शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कारमध्ये गळा आवळून पँथरचे शहराध्यक्ष असलेल्या उद्योजकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 22:52 IST

मुकुंदवाडी येथील रहिवासी भारतीय दलित पँथरचे औरंगाबाद शहराध्यक्ष, तथा उद्योजकाचा शेंद्रा पंचतारांकित वसाहतीमधील स्वत:च्या कंपनीसमोरच कारमध्ये गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेची नोंद चिकलठाणा ठाण्यात करण्यात आली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

ठळक मुद्देचिकलठाणा ठाण्यात नोंद : शेंद्रा पंचतारांकित वसाहतीत कंपनीसमोरील घटना

औरंगाबाद : मुकुंदवाडी येथील रहिवासी भारतीय दलित पँथरचे औरंगाबाद शहराध्यक्ष, तथा उद्योजकाचा शेंद्रा पंचतारांकित वसाहतीमधील स्वत:च्या कंपनीसमोरच कारमध्ये गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेची नोंद चिकलठाणा ठाण्यात करण्यात आली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.प्रकाश कडूबा कासारे (४८, रा. मुकुंदवाडी), असे खून झालेल्या उद्योजकाचे नाव आहे. चिकलठाणा पोलिसांनी सांगितले की, कासारे यांची शेंद्रा एमआयडीसीमध्ये तुषार इंजिनिअरिंग नावाची कंपनी आहे. ती अनेक वर्षांपासून बंद आहे. भारतीय दलित पँथरचे ते औरंगाबाद शहराध्यक्ष म्हणून कार्यरत होते. ते रविवारी दुपारी घराबाहेर पडले होते. मात्र रात्री घरी परतले नव्हते. नातेवाईक सतत त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधत होते; मात्र फोन लागत नव्हता. सोमवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास त्यांच्या कंपनीजवळ उभ्या कारच्या ड्रायव्हर सीटवर कासारे संशयास्पदरीत्या मृतावस्थेत आढळले. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला, तेव्हा कासारे यांचा गळा आवळल्यासारखे दिसत होते. त्यांना घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवालात त्यांचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले.हॉटेलमध्ये झाले एकासोबत भांडणकासारे हे रविवारी सायंकाळी शेंद्रा एमआयडीसीमधील एका हॉटेलमध्ये एका जणासोबत गेले होते. तेथे सोबतच्या एका व्यक्तीसोबत त्यांचे जोरदार भांडण झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली; मात्र त्यांच्यासोबत भांडण करणारा कोण, हे कळू शकले नाही. ग्रामीण गुन्हे शाखेचे निरीक्षक सुभाष भुजंग, चिकलठाणा ठाण्याचे सहायक निरीक्षक सत्यजित ताईतवाले आणि अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनेचा तपास सुरू केला.कार्यकर्त्यांची घाटीत गर्दीकासारे हे दलित पँथरचे सक्रिय पदाधिकारी होते. त्यांचा मृत्यू झाल्याचे कळताच विविध नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने घाटीत धाव घेतली.सुरक्षारक्षकावर संशयतुषार इंजिनिअरिंग कंपनीच्या सुरक्षेसाठी कासारे यांनी एक सुरक्षारक्षक नेमला होता. हा सुरक्षारक्षक सहकुटुंब कंपनीत राहतो. घटना घडल्यापासून तो गायब आहे. त्याच्यावरही पोलिसांना संशय आहे.अनैतिक संबंधातून खून झाल्याचा संशय?पोलीस सूत्रांनी सांगितले की, कासारे यांचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्यातूनच त्यांचा खून झाला असावा, असा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी संशयिताचा शोध सुरू केला आहे.