शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

हंगामी वसतिगृहाच्या सर्वच प्रस्तावांत त्रुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 23:48 IST

कामाच्या शोधात स्थलांतरित झालेल्या कुटुंबियातील पाल्याच्या शिक्षणात खंड पडू नये, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवता यावे यासाठी शासनाकडून कोट्यवधी रूपये खर्च करून हंगामी वसतिगृहांची दरवर्षी स्थापना केली जाते. यंदा मात्र वसतिगृहाचे नियोजन बारगळल्याने वसतिगृह अद्याप सुरू झाले नाहीत.

ठळक मुद्देमुख्याध्यापकांचे दुर्लक्ष : वसतिगृहात ३ हजार १५० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : कामाच्या शोधात स्थलांतरित झालेल्या कुटुंबियातील पाल्याच्या शिक्षणात खंड पडू नये, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवता यावे यासाठी शासनाकडून कोट्यवधी रूपये खर्च करून हंगामी वसतिगृहांची दरवर्षी स्थापना केली जाते. यंदा मात्र वसतिगृहाचे नियोजन बारगळल्याने वसतिगृह अद्याप सुरू झाले नाहीत. शिवाय दाखल करण्यात आलेल्या ४० शाळांच्या प्रस्तावांतही त्रुटी आढळून आल्या आहेत, हे विशेष.जिल्ह्यातून यंदा कामाच्या शोधात मोठ्या प्रमाणात कुटुंबांचे स्थलांतर झाले आहे. त्यामुळे यावर्षी स्थलांतरित कुटुंबातील मुलांची संख्या वाढणार आहे, हे निश्चित. त्यामुळे ऊसतोड, वीटभट्टी व इतर कामगारांच्या पाल्यांचा शिक्षणाचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे आहेत. दरवर्षी शिक्षण विभागाकडून कामगारांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातात. मुलांसाठी अनेक ठिकाणी हंगामी वसतिगृह सुरू केली जातात. यावर्षी मात्र स्थलांतरित कुटुंबाचे सर्वेक्षण अहवाल व वसतिगृहाचा प्रस्ताव दाखल करण्यास विलंब झाला. शिक्षण विभागातर्फे दरवर्षी पूर्वतयारी म्हणून संभाव्य स्थलांतरित कुटुंबाचे सर्वेक्षण केले जाते. यावर्षीही मोहीम राबवून सर्वेक्षण करण्यात आले. परंतु सदर अहवाल सादर करताना दिरंगाई करण्यात आली. उशिराने का होईना वसतीगृह स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आता पुढील प्रक्रिया गतीने होणे तितकेच महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातून एकूण ४० प्रस्ताव शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले आहेत. त्रुटींची पूर्तता झाल्यास प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता मिळणार आहे. तसेच हंगामी वसतिगृह स्थापनेसंदर्भात आता लवकरच बैठक घेतली जाणार आहे.