शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

‘एमआयडीसी’च्या जमीन संपादनाची प्रतीक्षा संपेना

By admin | Updated: April 30, 2017 23:59 IST

उस्मानाबाद वडगाव (सि़) येथील एमआयडीसीसाठी संपादीत करावयाच्या जमिनीसाठी प्रती एकरी १५ लाख रूपये दर निश्चित करण्यात आला असून, शेतकऱ्यांच्या मंजुरीनंतर भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे़

विजय मुंडे  उस्मानाबादतत्कालीन शासनाने भूम, कळंब व शिराढोण येथे औद्यागिक वसात सुरू करण्याबाबतचे पत्र औद्योगिक विकास महामंडळाला दिले होते़ त्यानुसार भू- निवड समितीने पाहणी करून प्रस्ताव दाखल केला होता़ मात्र, उच्चाधिकार समितीच्या ३० डिसेंबर २०१३ च्या बैठकीत यावर चर्चा होऊन या प्रस्तावाला सद्यस्थितीत स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ तर वडगाव (सि़) येथील एमआयडीसीसाठी संपादीत करावयाच्या जमिनीसाठी प्रती एकरी १५ लाख रूपये दर २२ फेब्रुवारी २०१७ च्या बैठकित निश्चित करण्यात आला असून, शेतकऱ्यांच्या मंजुरीनंतर भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे़उस्मानाबाद शहरासह भूम, उमरगा व कळंब येथील एमआयडीसीत काही छोटे उद्योग सुरू आहेत़ येथील उद्योगामुळे काही मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे़ मात्र, बहुतांश भूखंडावर अद्यापही उद्योग सुरू झालेले नाहीत़ एकीकडे जिल्ह्यातील एमआयडीसीत मोठे उद्योग सुरू झालेले नाहीत़ तर दुसरीकडे तत्कालीन उद्योग मंत्र्यांनी आ़ राणाजगजितसिंह पाटील, आ़ राहूल मोठे यांच्या पाठपुराव्यामुळे कळंब तालुक्यातील शिराढोण, तुळजापूर व भूम येथील अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रासाठी जमीन संपादीत करण्याच्या सूचना दिल्या होत्या़ त्यानुसार भू- निवड समितीने प्रस्तावित औद्योगिक क्षेत्राची १९ डिसेंबर २०१३ मध्ये पाहणी केली होती़त्यानुसार शिराढोण येथे ९६७़४१ हे़आऱ खासगी क्षेत्र भूसंपादनाचा प्रस्ताव मुख्यालयास सादर केला होता़ तर ६ डिसेंबर २०१३ रोजी तुळजापूर येथील प्रस्तावित औद्योगिक क्षेत्राची पाहणी करून ४४३़६८ हे़आऱ जमीन संपादनाचा व प्रस्तावित अति़ भूम औद्योगिक क्षेत्रासाठी ६ डिसेंबर २०१३ रोजी भूम येथील क्षेत्राची पाहणी करून ३५७़३० हे़आऱ जमीन संपादनाचा प्रस्ताव मुख्यालयाकडे सादर केला आहे़ उच्चाधिकार समितीच्या ७६ व्या बैठकीत या तिन्ही प्रस्तावांवर चर्चा केल्यानंतर सद्यस्थितीत प्रस्ताव स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता़ त्यानंतर या प्रस्तावांवर पुढील कार्यवाही झाल्याचे दिसत नाही़ उस्मानाबाद तालुक्यातील वडगाव (सि़) येथील आद्योगक क्षेत्र स्थापन करण्यासाठी खासगी १४८़५३ हे़आऱ क्षेत्र संपादीत करण्यात येणार आहे़ भूसंपादनासाठी शेतकरी व प्रशासनाच्या अनेक बैठका झाल्या असून, दरावरून प्रश्न रेंगाळला आहे़ ८९ व्या उच्चाधिकार समितीच्या २२ फेब्रुवारी २०१७ च्या बैठकीत प्रती एकरी १५ लाख रूपयांच्या दरा समितीने मंजुरी दिली आहे़ शेतकऱ्यांनी संमती दिल्यानंतर भूसंपादनाची पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे़