शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

कारमध्ये गळा आवळून पँथरचे शहराध्यक्ष असलेल्या उद्योजकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 22:52 IST

मुकुंदवाडी येथील रहिवासी भारतीय दलित पँथरचे औरंगाबाद शहराध्यक्ष, तथा उद्योजकाचा शेंद्रा पंचतारांकित वसाहतीमधील स्वत:च्या कंपनीसमोरच कारमध्ये गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेची नोंद चिकलठाणा ठाण्यात करण्यात आली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

ठळक मुद्देचिकलठाणा ठाण्यात नोंद : शेंद्रा पंचतारांकित वसाहतीत कंपनीसमोरील घटना

औरंगाबाद : मुकुंदवाडी येथील रहिवासी भारतीय दलित पँथरचे औरंगाबाद शहराध्यक्ष, तथा उद्योजकाचा शेंद्रा पंचतारांकित वसाहतीमधील स्वत:च्या कंपनीसमोरच कारमध्ये गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेची नोंद चिकलठाणा ठाण्यात करण्यात आली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.प्रकाश कडूबा कासारे (४८, रा. मुकुंदवाडी), असे खून झालेल्या उद्योजकाचे नाव आहे. चिकलठाणा पोलिसांनी सांगितले की, कासारे यांची शेंद्रा एमआयडीसीमध्ये तुषार इंजिनिअरिंग नावाची कंपनी आहे. ती अनेक वर्षांपासून बंद आहे. भारतीय दलित पँथरचे ते औरंगाबाद शहराध्यक्ष म्हणून कार्यरत होते. ते रविवारी दुपारी घराबाहेर पडले होते. मात्र रात्री घरी परतले नव्हते. नातेवाईक सतत त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधत होते; मात्र फोन लागत नव्हता. सोमवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास त्यांच्या कंपनीजवळ उभ्या कारच्या ड्रायव्हर सीटवर कासारे संशयास्पदरीत्या मृतावस्थेत आढळले. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला, तेव्हा कासारे यांचा गळा आवळल्यासारखे दिसत होते. त्यांना घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवालात त्यांचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले.हॉटेलमध्ये झाले एकासोबत भांडणकासारे हे रविवारी सायंकाळी शेंद्रा एमआयडीसीमधील एका हॉटेलमध्ये एका जणासोबत गेले होते. तेथे सोबतच्या एका व्यक्तीसोबत त्यांचे जोरदार भांडण झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली; मात्र त्यांच्यासोबत भांडण करणारा कोण, हे कळू शकले नाही. ग्रामीण गुन्हे शाखेचे निरीक्षक सुभाष भुजंग, चिकलठाणा ठाण्याचे सहायक निरीक्षक सत्यजित ताईतवाले आणि अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनेचा तपास सुरू केला.कार्यकर्त्यांची घाटीत गर्दीकासारे हे दलित पँथरचे सक्रिय पदाधिकारी होते. त्यांचा मृत्यू झाल्याचे कळताच विविध नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने घाटीत धाव घेतली.सुरक्षारक्षकावर संशयतुषार इंजिनिअरिंग कंपनीच्या सुरक्षेसाठी कासारे यांनी एक सुरक्षारक्षक नेमला होता. हा सुरक्षारक्षक सहकुटुंब कंपनीत राहतो. घटना घडल्यापासून तो गायब आहे. त्याच्यावरही पोलिसांना संशय आहे.अनैतिक संबंधातून खून झाल्याचा संशय?पोलीस सूत्रांनी सांगितले की, कासारे यांचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्यातूनच त्यांचा खून झाला असावा, असा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी संशयिताचा शोध सुरू केला आहे.