शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
6
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
7
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
8
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
9
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
10
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
11
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
12
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
13
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
14
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
15
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
16
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
17
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
18
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
19
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
20
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 

जिल्ह्यात सर्वदूर पाऊस

By admin | Updated: July 8, 2014 01:01 IST

जालना : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी दमदार, मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला.

जालना : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी दमदार, मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून बळीराजा पेरणी व लागवडीच्या कामाला लागला आहे.गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात वरूणराजाचे आगमन उशिरा झाले आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६८८.३२ मि.मी. असून ७ जुलैपर्यंत किमान १७७. ६९ मि.मी. पाऊस अपेक्षित होता. मात्र प्रत्यक्षात या तारखेपर्यंत केवळ ४.७२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. रविवारी सायंकाळनंतर जिल्ह्यात सर्वदूर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. भोकरदन तालुक्यात रात्री उशिरा मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. तर जालन्यासह बदनापूर, अंबड, घनसावंगी, परतूर, मंठा, जाफराबाद तालुक्यांमध्ये सोमवारी पहाटेच्या सुमारास पाऊस झाला. पहाटे ३ ते ६ या वेळेत जिल्ह्यात मध्यम व हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. गुरूवारी जालना शहरात सुमारे तासभर मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला होता. याशिवाय गोलापांगरी, पारडगाव, वडीगोद्री व अंबड तालुक्यातील काही गावांत पाऊस झाल्याने ७ जुलैपूर्वी जिल्ह्यात २१.४७ मि.मी. पावसाची नोंद होती. रविवारी मध्यरात्रीनंतर १०.९९ मि.मी. पाऊस झाल्याने जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पावसाची नोंद ३२.४६ मि.मी. एवढी झाली आहे. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांची लागवड, पेरणीसाठी लगबगभोकरदन तालुक्यातील केदारखेडा परिसरात गेल्या महिनाभराची पावसाची प्रतीक्षा संपली असून परिसरात जोरदार पाऊस बरसला आहे़ यामुळे ७ रोजी जवळपास ८0 टक्के लागवडी केल्या़ पावसाचा एकही थेंब पावसाचा पडला नसल्याने शेतकऱ्यानी पेरणीपूर्व मशागती करुन पावसाची प्रतीक्षा करीत होते़ पावसाने विलंब केल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झालेला होता़६ रोजी अचानक जोरदार पाऊस बरसला़ हा पाऊस पेरणी योग्य असल्याने दि़७ रोजी सकाळीच शेतकऱ्यांनी कपाशी लागवडीची लगबग सुरु केल्याची दिसून आले़ आज जवळपास ८0 टक्के शेतकऱ्यांनी लागवड केल्याचे समजते़ या पावसाने शेतकरीवर्ग सुखावला आहे़ गतवर्षी १0 जुलैपर्यंत खरिपाच्या पिकांची वाढ मोठ्या प्रमाणात झालेली होती़ या वर्षी पेरण्या लाबंल्या असल्याने याचा परिणाम उत्पादनावर होणार आहे़रविवारी मध्यरात्रीनंतर जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. सोमवारी दुपारनंतरही जालना तालुक्यात काही भागात ठिकाणी ढगाळ वातावरण होते