शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

‘एमआयडीसी’च्या जमीन संपादनाची प्रतीक्षा संपेना

By admin | Updated: April 30, 2017 23:59 IST

उस्मानाबाद वडगाव (सि़) येथील एमआयडीसीसाठी संपादीत करावयाच्या जमिनीसाठी प्रती एकरी १५ लाख रूपये दर निश्चित करण्यात आला असून, शेतकऱ्यांच्या मंजुरीनंतर भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे़

विजय मुंडे  उस्मानाबादतत्कालीन शासनाने भूम, कळंब व शिराढोण येथे औद्यागिक वसात सुरू करण्याबाबतचे पत्र औद्योगिक विकास महामंडळाला दिले होते़ त्यानुसार भू- निवड समितीने पाहणी करून प्रस्ताव दाखल केला होता़ मात्र, उच्चाधिकार समितीच्या ३० डिसेंबर २०१३ च्या बैठकीत यावर चर्चा होऊन या प्रस्तावाला सद्यस्थितीत स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ तर वडगाव (सि़) येथील एमआयडीसीसाठी संपादीत करावयाच्या जमिनीसाठी प्रती एकरी १५ लाख रूपये दर २२ फेब्रुवारी २०१७ च्या बैठकित निश्चित करण्यात आला असून, शेतकऱ्यांच्या मंजुरीनंतर भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे़उस्मानाबाद शहरासह भूम, उमरगा व कळंब येथील एमआयडीसीत काही छोटे उद्योग सुरू आहेत़ येथील उद्योगामुळे काही मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे़ मात्र, बहुतांश भूखंडावर अद्यापही उद्योग सुरू झालेले नाहीत़ एकीकडे जिल्ह्यातील एमआयडीसीत मोठे उद्योग सुरू झालेले नाहीत़ तर दुसरीकडे तत्कालीन उद्योग मंत्र्यांनी आ़ राणाजगजितसिंह पाटील, आ़ राहूल मोठे यांच्या पाठपुराव्यामुळे कळंब तालुक्यातील शिराढोण, तुळजापूर व भूम येथील अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रासाठी जमीन संपादीत करण्याच्या सूचना दिल्या होत्या़ त्यानुसार भू- निवड समितीने प्रस्तावित औद्योगिक क्षेत्राची १९ डिसेंबर २०१३ मध्ये पाहणी केली होती़त्यानुसार शिराढोण येथे ९६७़४१ हे़आऱ खासगी क्षेत्र भूसंपादनाचा प्रस्ताव मुख्यालयास सादर केला होता़ तर ६ डिसेंबर २०१३ रोजी तुळजापूर येथील प्रस्तावित औद्योगिक क्षेत्राची पाहणी करून ४४३़६८ हे़आऱ जमीन संपादनाचा व प्रस्तावित अति़ भूम औद्योगिक क्षेत्रासाठी ६ डिसेंबर २०१३ रोजी भूम येथील क्षेत्राची पाहणी करून ३५७़३० हे़आऱ जमीन संपादनाचा प्रस्ताव मुख्यालयाकडे सादर केला आहे़ उच्चाधिकार समितीच्या ७६ व्या बैठकीत या तिन्ही प्रस्तावांवर चर्चा केल्यानंतर सद्यस्थितीत प्रस्ताव स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता़ त्यानंतर या प्रस्तावांवर पुढील कार्यवाही झाल्याचे दिसत नाही़ उस्मानाबाद तालुक्यातील वडगाव (सि़) येथील आद्योगक क्षेत्र स्थापन करण्यासाठी खासगी १४८़५३ हे़आऱ क्षेत्र संपादीत करण्यात येणार आहे़ भूसंपादनासाठी शेतकरी व प्रशासनाच्या अनेक बैठका झाल्या असून, दरावरून प्रश्न रेंगाळला आहे़ ८९ व्या उच्चाधिकार समितीच्या २२ फेब्रुवारी २०१७ च्या बैठकीत प्रती एकरी १५ लाख रूपयांच्या दरा समितीने मंजुरी दिली आहे़ शेतकऱ्यांनी संमती दिल्यानंतर भूसंपादनाची पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे़