शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकीचे निकाल रखडले, विद्यार्थ्यांचे होणार नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 00:05 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने अभियांत्रिकीच्या घेतलेल्या परीक्षांचे निकाल अद्यापही लागले नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने अभियांत्रिकीच्या घेतलेल्या परीक्षांचे निकाल अद्यापही लागले नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वप्नही रखडलेल्या निकालामुळे भंगले आहे. प्रथम वर्षाचे निकाल जाहीर झाले असून, उर्वरित द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ वर्षाचे निकाल आणखी आठ दिवस लागणार नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित अभियांत्रिकी महाविद्यालयांचे सर्व अभ्यासक्रमांतील द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ वर्षाचे निकाल रखडले आहेत. आयआयटी, आयआयएमसह इतर देश-विदेशातील नामांकित संस्थांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची संधी हुकली आहे.गेट परीक्षेंतर्गत झालेल्या प्रवेशाला २४ आॅगस्टपर्यंत गुणपत्रिका सादर करणे बंधनकारक आहे. अभियांत्रिकीच्या १२ प्रकारच्या अभ्यासक्रमातील ३५ हजार विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. अभियांत्रिकीच्या परीक्षा मे-जून महिन्यात घेण्यात आल्या होत्या.काही अभ्यासक्रमांच्या परीक्षा मे महिन्यातच पूर्ण झाल्या. तरीही त्याचे निकाल अद्याप लागलेले नाहीत. ७ जून रोजी अभियांत्रिकीचा शेवटचा पेपर होता.१५ दिवसांपूर्वीच परीक्षा विभागाने आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात सर्वच निकाल जाहीर होणार असल्याचे सांगितले होते; मात्र यास दोन आठवडे उलटले तरीही निकाल जाहीर झालेले नाहीत. यास आणखी एक आठवडा लागण्याची शक्यता आहे.२४ सप्टेंबरपर्यंत गुणपत्रिकेची मुदतअभियांत्रिकीच्या एम.टेक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया ‘गेट’ परीक्षेमार्फत राबविण्यात येते. एम.टेक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या आतापर्यंत तीन फेºया जाहीर झाल्या आहेत. यात निकाल जाहीर न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी २४ सप्टेंबरपर्यंत गुणपत्रिका सादर करणे बंधनकारक केले आहे. अन्यथा प्रवेश रद्द होणार आहेत.परीक्षा संपून ७० दिवस झालेविद्यापीठाने घेतलेल्या प्रत्येक परीक्षांचे निकाल ४५ दिवसांच्या आत लावणे बंधनकारक आहे; मात्र अभियांत्रिकीच्या परीक्षा संपल्या त्यास १७ आॅगस्ट रोजी तब्बल ७० दिवस पूर्ण झाले आहेत. १५ मे ते ७ जूनदरम्यान परीक्षा घेण्यात आल्या होत्या. यातील प्रथम वर्षाचा अपवाद वगळता इतर परीक्षांचे निकाल अद्यापही लागलेले नाहीत.पुणे, सोलापूर, कोल्हापूर आदी ठिकाणच्या विद्यापीठांचे निकाल जाहीर झालेले आहेत, यामुळे औरंगाबाद विद्यापीठांतर्गत महाविद्यालयात शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांचेच शैक्षणिक नुकसान होणार असल्याचे अभियांत्रिकीच्या प्राचार्यांनी स्पष्ट केले......उत्तरपत्रिकांची तपासणी करण्यासाठी महाविद्यालया-तील प्राध्यापकच येत नाहीत. यामुळे निकाल रखडले आहेत. प्राध्यापक आल्याशिवाय उत्तरपत्रिकांची तपासणी होणार नाही. त्याशिवाय निकाल लावणेही विद्यापीठाला शक्य नाही.- डॉ. साधना पांडे, प्रभारी परीक्षा संचालक

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादexamपरीक्षा