शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
2
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
3
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
4
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
5
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
6
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
7
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
8
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
9
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
10
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
11
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
12
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
13
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
14
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
15
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
16
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
17
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
18
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
19
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
20
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स

जिल्ह्यात सर्वदूर पाऊस

By admin | Updated: July 8, 2014 01:01 IST

जालना : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी दमदार, मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला.

जालना : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी दमदार, मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून बळीराजा पेरणी व लागवडीच्या कामाला लागला आहे.गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात वरूणराजाचे आगमन उशिरा झाले आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६८८.३२ मि.मी. असून ७ जुलैपर्यंत किमान १७७. ६९ मि.मी. पाऊस अपेक्षित होता. मात्र प्रत्यक्षात या तारखेपर्यंत केवळ ४.७२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. रविवारी सायंकाळनंतर जिल्ह्यात सर्वदूर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. भोकरदन तालुक्यात रात्री उशिरा मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. तर जालन्यासह बदनापूर, अंबड, घनसावंगी, परतूर, मंठा, जाफराबाद तालुक्यांमध्ये सोमवारी पहाटेच्या सुमारास पाऊस झाला. पहाटे ३ ते ६ या वेळेत जिल्ह्यात मध्यम व हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. गुरूवारी जालना शहरात सुमारे तासभर मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला होता. याशिवाय गोलापांगरी, पारडगाव, वडीगोद्री व अंबड तालुक्यातील काही गावांत पाऊस झाल्याने ७ जुलैपूर्वी जिल्ह्यात २१.४७ मि.मी. पावसाची नोंद होती. रविवारी मध्यरात्रीनंतर १०.९९ मि.मी. पाऊस झाल्याने जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पावसाची नोंद ३२.४६ मि.मी. एवढी झाली आहे. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांची लागवड, पेरणीसाठी लगबगभोकरदन तालुक्यातील केदारखेडा परिसरात गेल्या महिनाभराची पावसाची प्रतीक्षा संपली असून परिसरात जोरदार पाऊस बरसला आहे़ यामुळे ७ रोजी जवळपास ८0 टक्के लागवडी केल्या़ पावसाचा एकही थेंब पावसाचा पडला नसल्याने शेतकऱ्यानी पेरणीपूर्व मशागती करुन पावसाची प्रतीक्षा करीत होते़ पावसाने विलंब केल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झालेला होता़६ रोजी अचानक जोरदार पाऊस बरसला़ हा पाऊस पेरणी योग्य असल्याने दि़७ रोजी सकाळीच शेतकऱ्यांनी कपाशी लागवडीची लगबग सुरु केल्याची दिसून आले़ आज जवळपास ८0 टक्के शेतकऱ्यांनी लागवड केल्याचे समजते़ या पावसाने शेतकरीवर्ग सुखावला आहे़ गतवर्षी १0 जुलैपर्यंत खरिपाच्या पिकांची वाढ मोठ्या प्रमाणात झालेली होती़ या वर्षी पेरण्या लाबंल्या असल्याने याचा परिणाम उत्पादनावर होणार आहे़रविवारी मध्यरात्रीनंतर जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. सोमवारी दुपारनंतरही जालना तालुक्यात काही भागात ठिकाणी ढगाळ वातावरण होते