शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

करमाड येथे मुख्य रस्त्यावर भाजीपाला विक्रेत्यांचे अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 21:16 IST

जालना मार्गावरून गावात जाणाऱ्या मुख्य मार्गावर दोन्हीही बाजूला भाजीपाला विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने मुख्य रस्ता अरुंद झाला असून , अपघाताची शक्यता आहे.

करमाड : जालना मार्गावरून गावात जाणाऱ्या मुख्य मार्गावर दोन्हीही बाजूला भाजीपाला विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने मुख्य रस्ता अरुंद झाला असून , अपघाताची शक्यता आहे.

करमाड येथे दररोज मंडी भरत असल्याने ग्राहकांना सोयीचे व्हावे यासाठी भाजी विक्रेत्यांसाठी ग्रामपंचायतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ जागा दिली आहे. परंतु दिवसेंदिवस भाजीपाला विक्रेत्यांची संख्या वाढत असल्याने त्यांनी आता गावातील मुख्य रस्त्यावर अतिक्रमण केले आहे.

दररोज सायंकाळी भाजीपाला घेण्यासाठी याठिकाणी ग्राहकांची गर्दी होते. याच ठिकाणी गावात जाणारा मुख्य रस्ता असल्याने दुचाकी व चारचाकी वाहनांची वर्दळ असते. भाजीपाला विक्रेते मुख्य रस्त्यावर बसल्याने वाहनचालकांना याठिकाणी कसरत करावी लागते.

यापूर्वी आठवडी बाजारात आलेल्या दोन महिलांना ट्रकने चिरडले होते. त्यानंतर पोलिसांनी बाजार जालना मार्गाच्या आत स्थलांतरित केला होता. आताही गावातील मुख्य मार्गावर मंडी भरत असल्याने रस्ता अरुंद झाला असून, एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हा रस्ता मोकळा करावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEnchroachmentअतिक्रमण