शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

हंगामी वसतिगृहाच्या सर्वच प्रस्तावांत त्रुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 23:48 IST

कामाच्या शोधात स्थलांतरित झालेल्या कुटुंबियातील पाल्याच्या शिक्षणात खंड पडू नये, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवता यावे यासाठी शासनाकडून कोट्यवधी रूपये खर्च करून हंगामी वसतिगृहांची दरवर्षी स्थापना केली जाते. यंदा मात्र वसतिगृहाचे नियोजन बारगळल्याने वसतिगृह अद्याप सुरू झाले नाहीत.

ठळक मुद्देमुख्याध्यापकांचे दुर्लक्ष : वसतिगृहात ३ हजार १५० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : कामाच्या शोधात स्थलांतरित झालेल्या कुटुंबियातील पाल्याच्या शिक्षणात खंड पडू नये, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवता यावे यासाठी शासनाकडून कोट्यवधी रूपये खर्च करून हंगामी वसतिगृहांची दरवर्षी स्थापना केली जाते. यंदा मात्र वसतिगृहाचे नियोजन बारगळल्याने वसतिगृह अद्याप सुरू झाले नाहीत. शिवाय दाखल करण्यात आलेल्या ४० शाळांच्या प्रस्तावांतही त्रुटी आढळून आल्या आहेत, हे विशेष.जिल्ह्यातून यंदा कामाच्या शोधात मोठ्या प्रमाणात कुटुंबांचे स्थलांतर झाले आहे. त्यामुळे यावर्षी स्थलांतरित कुटुंबातील मुलांची संख्या वाढणार आहे, हे निश्चित. त्यामुळे ऊसतोड, वीटभट्टी व इतर कामगारांच्या पाल्यांचा शिक्षणाचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे आहेत. दरवर्षी शिक्षण विभागाकडून कामगारांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातात. मुलांसाठी अनेक ठिकाणी हंगामी वसतिगृह सुरू केली जातात. यावर्षी मात्र स्थलांतरित कुटुंबाचे सर्वेक्षण अहवाल व वसतिगृहाचा प्रस्ताव दाखल करण्यास विलंब झाला. शिक्षण विभागातर्फे दरवर्षी पूर्वतयारी म्हणून संभाव्य स्थलांतरित कुटुंबाचे सर्वेक्षण केले जाते. यावर्षीही मोहीम राबवून सर्वेक्षण करण्यात आले. परंतु सदर अहवाल सादर करताना दिरंगाई करण्यात आली. उशिराने का होईना वसतीगृह स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आता पुढील प्रक्रिया गतीने होणे तितकेच महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातून एकूण ४० प्रस्ताव शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले आहेत. त्रुटींची पूर्तता झाल्यास प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता मिळणार आहे. तसेच हंगामी वसतिगृह स्थापनेसंदर्भात आता लवकरच बैठक घेतली जाणार आहे.