शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

पर्यटन वाढीसाठी उद्योजकांनी पुढाकार घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 23:38 IST

औरंगाबादच्या पर्यटन विकासासाठी पर्यटन संस्कृती निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी जन चळवळ उभारणे गरजेचे आहे.

वाळूज महानगर : औरंगाबादच्या पर्यटन विकासासाठी पर्यटन संस्कृती निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी जन चळवळ उभारणे गरजेचे आहे. या चळवळीसाठी येथील उद्योजकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी शुक्रवारी बजाजनगर येथे केले.

बजाजनगरमध्ये मासिआ तर्फे भरविण्यात येणाऱ्या औद्योगिक प्रदर्शनानिमित्त पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावले यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. रावल यांनी पर्यटन विकासाठी राज्य सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे.

औरंगाबादच्या पर्यटन विकासासाठीही ठोस निर्णय घेतले असून, अजिंठा-वेरुळ बरोबरच दौलताबाद किल्ल्याचा विकास केला जाणार आहे. मिटमिटा येथे झू-पार्क उभारले जाणार आहे. पर्यटनाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी पर्यटन स्थळांचा नकाशा बनवून त्यावर सर्व माहिती दिली जाणार आहे. पर्यटकांसाठी विशेष बसची सुविधा केली जाणार आहे. विशेष म्हणजे उद्योजकांच्या होणाºया विविध बैठका, कार्यशाळा पर्यटनस्थळ असलेल्या अजिंठा, वेरुळ येथे घेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. मात्र, देशाच्या अर्थव्यवस्थेचे भागीदार असलेल्या उद्योजकांशिवाय हे शक्य नाही. त्यामुळे येथील उद्योजकांनी पर्यटन विकासाठी पुढाकार घेवून राज्य व देश विकासाला हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी केले.

औद्योगिक प्रदर्शनाला आंतरराष्ट्रीय उत्पादकांना आणण्यासाठी उच्चायुक्तांच्या मदतीने प्रयत्न करु. तसेच प्रदर्शनात येणाºया अभ्यागतांना, उद्योजकांना पर्यटन स्थळावर जाण्यासाठी सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील. करमणुकीसाठी सायंकाळी विशेष सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यासाठी पर्यटन विभाग मासिआला पूर्ण मदत करेल असे सांगून स्थानिक अधिकाऱ्यांना मदत करण्याचे निर्देश दिले.

यावेळी उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांनी अजिंठा रस्त्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल असे सांगून उद्योगासाठी जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. तत्पूर्वी मंत्री रावल यांनी मासिआ सभागृहातील औद्योगिक उत्पादन प्रदर्शन गॅलरीला भेट देवून विविध यंत्र-सामुग्रीची माहिती घेतली.

टॅग्स :Walujवाळूजtourismपर्यटन