शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

कारमध्ये गळा आवळून पँथरचे शहराध्यक्ष असलेल्या उद्योजकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 22:52 IST

मुकुंदवाडी येथील रहिवासी भारतीय दलित पँथरचे औरंगाबाद शहराध्यक्ष, तथा उद्योजकाचा शेंद्रा पंचतारांकित वसाहतीमधील स्वत:च्या कंपनीसमोरच कारमध्ये गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेची नोंद चिकलठाणा ठाण्यात करण्यात आली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

ठळक मुद्देचिकलठाणा ठाण्यात नोंद : शेंद्रा पंचतारांकित वसाहतीत कंपनीसमोरील घटना

औरंगाबाद : मुकुंदवाडी येथील रहिवासी भारतीय दलित पँथरचे औरंगाबाद शहराध्यक्ष, तथा उद्योजकाचा शेंद्रा पंचतारांकित वसाहतीमधील स्वत:च्या कंपनीसमोरच कारमध्ये गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेची नोंद चिकलठाणा ठाण्यात करण्यात आली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.प्रकाश कडूबा कासारे (४८, रा. मुकुंदवाडी), असे खून झालेल्या उद्योजकाचे नाव आहे. चिकलठाणा पोलिसांनी सांगितले की, कासारे यांची शेंद्रा एमआयडीसीमध्ये तुषार इंजिनिअरिंग नावाची कंपनी आहे. ती अनेक वर्षांपासून बंद आहे. भारतीय दलित पँथरचे ते औरंगाबाद शहराध्यक्ष म्हणून कार्यरत होते. ते रविवारी दुपारी घराबाहेर पडले होते. मात्र रात्री घरी परतले नव्हते. नातेवाईक सतत त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधत होते; मात्र फोन लागत नव्हता. सोमवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास त्यांच्या कंपनीजवळ उभ्या कारच्या ड्रायव्हर सीटवर कासारे संशयास्पदरीत्या मृतावस्थेत आढळले. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला, तेव्हा कासारे यांचा गळा आवळल्यासारखे दिसत होते. त्यांना घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवालात त्यांचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले.हॉटेलमध्ये झाले एकासोबत भांडणकासारे हे रविवारी सायंकाळी शेंद्रा एमआयडीसीमधील एका हॉटेलमध्ये एका जणासोबत गेले होते. तेथे सोबतच्या एका व्यक्तीसोबत त्यांचे जोरदार भांडण झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली; मात्र त्यांच्यासोबत भांडण करणारा कोण, हे कळू शकले नाही. ग्रामीण गुन्हे शाखेचे निरीक्षक सुभाष भुजंग, चिकलठाणा ठाण्याचे सहायक निरीक्षक सत्यजित ताईतवाले आणि अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनेचा तपास सुरू केला.कार्यकर्त्यांची घाटीत गर्दीकासारे हे दलित पँथरचे सक्रिय पदाधिकारी होते. त्यांचा मृत्यू झाल्याचे कळताच विविध नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने घाटीत धाव घेतली.सुरक्षारक्षकावर संशयतुषार इंजिनिअरिंग कंपनीच्या सुरक्षेसाठी कासारे यांनी एक सुरक्षारक्षक नेमला होता. हा सुरक्षारक्षक सहकुटुंब कंपनीत राहतो. घटना घडल्यापासून तो गायब आहे. त्याच्यावरही पोलिसांना संशय आहे.अनैतिक संबंधातून खून झाल्याचा संशय?पोलीस सूत्रांनी सांगितले की, कासारे यांचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्यातूनच त्यांचा खून झाला असावा, असा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी संशयिताचा शोध सुरू केला आहे.