व दंडाचा घेर याचे मोजमाप करून कुपोषित व तीव्र कुपोषित बालकांची संख्या निश्चित केली जाणार आहे. यासाठी अंगणवाडी मदतनीस, अंगणवाडी सेविका, आरोग्यसेवक, आशा कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक गावातील कमी वजनाच्या बालकांची संख्या निश्चित केली जाणार आहे. एकदा संख्या निश्चित झाल्यानंतर त्यानुसार ग्राम बाल विकास केंद्र स्थापन केले जाणार आहेत. या केंद्राच्या माध्यमातून कुपोषित बालकांना विशेष पूरक आहाराचे वाटप केले जाणार आहे. बारा आठवड्यांच्या आहार वाटप कार्यक्रमात प्रत्येक आठवड्याला बालकांचे वजन तपासले जाणार आहे. कमी वजनाची मुले सर्वसामान्य मुलांच्या श्रेणीत येत नाही तोपर्यंत ग्राम केंद्र सुरू राहणार आहे. ज्या बालकांच्या वजनात वाढ होत नाही, अशांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. यात मुलांना नेमका काय आजार आहे याचे निदान करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुमारे दोन हजार अंगणवाड्या असून अंगणवाडी सेविका व मदतनीसांची संख्या साडेतीन हजारांपर्यंत आहे. या अंगणवड्यांध्ये येणाºया लाभार्थी बालकांची संख्या मोठी आहे.