शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

हंगामी वसतिगृहाच्या सर्वच प्रस्तावांत त्रुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 23:48 IST

कामाच्या शोधात स्थलांतरित झालेल्या कुटुंबियातील पाल्याच्या शिक्षणात खंड पडू नये, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवता यावे यासाठी शासनाकडून कोट्यवधी रूपये खर्च करून हंगामी वसतिगृहांची दरवर्षी स्थापना केली जाते. यंदा मात्र वसतिगृहाचे नियोजन बारगळल्याने वसतिगृह अद्याप सुरू झाले नाहीत.

ठळक मुद्देमुख्याध्यापकांचे दुर्लक्ष : वसतिगृहात ३ हजार १५० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : कामाच्या शोधात स्थलांतरित झालेल्या कुटुंबियातील पाल्याच्या शिक्षणात खंड पडू नये, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवता यावे यासाठी शासनाकडून कोट्यवधी रूपये खर्च करून हंगामी वसतिगृहांची दरवर्षी स्थापना केली जाते. यंदा मात्र वसतिगृहाचे नियोजन बारगळल्याने वसतिगृह अद्याप सुरू झाले नाहीत. शिवाय दाखल करण्यात आलेल्या ४० शाळांच्या प्रस्तावांतही त्रुटी आढळून आल्या आहेत, हे विशेष.जिल्ह्यातून यंदा कामाच्या शोधात मोठ्या प्रमाणात कुटुंबांचे स्थलांतर झाले आहे. त्यामुळे यावर्षी स्थलांतरित कुटुंबातील मुलांची संख्या वाढणार आहे, हे निश्चित. त्यामुळे ऊसतोड, वीटभट्टी व इतर कामगारांच्या पाल्यांचा शिक्षणाचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे आहेत. दरवर्षी शिक्षण विभागाकडून कामगारांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातात. मुलांसाठी अनेक ठिकाणी हंगामी वसतिगृह सुरू केली जातात. यावर्षी मात्र स्थलांतरित कुटुंबाचे सर्वेक्षण अहवाल व वसतिगृहाचा प्रस्ताव दाखल करण्यास विलंब झाला. शिक्षण विभागातर्फे दरवर्षी पूर्वतयारी म्हणून संभाव्य स्थलांतरित कुटुंबाचे सर्वेक्षण केले जाते. यावर्षीही मोहीम राबवून सर्वेक्षण करण्यात आले. परंतु सदर अहवाल सादर करताना दिरंगाई करण्यात आली. उशिराने का होईना वसतीगृह स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आता पुढील प्रक्रिया गतीने होणे तितकेच महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातून एकूण ४० प्रस्ताव शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले आहेत. त्रुटींची पूर्तता झाल्यास प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता मिळणार आहे. तसेच हंगामी वसतिगृह स्थापनेसंदर्भात आता लवकरच बैठक घेतली जाणार आहे.